ETV Bharat / politics

तृणमुल काँग्रेसच्या महासचिवांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर घेतली भेट, एनडीएला थोपविण्याचे प्रयत्न? - NDA govt formation

author img

By PTI

Published : Jun 7, 2024, 9:16 AM IST

Updated : Jun 7, 2024, 9:28 AM IST

आणि तृणमुल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Abhishek Banerjee meets Uddhav Thackeray
Abhishek Banerjee meets Uddhav Thackeray (Source- Abhishek Banerjee X Media/ETV Bharat Reporter)

मुंबई- एनडीएकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना इंडिया आघाडीतही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमुल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही बैठक एक तासाहून अधिक काळ चालली.

उद्धव ठाकरे आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातील बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत दोन्ही पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायनदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी मातोश्री बाहेर थांबलेल्या माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री तृणमुल नेत्यांच्या भेटीचे फोटो एक्स मीडियावर पोस्ट केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले," आम्ही आमच्या संविधान आणि लोकशाहीसाठी लढण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी एकत्र आहोत."

शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. खासदार राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे बुधवारी भारतीय आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीत आले नव्हते. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. भारतीय आघाडीचा आणखी घटक असलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) नेतेही उद्धव ठाकरेंशी बोलले आहे.

सरकार स्थापन करून 'खिचडी' शिजवण्याचा प्रयत्न- एनडीकडून सरकार स्थापन होणार असताना संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते राऊत म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. परंतु तरीही सरकार स्थापनेसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सरकार स्थापन करून 'खिचडी' शिजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते खिचडी नीट शिजवणार नाहीत. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊन देशात असा आम्हाला संशय आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो?

इंडिया आघाडीकडून एनडीएला थोपविण्याचे प्रयत्न सुरू-इंडिया आघाडीनं २३० जागांवर विजय मिळाल्यानंतर विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडं एनडीएकडून सरकार स्थापनेकरिता तयारी सुरू आहे. अशावेळी तृणमुलच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्यानं राजकीय तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली

एनडीए आणि इंडिया आघाडीचे कसे आहे बलाबल-भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकसभा निवडणुकीत २९३ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे एनडीएला २७२ जागांचे बहुमत गाठणं शक्य झालं. त्यापैकी एकट्या भाजपाकडे २४० खासदार आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षात असलेल्या इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय मिळाला. त्यापैकी ९९ जागा काँग्रेसच्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला (UBT) महाराष्ट्रात ९ आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 29 जागावर विजय मिळाला. हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा घटक असल्यानं बॅनर्जी-ठाकरे यांच्या भेटीबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत.

हेही वाचा-

  1. उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी, काय आहेत कारणं? - Lok Sabha Election Results 2024
  2. शरद पवारांची चाणाक्य नीती त्याला उद्धव ठाकरेंची साथ, पडली महायुतीवर भारी; 45 पार म्हणणारे सपशेल फेल - Lok Sabha Result 2024
  3. पराभव अशक्य हा गैरसमज दूर केला, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला - Uddhav Thackeray

मुंबई- एनडीएकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना इंडिया आघाडीतही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमुल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही बैठक एक तासाहून अधिक काळ चालली.

उद्धव ठाकरे आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातील बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत दोन्ही पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायनदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी मातोश्री बाहेर थांबलेल्या माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री तृणमुल नेत्यांच्या भेटीचे फोटो एक्स मीडियावर पोस्ट केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले," आम्ही आमच्या संविधान आणि लोकशाहीसाठी लढण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी एकत्र आहोत."

शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. खासदार राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे बुधवारी भारतीय आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीत आले नव्हते. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. भारतीय आघाडीचा आणखी घटक असलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) नेतेही उद्धव ठाकरेंशी बोलले आहे.

सरकार स्थापन करून 'खिचडी' शिजवण्याचा प्रयत्न- एनडीकडून सरकार स्थापन होणार असताना संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते राऊत म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. परंतु तरीही सरकार स्थापनेसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सरकार स्थापन करून 'खिचडी' शिजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते खिचडी नीट शिजवणार नाहीत. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊन देशात असा आम्हाला संशय आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो?

इंडिया आघाडीकडून एनडीएला थोपविण्याचे प्रयत्न सुरू-इंडिया आघाडीनं २३० जागांवर विजय मिळाल्यानंतर विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडं एनडीएकडून सरकार स्थापनेकरिता तयारी सुरू आहे. अशावेळी तृणमुलच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्यानं राजकीय तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली

एनडीए आणि इंडिया आघाडीचे कसे आहे बलाबल-भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकसभा निवडणुकीत २९३ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे एनडीएला २७२ जागांचे बहुमत गाठणं शक्य झालं. त्यापैकी एकट्या भाजपाकडे २४० खासदार आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षात असलेल्या इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय मिळाला. त्यापैकी ९९ जागा काँग्रेसच्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला (UBT) महाराष्ट्रात ९ आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 29 जागावर विजय मिळाला. हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा घटक असल्यानं बॅनर्जी-ठाकरे यांच्या भेटीबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत.

हेही वाचा-

  1. उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी, काय आहेत कारणं? - Lok Sabha Election Results 2024
  2. शरद पवारांची चाणाक्य नीती त्याला उद्धव ठाकरेंची साथ, पडली महायुतीवर भारी; 45 पार म्हणणारे सपशेल फेल - Lok Sabha Result 2024
  3. पराभव अशक्य हा गैरसमज दूर केला, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला - Uddhav Thackeray
Last Updated : Jun 7, 2024, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.