ETV Bharat / state

ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपा नेत्याचं पत्र - Demanding Ban Free Ration

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 9:14 PM IST

Demanding Ban Free Ration : मतदान न करणाऱ्यांना मोफत धान्याचं वाटप बंद करण्याची मागणी भाजपा नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली आहे. देशासह महाराष्ट्रात महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपा नेत्याच्या अजब मागणीमुळं मतदारांत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV BHARAT Reporter)

मुंबई Demanding Ban Free Ration : नुकत्याच झालेल्या 18 व्या लोकसभेसाठी देशभरात 7 टप्प्यात मतदान झालं. त्यानंतर देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र, देशभरात मतदानाचा टक्का बराच घसरला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं या सर्वांचा फटका महायुतीला बसला. महायुतीला बसलेल्या फटक्यामुळं व्यथित झालेल्या मुंबईतील भाजपा नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. 'ज्या नागरिकांनी मतदान केलं नाही, त्यांना मोफत धान्य देऊ नका', अशी मागणी भाजपा नेत्यानं केली आहे.

'त्यांना' मोफत धान्य देऊ नका : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह मुंबईत झालेला पराभव भाजपा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातच मतदानाचा टक्का घसरल्यानं महायुतीला मोठा फटका बसलाय. म्हणूनच ज्यांनी मतदान केलं नाही, अशा नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारं मोफत धान्य दिलं जाऊ नये, असं भाजपा नेत्याचं म्हणणं आहे. तसंच ज्यांनी मतदान केलं, त्यांनाच मोफत धान्य योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी देखील भाजपा नेत्यानं केली आहे. अर्जुन गुप्ता असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत.

देशात 80 कोटी लोकांना मोफत रेशन : अर्जुन गुप्ता पुढे म्हणाले, काँग्रेसला मागच्या 60 वर्षात जे जमलं नाही, ते तुम्ही मागच्या 10 वर्षात करून दाखवलं. भारताची वाटचाल तुमच्या नेतृत्वात विश्वगुरूच्या दिशेनं होत आहे. विकासाची गंगा सर्वत्र वाहात असताना अशाप्रकारे मतदान होत नसेल, तर हा चिंतेचा विषय आहे. देशात सुमारे 80 कोटी लोकांना मागील अनेक वर्षापासून मोफत रेशन दिलं जातय. त्यामध्ये मोफत रेशन घेणाऱ्यांपैकी किती लोकांनी मतदान केलं? हा तपासाचा भाग आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांचं रेशन तत्काळ बंद करण्यात यावं, अशी विनंती गुप्ता यांनी पंतप्रधानांना केली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. जगन मोहन रेड्डींच्या आलिशान राजवाड्यात 15 लाखाचा कमोड, बेडरूमची किंमत पाहून व्हाल थक्क - Jagan Mohan Reddy House Cost
  2. 'माझे पाय दिवसाढवळ्या कार्यकर्त्यानं धुतले, पण राज्य सरकारमध्ये...'; त्या प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले? - Nana Patole
  3. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024

मुंबई Demanding Ban Free Ration : नुकत्याच झालेल्या 18 व्या लोकसभेसाठी देशभरात 7 टप्प्यात मतदान झालं. त्यानंतर देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र, देशभरात मतदानाचा टक्का बराच घसरला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं या सर्वांचा फटका महायुतीला बसला. महायुतीला बसलेल्या फटक्यामुळं व्यथित झालेल्या मुंबईतील भाजपा नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. 'ज्या नागरिकांनी मतदान केलं नाही, त्यांना मोफत धान्य देऊ नका', अशी मागणी भाजपा नेत्यानं केली आहे.

'त्यांना' मोफत धान्य देऊ नका : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह मुंबईत झालेला पराभव भाजपा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातच मतदानाचा टक्का घसरल्यानं महायुतीला मोठा फटका बसलाय. म्हणूनच ज्यांनी मतदान केलं नाही, अशा नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारं मोफत धान्य दिलं जाऊ नये, असं भाजपा नेत्याचं म्हणणं आहे. तसंच ज्यांनी मतदान केलं, त्यांनाच मोफत धान्य योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी देखील भाजपा नेत्यानं केली आहे. अर्जुन गुप्ता असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत.

देशात 80 कोटी लोकांना मोफत रेशन : अर्जुन गुप्ता पुढे म्हणाले, काँग्रेसला मागच्या 60 वर्षात जे जमलं नाही, ते तुम्ही मागच्या 10 वर्षात करून दाखवलं. भारताची वाटचाल तुमच्या नेतृत्वात विश्वगुरूच्या दिशेनं होत आहे. विकासाची गंगा सर्वत्र वाहात असताना अशाप्रकारे मतदान होत नसेल, तर हा चिंतेचा विषय आहे. देशात सुमारे 80 कोटी लोकांना मागील अनेक वर्षापासून मोफत रेशन दिलं जातय. त्यामध्ये मोफत रेशन घेणाऱ्यांपैकी किती लोकांनी मतदान केलं? हा तपासाचा भाग आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांचं रेशन तत्काळ बंद करण्यात यावं, अशी विनंती गुप्ता यांनी पंतप्रधानांना केली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. जगन मोहन रेड्डींच्या आलिशान राजवाड्यात 15 लाखाचा कमोड, बेडरूमची किंमत पाहून व्हाल थक्क - Jagan Mohan Reddy House Cost
  2. 'माझे पाय दिवसाढवळ्या कार्यकर्त्यानं धुतले, पण राज्य सरकारमध्ये...'; त्या प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले? - Nana Patole
  3. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.