ETV Bharat / state

"कुशल प्रशासक, उत्कृष्ट राजकारणी आणि…", पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी काय म्हणाले मोहन भागवत? - Ahilyabai Holkar Birth Anniversary

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 2:19 PM IST

Ahilyabai Holkar Birth Anniversary : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज (31 मे) जयंती आहे. यानिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अहिल्याबाई होळकर यांचं व्यक्तिमत्व कसं होतं याविषयी माहिती दिली आहे.

Ahilyabai Holkar Birth Anniversary
अहिल्याबाई होळकर जयंती (Source ETV Bharat)

नागपूर Ahilyabai Holkar Birth Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी (21 मे) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण केलं. तसंच त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं? याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत : मोहन भागवत म्हणाले,"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं चारित्र्य सर्वांसाठी आदर्श आहे. दुर्दैवानं त्यांना वैधव्य मिळालं, मात्र एकट्या असूनही त्यांनी आपलं राज्य उत्तमरित्या सांभाळलं. त्यांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली. त्यामुळेच त्यांच्या नावामागे पुण्यश्लोक ही उपाधी जोडली जाते. पुण्यश्लोक हा शासकाचा संदर्भ देतो जो आपल्या प्रजेला सर्व एकांत आणि दुःखांपासून मुक्त करतो.

'शेतकऱ्यांपासून ते मागासलेल्यांपर्यंत सर्वांची चिंता' : अहिल्याबाईंनी आपल्या प्रजेला रोजगार देण्यासाठी उद्योगधंदे निर्माण केले. त्यांनी कधीही कोणाशी भेदभाव केला नाही. दुर्बल आणि मागासलेल्या लोकांची त्यांनी तितकीच काळजी घेतली. त्या शेतकऱ्यांचा विचार करायच्या. त्यामुळं त्यांचं राज्य सर्व प्रकारे संपन्न होतं. तसंच स्वतः राणी असूनही त्या अतिशय साधेपणानं जगल्या. अशा प्रकारे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंचं चित्र आपल्यासमोर आहे. त्या उत्कृष्ट राजकारणी, आदर्श स्त्री, आणि प्रजेचं पालनपोषण करणाऱ्या होत्या. सध्याच्या परिस्थितीतही त्या आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांचं अनुकरण करण्यासाठी त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे.

पुढं मोहन भागवत म्हणाले, "आपल्या राज्याला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांना समर पॉलिसीची माहिती होती. त्यांना केवळ आपल्या राज्याचीच नाही तर संपूर्ण देशाची चिंता होती. त्यांनी देशात अनेक ठिकाणी मंदिरं बांधली. देशाच्या अखंडतेसाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्या एक आदर्श होत्या."

हेही वाचा -

  1. सातच्या ठोक्यालाच सरसंघचालक मोहन भागवतांनी बजवला मतदानाचा हक्क, काय म्हणाले? - Mohan Bhagwat Casting Vote
  2. कट्टरतेच्या भिंती तोडून एकसंध भारत बनवणं हे आपलं कर्तव्य - डॉ. मोहन भागवत
  3. अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं सरसंघचालक घेणार 'बौद्धिक'

नागपूर Ahilyabai Holkar Birth Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी (21 मे) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण केलं. तसंच त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं? याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत : मोहन भागवत म्हणाले,"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं चारित्र्य सर्वांसाठी आदर्श आहे. दुर्दैवानं त्यांना वैधव्य मिळालं, मात्र एकट्या असूनही त्यांनी आपलं राज्य उत्तमरित्या सांभाळलं. त्यांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली. त्यामुळेच त्यांच्या नावामागे पुण्यश्लोक ही उपाधी जोडली जाते. पुण्यश्लोक हा शासकाचा संदर्भ देतो जो आपल्या प्रजेला सर्व एकांत आणि दुःखांपासून मुक्त करतो.

'शेतकऱ्यांपासून ते मागासलेल्यांपर्यंत सर्वांची चिंता' : अहिल्याबाईंनी आपल्या प्रजेला रोजगार देण्यासाठी उद्योगधंदे निर्माण केले. त्यांनी कधीही कोणाशी भेदभाव केला नाही. दुर्बल आणि मागासलेल्या लोकांची त्यांनी तितकीच काळजी घेतली. त्या शेतकऱ्यांचा विचार करायच्या. त्यामुळं त्यांचं राज्य सर्व प्रकारे संपन्न होतं. तसंच स्वतः राणी असूनही त्या अतिशय साधेपणानं जगल्या. अशा प्रकारे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंचं चित्र आपल्यासमोर आहे. त्या उत्कृष्ट राजकारणी, आदर्श स्त्री, आणि प्रजेचं पालनपोषण करणाऱ्या होत्या. सध्याच्या परिस्थितीतही त्या आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांचं अनुकरण करण्यासाठी त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे.

पुढं मोहन भागवत म्हणाले, "आपल्या राज्याला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांना समर पॉलिसीची माहिती होती. त्यांना केवळ आपल्या राज्याचीच नाही तर संपूर्ण देशाची चिंता होती. त्यांनी देशात अनेक ठिकाणी मंदिरं बांधली. देशाच्या अखंडतेसाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्या एक आदर्श होत्या."

हेही वाचा -

  1. सातच्या ठोक्यालाच सरसंघचालक मोहन भागवतांनी बजवला मतदानाचा हक्क, काय म्हणाले? - Mohan Bhagwat Casting Vote
  2. कट्टरतेच्या भिंती तोडून एकसंध भारत बनवणं हे आपलं कर्तव्य - डॉ. मोहन भागवत
  3. अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं सरसंघचालक घेणार 'बौद्धिक'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.