ETV Bharat / politics

रावसाहेब दानवेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं उद्धव ठाकरेंची 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार? काय आहेत कारणं? वाचा स्पेशल रिपोर्ट - Vidhan Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 5:44 PM IST

Updated : Sep 4, 2024, 6:16 PM IST

Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडल्यानं युतीचं मोठं नुकसान झालं, असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलय. मात्र अचानक दानवे असं का बोलले, यामागं नेमकं कारण काय? वाचा स्पेशल रिपोर्ट.

Vidhan Sabha Election 2024
शरद पवार, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे (Source - ETV Bharat)

मुंबई Vidhan Sabha Election 2024 : बदलापूर अत्याचार आणि मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केलीय. महाविकास आघाडीकडून जागावाटप आणि उमेदवारांच्या चाचण्यांबाबत बैठका सुरू आहेत. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला लोकसभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरे यांनी मागणी केली, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतलीय.

जयंत माईणकर (Source - ETV Bharat Reporter)

माजी खासदार आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं. "उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडल्यानं युतीचं मोठं नुकसान झालं." असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षानं आतापासूनच विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जागांची मागणी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. याची नेमकी कारणं काय आहेत? यावर एक नजर टाकू.

ज्यांचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री : गेल्या महिन्यात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) आणि काँग्रेसला महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं जाहीर आवाहन केलं. मात्र, काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली. यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे, असं सांगितलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना पवारांनी 'ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल', असं सूचक विधान केलं. दुसरीकडे काँग्रेसनं देखील आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल असं स्पष्ट केलं. परंतु लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यामुळं आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना आहे. मात्र, ठाकरेंना मित्रपक्षांकडून हिरवा कंदील मिळत नसल्यानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं सूत्र अशी खेळीही शरद पवार खेळू शकतात, असंही तज्ञ आणि राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

ठाकरेंमुळं नवसंजीवनी : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकूण 31 जागा जिंकल्या. महायुतीनं 40 प्लसचा नारा दिला होता, मात्र त्यांना 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीत काँग्रेसचे 13, शिवसेना (ठाकरे) 9 आणि शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, विधानसभा निवडणुकीत आपलंच सरकार येणार असल्याचा दावा मविआचे नेते करतायत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. कारण 2019 ला राज्यात काँग्रेसचा 1 खासदार होता, आता 13 खासदार आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 8 खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी काही जणांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी ठाकरेंसोबत कायम राहण्याचं ठरवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढली. विशेषतः मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे वळले. याचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत झाला. उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला झाला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) जी मरगळ होती. ती मरगळ उद्धव ठाकरेंमुळे दूर गेली. ठाकरेंच्या साथीमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जात आहे. याचाच फायदा उद्धव ठाकरे आता जागावाटपात घेण्याची शक्यता आहे. त्यातच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं ठाकरेंचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.



बार्गेनिंग पॉवर वाढणार नाही : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असं सांगितलं असलं तरी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे काँग्रेसला उद्धव ठाकरे नको आहेत. तसंच युतीमध्ये ही भाजपाला उद्धव ठाकरे नकोत. वेळ पडली तर उद्धव ठाकरेंना वेगळं करून काँग्रेस आणि शरद पवार एकत्र निवडणूक लढवतील, असं धक्कादायक विधान राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी केलं. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळं जागावाटपात उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असं वाटत नाही, असंही जयंत माईणकर यांनीही ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्रातील जनता आमची पॉवर : रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळं आमचा आत्मविश्वास वाढण्याचं काहीच कारण नाही. उद्या त्यांनी आमच्यावर टीका केली, तर आमचं खच्चीकरण झालं, असंही बोलायला लोक मोकळे होतील. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकशाही मार्गानं निवडणूक लढतील. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत आमची बार्गेनिंग पॉवर वाढेल किंवा जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं म्हणण्याची गरज नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून सकारात्मक तोडगा काढतील. पण आमची बार्गेनिंग पॉवर वाढण्यास दानवेंचं विधान कारणीभूत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्रातील जनता आमची पॉवर आहे. जनताच कोणाला निवडून द्यायचं हे ठरवेल," अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी भारत "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.

हेही वाचा

  1. शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागत नाही, मग गृहखाते काय करते? संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut News
  2. महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदी कोण होणार? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य - Sharad Pawar News
  3. भाजपाला रामराम ठोकत समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; हसन मुश्रीफांचं वाढलं टेन्शन - Samarjeet Ghatge Joined NCP SP

मुंबई Vidhan Sabha Election 2024 : बदलापूर अत्याचार आणि मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केलीय. महाविकास आघाडीकडून जागावाटप आणि उमेदवारांच्या चाचण्यांबाबत बैठका सुरू आहेत. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला लोकसभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरे यांनी मागणी केली, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतलीय.

जयंत माईणकर (Source - ETV Bharat Reporter)

माजी खासदार आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं. "उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडल्यानं युतीचं मोठं नुकसान झालं." असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षानं आतापासूनच विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जागांची मागणी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. याची नेमकी कारणं काय आहेत? यावर एक नजर टाकू.

ज्यांचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री : गेल्या महिन्यात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) आणि काँग्रेसला महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं जाहीर आवाहन केलं. मात्र, काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली. यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे, असं सांगितलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना पवारांनी 'ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल', असं सूचक विधान केलं. दुसरीकडे काँग्रेसनं देखील आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल असं स्पष्ट केलं. परंतु लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यामुळं आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना आहे. मात्र, ठाकरेंना मित्रपक्षांकडून हिरवा कंदील मिळत नसल्यानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं सूत्र अशी खेळीही शरद पवार खेळू शकतात, असंही तज्ञ आणि राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

ठाकरेंमुळं नवसंजीवनी : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकूण 31 जागा जिंकल्या. महायुतीनं 40 प्लसचा नारा दिला होता, मात्र त्यांना 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीत काँग्रेसचे 13, शिवसेना (ठाकरे) 9 आणि शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, विधानसभा निवडणुकीत आपलंच सरकार येणार असल्याचा दावा मविआचे नेते करतायत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. कारण 2019 ला राज्यात काँग्रेसचा 1 खासदार होता, आता 13 खासदार आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 8 खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी काही जणांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी ठाकरेंसोबत कायम राहण्याचं ठरवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढली. विशेषतः मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे वळले. याचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत झाला. उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला झाला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) जी मरगळ होती. ती मरगळ उद्धव ठाकरेंमुळे दूर गेली. ठाकरेंच्या साथीमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जात आहे. याचाच फायदा उद्धव ठाकरे आता जागावाटपात घेण्याची शक्यता आहे. त्यातच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं ठाकरेंचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.



बार्गेनिंग पॉवर वाढणार नाही : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असं सांगितलं असलं तरी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे काँग्रेसला उद्धव ठाकरे नको आहेत. तसंच युतीमध्ये ही भाजपाला उद्धव ठाकरे नकोत. वेळ पडली तर उद्धव ठाकरेंना वेगळं करून काँग्रेस आणि शरद पवार एकत्र निवडणूक लढवतील, असं धक्कादायक विधान राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी केलं. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळं जागावाटपात उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असं वाटत नाही, असंही जयंत माईणकर यांनीही ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्रातील जनता आमची पॉवर : रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळं आमचा आत्मविश्वास वाढण्याचं काहीच कारण नाही. उद्या त्यांनी आमच्यावर टीका केली, तर आमचं खच्चीकरण झालं, असंही बोलायला लोक मोकळे होतील. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकशाही मार्गानं निवडणूक लढतील. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत आमची बार्गेनिंग पॉवर वाढेल किंवा जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं म्हणण्याची गरज नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून सकारात्मक तोडगा काढतील. पण आमची बार्गेनिंग पॉवर वाढण्यास दानवेंचं विधान कारणीभूत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्रातील जनता आमची पॉवर आहे. जनताच कोणाला निवडून द्यायचं हे ठरवेल," अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी भारत "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.

हेही वाचा

  1. शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागत नाही, मग गृहखाते काय करते? संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut News
  2. महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदी कोण होणार? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य - Sharad Pawar News
  3. भाजपाला रामराम ठोकत समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; हसन मुश्रीफांचं वाढलं टेन्शन - Samarjeet Ghatge Joined NCP SP
Last Updated : Sep 4, 2024, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.