ETV Bharat / politics

रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा हवाच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी - Ramdas Athawale

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 9:04 PM IST

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा अशी मागणी महायुतीकडे केलीय. तसंच त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रीपद देण्यात यावं असंही म्हटलंय.

Ramdas Athawal
रामदास आठवलें (Etv Bharat)

मुंबई Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं महायुतीला लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान केलं आहे. यापुढंही महायुतीला आरपीआयकडून मदत होणार आहे. मात्र त्याबाबत महायुतीकडूनही आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा असा पुनरुच्चार रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत केला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या पक्षाला एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची एक जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

रामदास आठवले (ETV Bharat Reporter)

मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईंला एक मंत्रिपद द्यावं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा आणि या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी केली. तसंच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्येसुद्धा रिपाईं पक्षाला एक पद देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर दोन महामंडळं आणि तालुका समित्यांमध्ये रिपाईंच्या कार्यकर्त्यांना समाविष्ट करुन घेण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रिपाईंकडून मतदान : नुकत्याच झालेल्या लोकसभेत सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं. हे मतदान महायुतीच्या पारड्यात पडलं असून काही मतं जर इकडं तिकडं गेली असतील तर आगामी विधानसभा निवडणुकीत ती मतंसुद्धा जाणार नाही आणि सर्व रिपाईंची मतं महायुतीलाच मिळतील अशी ग्वाही यावेळी आठवले यांनी दिली.

सर्वसमावेशक अर्थसंकल्प : राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत बोलताना आठवले म्हणाले, "हा अर्थसंकल्प राज्यातील गरीब, दलित, आदिवासी, महिला अशा सर्व घटकांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पक्षाला 170 ते 180 जागा मिळतील" असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde
  2. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut
  3. पुण्याचं नाव खराब होईल असं वक्तव्य करु नये; 'त्या' वक्तव्यावरुन मुरलीधर मोहोळांचा राऊतांना इशारा - Murlidhar Mohol

मुंबई Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं महायुतीला लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान केलं आहे. यापुढंही महायुतीला आरपीआयकडून मदत होणार आहे. मात्र त्याबाबत महायुतीकडूनही आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा असा पुनरुच्चार रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत केला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या पक्षाला एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची एक जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

रामदास आठवले (ETV Bharat Reporter)

मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईंला एक मंत्रिपद द्यावं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा आणि या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी केली. तसंच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्येसुद्धा रिपाईं पक्षाला एक पद देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर दोन महामंडळं आणि तालुका समित्यांमध्ये रिपाईंच्या कार्यकर्त्यांना समाविष्ट करुन घेण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रिपाईंकडून मतदान : नुकत्याच झालेल्या लोकसभेत सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं. हे मतदान महायुतीच्या पारड्यात पडलं असून काही मतं जर इकडं तिकडं गेली असतील तर आगामी विधानसभा निवडणुकीत ती मतंसुद्धा जाणार नाही आणि सर्व रिपाईंची मतं महायुतीलाच मिळतील अशी ग्वाही यावेळी आठवले यांनी दिली.

सर्वसमावेशक अर्थसंकल्प : राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत बोलताना आठवले म्हणाले, "हा अर्थसंकल्प राज्यातील गरीब, दलित, आदिवासी, महिला अशा सर्व घटकांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पक्षाला 170 ते 180 जागा मिळतील" असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde
  2. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut
  3. पुण्याचं नाव खराब होईल असं वक्तव्य करु नये; 'त्या' वक्तव्यावरुन मुरलीधर मोहोळांचा राऊतांना इशारा - Murlidhar Mohol
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.