ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणे रद्द; एअर इंडियाच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार? - Air India news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 10:35 AM IST

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळं एअर इंडियाची काही उड्डाणं रद्द तर काही उड्डाणं उशिरानं धावत असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत एअर इंडियानं महत्त्वाचा निर्णय घेतला.

Mumbai Rain
Mumbai Rain (Source - ETV Bharat)

मुंबई Mumbai Rain : मुंबईतील अनेक भागात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई तसेच उपनगरांत आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काही उड्डाणे शहरातील जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. वाहतूक सेवेवरही याचा परिणाम जाणवत आहे. मुंबई लोकल काही मिनिटं उशिरानं धावत आहे.

एअर इंडिया देणार रिफंड : मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही उड्डाणे रद्द तर काही उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. एअर इंडियाने प्रवासासाठी कन्फर्म झालेल्या बुकिंगसाठी पूर्ण परतावा किंवा एक वेळचं विनामूल्य रीशेड्युलिंग ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक लिंक शेअर करत लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितलं. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिलीय.

मुंबई पोलिसांकडून ॲडव्हायझरी : मुंबईतील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सर्वसामान्यांनी किनारपट्टी भागात न जाण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. यासोबतच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहनही मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं.

  • ऑरेंज अलर्ट जारी : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा

मुंबई Mumbai Rain : मुंबईतील अनेक भागात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई तसेच उपनगरांत आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काही उड्डाणे शहरातील जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. वाहतूक सेवेवरही याचा परिणाम जाणवत आहे. मुंबई लोकल काही मिनिटं उशिरानं धावत आहे.

एअर इंडिया देणार रिफंड : मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही उड्डाणे रद्द तर काही उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. एअर इंडियाने प्रवासासाठी कन्फर्म झालेल्या बुकिंगसाठी पूर्ण परतावा किंवा एक वेळचं विनामूल्य रीशेड्युलिंग ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक लिंक शेअर करत लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितलं. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिलीय.

मुंबई पोलिसांकडून ॲडव्हायझरी : मुंबईतील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सर्वसामान्यांनी किनारपट्टी भागात न जाण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. यासोबतच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहनही मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं.

  • ऑरेंज अलर्ट जारी : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.