ETV Bharat / sports

Happy Birthday T20I क्रिकेट...! 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाला होता T20I क्रिकेटचा जन्म - FIRST EVER T20I MATCH

आज जगात T20 क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. T20 केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच लोकप्रिय होत नाहीये तर आता अनेक देश या फॉरमॅटमध्ये स्वतःच्या लीगचं आयोजन करत आहेत.

Happy Birthday T20I Cricket
T20I क्रिकेट (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 17, 2025, 12:51 PM IST

दुबई Happy Birthday T20I Cricket : गेल्या काही वर्षांत T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटला आवडणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. हेच कारण आहे की आता अनेक देशांमध्ये T20 लीग आयोजित केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु होऊन आज 20 वर्ष पुर्ण झाले आहेत. खरंतर, पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 17 फेब्रुवारी 2005 रोजी खेळला गेला होता, ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर होते. या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला. हा सामना ऑकलंडमधील ईडन पार्क स्टेडियमवर झाला. या सामन्यात कांगारु संघाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग होता आणि किवी संघाचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग होता.

पॉन्टिंगची तुफानी खेळी : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिकी पॉन्टिंग (नाबाद 98) च्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 5 बाद 214 धावांचा मोठा डोंगर उभा केला. पॉन्टिंगनं 55 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच वेळी, चांगली सुरुवात असूनही न्यूझीलंड संघ लक्ष्य गाठू शकला नाही. स्कॉट स्टायरिस (66) आणि ब्रेंडन मॅक्युलम (36) यांच्या महत्त्वपूर्ण खेळी असूनही किवी संघ 20 षटकांत 170 धावांतच बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल कॅस्प्रोविचनं 4 आणि ग्लेन मॅकग्रानं 2 विकेट घेतल्या. पॉन्टिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

का सुरु झालं T20 क्रिकेट : T20 हा क्रिकेटचा सर्वात लहान फॉरमॅट आहे. व्यावसायिक पातळीवर मूळतः इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) 2003 मध्ये आंतर-काउंटी स्पर्धा म्हणून सुरु केली होती. क्रिकेटला चालना देणं हा त्याचा उद्देश होता, ज्यामुळं स्टेडियम आणि टेलिव्हिजनवर प्रेक्षकांची संख्या वाढेल. क्रिकेटच्या जगात हा फॉरमॅट आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. बहुतेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये किमान एक T20 सामना असतो. त्याचं यश पाहून, पहिल्या T20 विश्वचषकाचं आयोजन फक्त दोन वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये करण्यात आलं. या स्पर्धेचं विजेतेपद महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकलं.

भारतानं पहिला T20 सामना कधी खेळला : भारतीय पुरुष संघानं 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्गच्या वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारतीय संघ एकमेव T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेला होता. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही भारतीय संघात होता. हा त्याचा पहिला आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना होता. भारतीय संघानं एक चेंडू आणि 6 विकेट शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व ग्रॅमी स्मिथनं केलं होतं.

हेही वाचा :

  1. टीम इंडियाला Champions Trophy मध्ये 'या' संघाविरुद्ध कधीही मिळाला नाही विजय
  2. 13 शहरं, 65 दिवस, 74 सामने... IPL मध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार; वाचा A टू Z

दुबई Happy Birthday T20I Cricket : गेल्या काही वर्षांत T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटला आवडणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. हेच कारण आहे की आता अनेक देशांमध्ये T20 लीग आयोजित केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु होऊन आज 20 वर्ष पुर्ण झाले आहेत. खरंतर, पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 17 फेब्रुवारी 2005 रोजी खेळला गेला होता, ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर होते. या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला. हा सामना ऑकलंडमधील ईडन पार्क स्टेडियमवर झाला. या सामन्यात कांगारु संघाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग होता आणि किवी संघाचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग होता.

पॉन्टिंगची तुफानी खेळी : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिकी पॉन्टिंग (नाबाद 98) च्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 5 बाद 214 धावांचा मोठा डोंगर उभा केला. पॉन्टिंगनं 55 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच वेळी, चांगली सुरुवात असूनही न्यूझीलंड संघ लक्ष्य गाठू शकला नाही. स्कॉट स्टायरिस (66) आणि ब्रेंडन मॅक्युलम (36) यांच्या महत्त्वपूर्ण खेळी असूनही किवी संघ 20 षटकांत 170 धावांतच बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल कॅस्प्रोविचनं 4 आणि ग्लेन मॅकग्रानं 2 विकेट घेतल्या. पॉन्टिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

का सुरु झालं T20 क्रिकेट : T20 हा क्रिकेटचा सर्वात लहान फॉरमॅट आहे. व्यावसायिक पातळीवर मूळतः इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) 2003 मध्ये आंतर-काउंटी स्पर्धा म्हणून सुरु केली होती. क्रिकेटला चालना देणं हा त्याचा उद्देश होता, ज्यामुळं स्टेडियम आणि टेलिव्हिजनवर प्रेक्षकांची संख्या वाढेल. क्रिकेटच्या जगात हा फॉरमॅट आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. बहुतेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये किमान एक T20 सामना असतो. त्याचं यश पाहून, पहिल्या T20 विश्वचषकाचं आयोजन फक्त दोन वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये करण्यात आलं. या स्पर्धेचं विजेतेपद महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकलं.

भारतानं पहिला T20 सामना कधी खेळला : भारतीय पुरुष संघानं 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्गच्या वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारतीय संघ एकमेव T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेला होता. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही भारतीय संघात होता. हा त्याचा पहिला आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना होता. भारतीय संघानं एक चेंडू आणि 6 विकेट शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व ग्रॅमी स्मिथनं केलं होतं.

हेही वाचा :

  1. टीम इंडियाला Champions Trophy मध्ये 'या' संघाविरुद्ध कधीही मिळाला नाही विजय
  2. 13 शहरं, 65 दिवस, 74 सामने... IPL मध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार; वाचा A टू Z
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.