ETV Bharat / state

वरळी मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून 'हा' अभिनेता इच्छुक, निवडून आल्यास...

शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव आणि अभिनेता सुशांत शेलार यांनीही वरळीतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं म्हटलंय.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचलेला असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अंतिम स्वरुपात जागावाटप झालेले नाही. अनेक पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केलीय. दरम्यान, शिवसेनेनं आपली 45 जणांची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर केलीय. मात्र अद्यापपर्यंत वरळी विधानसभा मतदारसंघातून कुणालाही उमेदवारी दिली नाहीये. तर इथे शिवसेना (ठाकरे गटाकडून) आदित्य ठाकरे तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र महायुतीतून अद्याप कोणालाही उमेदवारी देण्यात आली नसल्यामुळं आदित्य ठाकरे या तुल्यबळ उमेदवाराच्या विरोधात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव आणि अभिनेता सुशांत शेलार यांनीही वरळीतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं म्हटलंय.

वरळीचा कायापालट करणार: दरम्यान, ईटीव्ही भारतशी संवाद साधताना अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव सुशांत शेलार म्हणाले की, वरळीत अनेक दिवसांपासून विविध प्रश्न 'आ' वासून प्रलंबित आहेत. यामध्ये वरळी पुनर्वसन असो, कोळीवाडा, चाळीचे प्रश्न असो, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र इथले स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावामध्ये फक्त मोठेपण आहे. पण काम मात्र काहीच नाही. आदित्य ठाकरे हे मागील पाच वर्षांपासून येथे आमदार आहेत. मात्र कुठल्याही प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला नाही. त्यामुळेच त्यांच्याविषयी मतदारांमध्ये उदासीनता आहे. माझ्या नावात जरी ठाकरे नसले तरी जर पक्षाने मला उमेदवारीची जबाबदारी दिली, तर मी नक्कीच इथून निवडणूक लढवेन. जर निवडून आलो तर वरळीचा नक्कीच कायापालट करेन, असा विश्वास यावेळी अभिनेता सुशांत शेलार यांनी व्यक्त केलाय.

ठाकरेंनी काहीही केलं नाही : या मतदारसंघात 2019 पासून पाच वर्षं आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. अडीच वर्षे ते मंत्रीदेखील होते. मात्र वरळी मतदारसंघात कार्यक्रम आणि सभा घेण्याव्यतिरिक्त त्यांनी काहीही केलं नाही. हा मुंबईतील चर्चेतील मतदारसंघ आहे. येथे खूप काही विकासकामं करता आली अस ती. मात्र आदित्य ठाकरे यांनी कुठलीच विकासकामं केली नसल्याची टीका सुशांत शेलार यांनी केली. केवळ सरकारवर टीका करणे..., मुख्यमंत्र्यांवर टीका करणे एवढेच काम आदित्य ठाकरेंनी केलं आहे. मी एक सच्चा आणि कट्टर शिवसैनिक आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून बाळासाहेबांना ऐकत आलो आहे. बाळासाहेबांच्या भाषणाची प्रेरणा घेऊन मी शिवसेना पक्षासाठी काम करतोय. लहान वयापासून पक्षासाठी काम केलं..., पोस्टर चिकटवले आणि कार्यक्रमातून भाग घेतला. त्यामुळे मी एक सच्चा आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि इथे जरी भाजपाकडून सायना एनसी यांचे नाव चर्चेत असले तरी महायुतीकडून जर मला संधी मिळाली आणि निवडणूक लढवण्याची जबाबदारी मिळाली. तर मी नक्कीच लढवेल. आणि वरळीत बदल करण्याचा प्रयत्न करेन, असेही शेलार म्हणाले.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचलेला असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अंतिम स्वरुपात जागावाटप झालेले नाही. अनेक पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केलीय. दरम्यान, शिवसेनेनं आपली 45 जणांची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर केलीय. मात्र अद्यापपर्यंत वरळी विधानसभा मतदारसंघातून कुणालाही उमेदवारी दिली नाहीये. तर इथे शिवसेना (ठाकरे गटाकडून) आदित्य ठाकरे तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र महायुतीतून अद्याप कोणालाही उमेदवारी देण्यात आली नसल्यामुळं आदित्य ठाकरे या तुल्यबळ उमेदवाराच्या विरोधात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव आणि अभिनेता सुशांत शेलार यांनीही वरळीतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं म्हटलंय.

वरळीचा कायापालट करणार: दरम्यान, ईटीव्ही भारतशी संवाद साधताना अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव सुशांत शेलार म्हणाले की, वरळीत अनेक दिवसांपासून विविध प्रश्न 'आ' वासून प्रलंबित आहेत. यामध्ये वरळी पुनर्वसन असो, कोळीवाडा, चाळीचे प्रश्न असो, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र इथले स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावामध्ये फक्त मोठेपण आहे. पण काम मात्र काहीच नाही. आदित्य ठाकरे हे मागील पाच वर्षांपासून येथे आमदार आहेत. मात्र कुठल्याही प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला नाही. त्यामुळेच त्यांच्याविषयी मतदारांमध्ये उदासीनता आहे. माझ्या नावात जरी ठाकरे नसले तरी जर पक्षाने मला उमेदवारीची जबाबदारी दिली, तर मी नक्कीच इथून निवडणूक लढवेन. जर निवडून आलो तर वरळीचा नक्कीच कायापालट करेन, असा विश्वास यावेळी अभिनेता सुशांत शेलार यांनी व्यक्त केलाय.

ठाकरेंनी काहीही केलं नाही : या मतदारसंघात 2019 पासून पाच वर्षं आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. अडीच वर्षे ते मंत्रीदेखील होते. मात्र वरळी मतदारसंघात कार्यक्रम आणि सभा घेण्याव्यतिरिक्त त्यांनी काहीही केलं नाही. हा मुंबईतील चर्चेतील मतदारसंघ आहे. येथे खूप काही विकासकामं करता आली अस ती. मात्र आदित्य ठाकरे यांनी कुठलीच विकासकामं केली नसल्याची टीका सुशांत शेलार यांनी केली. केवळ सरकारवर टीका करणे..., मुख्यमंत्र्यांवर टीका करणे एवढेच काम आदित्य ठाकरेंनी केलं आहे. मी एक सच्चा आणि कट्टर शिवसैनिक आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून बाळासाहेबांना ऐकत आलो आहे. बाळासाहेबांच्या भाषणाची प्रेरणा घेऊन मी शिवसेना पक्षासाठी काम करतोय. लहान वयापासून पक्षासाठी काम केलं..., पोस्टर चिकटवले आणि कार्यक्रमातून भाग घेतला. त्यामुळे मी एक सच्चा आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि इथे जरी भाजपाकडून सायना एनसी यांचे नाव चर्चेत असले तरी महायुतीकडून जर मला संधी मिळाली आणि निवडणूक लढवण्याची जबाबदारी मिळाली. तर मी नक्कीच लढवेल. आणि वरळीत बदल करण्याचा प्रयत्न करेन, असेही शेलार म्हणाले.

हेही वाचा -

  1. शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती
  2. ...अन् माझ्या पोटात गोळाच आला, उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.