ETV Bharat / state

विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांची मेट्रो सफर ते दिवे घाटाकडं प्रस्थान, पाहा पुण्यातील आषाढी वारी! - Ashadhi Wari 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 11:48 AM IST

Ashadhi Wari 2024 : तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे वारकऱ्यांसाठी मेट्रो सफरचं आयोजन करण्यात आलं. यावेळी तब्बल 100 हून अधिक वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला. दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीने पुणेकरांचा निरोप घेत पुढे मार्गस्थ झाली आहे.

Warkari Pimpri Metro Travel
Warkari Pimpri Metro Travel (Source - ETV Bharat Reporter)

पुणे Ashadhi Wari 2024 : : दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जात आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवेघाटाची अवघड चढण पार करत सासवड येथे मुक्कामी असणार आहे. लाखो वारकरी आज माऊलींसोबत दिवेघाट सर करणार आहेत. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे पुढे जाऊन लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहेत.

पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी होती. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी होती. पुणे शहरात पालखी मुक्कामी असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले होते. या अनुषंगाने वारकऱ्यांच्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्याच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पावसाच्या अनुषंगानेदेखील सभा मंडप तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.

पुण्यात वारकऱ्यांनी लुटला मेट्रो सफरीचा आनंद (Source - ETV Bharat Reporter)
  • विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर... कपाळी गंध- टिळा, हाती भगवा पताका घेवून वारकऱ्यांनी सिव्हिल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट असा मेट्रो प्रवास केला. सरकत्या जिन्यावरून वर जात, तिकीट घेतल्यानंतर आपोआप उघडणारा दरवाजा पाहून अप्रूप वाटणाऱ्या वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला.

मानाचा चौथा महागणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे तर्फे वारकऱ्यांसाठी सिविल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट अशी मेट्रोची सफर आयोजित केली होती. यावेळी तब्बल 100 हून अधिक वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला. पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम आहे. पुणेकरांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी वारकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे किट, गुडदाणीची पॅकेट, बिस्किटाचे पुडे देण्यात आले. वारकरी दरवर्षी वारी मधून सामाजिक संदेश देत असतात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं दर्शन : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " पालाखीचा सोहळा हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने भारताला दिलेली ही एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. गेली अनेक वर्ष पालखी सोहळा असाच सुरू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांच दर्शन घेणं तसेच पालखीचं दर्शन घेणं हे कुठल्याही व्यक्तीसाठी एक आनंदाचं क्षण असतो. तोच आनंद अनुभवण्यासाठी मी इथे आलोय. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहणार आहे."



राहुल गांधींवर टीका : यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी बाबत विचारलं असता ते म्हणाले, "पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्रानं जाहीर केलीय. याचा आनंद आहे. पंकजा ताईंना विधानपरिषदेत स्थान दिलं जावं असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. मी भाजप केंद्रीय समितीनं विनंती मान्य केलाबद्दल आभार मानतो. तसेच राहुल गांधी हे हिंदुंना हिंसक म्हटले. त्यांनी हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्यांचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे."

हेही वाचा

  1. वर्षातून एकदाच वेलीवर येणाऱ्या 'या' फळाला आषाढी एकादशीत आहे महत्त्व, आरोग्याचे मिळतात आश्चर्यकारक फायदे - Ashadhi Ekadashi 2024
  2. ...तर तुमच्या मिशा कापू; सोलापुरातील महिला संघटनेचा संभाजी भिडेंना कडक इशारा - Vidya Lolage on Sambhaji Bhide
  3. हैदराबादचे अब्दुल चाचा करतात वारकऱ्यांची सेवा, 25 वर्षांपासून सेवा देण्यात त्यांना मिळतोय आनंद - Ashadhi wari 2024

पुणे Ashadhi Wari 2024 : : दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जात आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवेघाटाची अवघड चढण पार करत सासवड येथे मुक्कामी असणार आहे. लाखो वारकरी आज माऊलींसोबत दिवेघाट सर करणार आहेत. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे पुढे जाऊन लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहेत.

पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी होती. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी होती. पुणे शहरात पालखी मुक्कामी असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले होते. या अनुषंगाने वारकऱ्यांच्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्याच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पावसाच्या अनुषंगानेदेखील सभा मंडप तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.

पुण्यात वारकऱ्यांनी लुटला मेट्रो सफरीचा आनंद (Source - ETV Bharat Reporter)
  • विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर... कपाळी गंध- टिळा, हाती भगवा पताका घेवून वारकऱ्यांनी सिव्हिल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट असा मेट्रो प्रवास केला. सरकत्या जिन्यावरून वर जात, तिकीट घेतल्यानंतर आपोआप उघडणारा दरवाजा पाहून अप्रूप वाटणाऱ्या वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला.

मानाचा चौथा महागणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे तर्फे वारकऱ्यांसाठी सिविल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट अशी मेट्रोची सफर आयोजित केली होती. यावेळी तब्बल 100 हून अधिक वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला. पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम आहे. पुणेकरांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी वारकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे किट, गुडदाणीची पॅकेट, बिस्किटाचे पुडे देण्यात आले. वारकरी दरवर्षी वारी मधून सामाजिक संदेश देत असतात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं दर्शन : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " पालाखीचा सोहळा हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने भारताला दिलेली ही एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. गेली अनेक वर्ष पालखी सोहळा असाच सुरू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांच दर्शन घेणं तसेच पालखीचं दर्शन घेणं हे कुठल्याही व्यक्तीसाठी एक आनंदाचं क्षण असतो. तोच आनंद अनुभवण्यासाठी मी इथे आलोय. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहणार आहे."



राहुल गांधींवर टीका : यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी बाबत विचारलं असता ते म्हणाले, "पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्रानं जाहीर केलीय. याचा आनंद आहे. पंकजा ताईंना विधानपरिषदेत स्थान दिलं जावं असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. मी भाजप केंद्रीय समितीनं विनंती मान्य केलाबद्दल आभार मानतो. तसेच राहुल गांधी हे हिंदुंना हिंसक म्हटले. त्यांनी हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्यांचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे."

हेही वाचा

  1. वर्षातून एकदाच वेलीवर येणाऱ्या 'या' फळाला आषाढी एकादशीत आहे महत्त्व, आरोग्याचे मिळतात आश्चर्यकारक फायदे - Ashadhi Ekadashi 2024
  2. ...तर तुमच्या मिशा कापू; सोलापुरातील महिला संघटनेचा संभाजी भिडेंना कडक इशारा - Vidya Lolage on Sambhaji Bhide
  3. हैदराबादचे अब्दुल चाचा करतात वारकऱ्यांची सेवा, 25 वर्षांपासून सेवा देण्यात त्यांना मिळतोय आनंद - Ashadhi wari 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.