ETV Bharat / politics

मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानाने नवीन वाद; भाजपाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास तर पुसला जात नाही ना? विरोधकांचा सवाल - Mohan Bhagwat On Shivaji Maharaj

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 5:00 PM IST

Updated : Sep 11, 2024, 6:41 PM IST

Mohan Bhagwat On Shivaji Maharaj : मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) समाधीवरून केलेल्या वक्तव्यामुळं,आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Shivaji Maharaj And  Mohan Bhagwat
शिवाजी महाराज आणि मोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)

मुंबई Mohan Bhagwat On Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. घटनेमुळं महायुती सरकार धास्तवलेलं असतानाच आता सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून केलेल्या वक्तव्यामुळं, पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी शिवाजी महाराजांबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेलं वक्तव्य, त्याबरोबर मोहन भागवत याचं वक्तव्य या कारणानं भाजपाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास तर पुसला जात नाही ना? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे.

प्रतिक्रिया देताना मोहन भागवत,छगन भुजबळ,देवेंद्र फडणवीस,श्रीमंत कोकाटे (ETV BHARAT Reporter)


काय आहे वक्तव्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं, "इंग्रजांच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज येथून होऊन गेले. इथे देखील त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनीच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली", रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. आशा प्रकारचा भ्रम निर्माण करणारं वक्तव्य केल्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



इतिहास कोणालाही बदलता येणार नाही - भुजबळ : मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली आहे. हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. तसंच शिवजयंती देखील त्यांनी सुरू केली असल्याचं भुजबळ यांनी म्हटंल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पहिला पोवाडा देखील महात्मा फुले यांनीच लिहिला, असंही भुजबळ यांनी सांगितलं.


भागवतांचे वक्तव्य दिशाभूल करणारे - वडेट्टीवार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधल्याचं इतिहास सांगतो. तसे पुरावे देखील आहेत. संघाचे लोक काहीही शोध लावतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात सुरत लुटलीच नाही, तर इतिहासकार म्हणतात सुरत लुटली. त्यामुळं मोहन भागवत यांचं वक्तव्य दिशाभूल करणारं आहे. तर राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याविषयीचं वक्तव्य आपण ऐकलं नसून त्यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचं म्हटलं.

Jitendra Awad Tweet
जितेंद्र आव्हाड ट्विट (X Post)


इतिहासाच्या कुठल्या पानावर लिहिले - आव्हाड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट मोहन भागवत यांनाच प्रश्न विचारला. इतिहासाच्या कुठल्या पानावर लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधून काढली? मात्र, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढल्याबाबत इतिहासकारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यावेळी मनुवाद्यांनी फुले यांना त्रास दिला होता. आपण जे बोलतात त्याला आम्ही इतिहासाचं विकृतीकरण म्हणतो.


खोटा इतिहास सांगू नये - श्रीमंत कोकाटे : इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचे दैवत आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रांतीचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज आहेत. देशातील अनेक महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सामाजिक आणि स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. ज्यात भगतसिंग, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक होते. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी प्रथम महात्मा फुले यांनी 1869 साली शोधून काढली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला. देशात पहिल्यांदा शिवजयंती शिवोत्सवाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली. टिळकांच्या अगोदर महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरू केली. खोटा इतिहास सांगू नये, त्याचा विपर्यास करू नये, अशा प्रकारची विनंती देखील श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.


हेही वाचा -

  1. "ज्यांच्या मनातच 'शिवद्रोह' त्यांना महाराजांचा इतिहास काय कळणार", जयंत पाटील यांनी पुराव्यासह दिलं प्रत्युत्तर - Shivaji Maharaj Statue Collapse
  2. "माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Shivaji Maharaj Statue Collapse
  3. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - shivaji maharaj statue collapse

मुंबई Mohan Bhagwat On Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. घटनेमुळं महायुती सरकार धास्तवलेलं असतानाच आता सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून केलेल्या वक्तव्यामुळं, पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी शिवाजी महाराजांबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेलं वक्तव्य, त्याबरोबर मोहन भागवत याचं वक्तव्य या कारणानं भाजपाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास तर पुसला जात नाही ना? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे.

प्रतिक्रिया देताना मोहन भागवत,छगन भुजबळ,देवेंद्र फडणवीस,श्रीमंत कोकाटे (ETV BHARAT Reporter)


काय आहे वक्तव्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं, "इंग्रजांच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज येथून होऊन गेले. इथे देखील त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनीच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली", रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. आशा प्रकारचा भ्रम निर्माण करणारं वक्तव्य केल्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



इतिहास कोणालाही बदलता येणार नाही - भुजबळ : मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली आहे. हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. तसंच शिवजयंती देखील त्यांनी सुरू केली असल्याचं भुजबळ यांनी म्हटंल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पहिला पोवाडा देखील महात्मा फुले यांनीच लिहिला, असंही भुजबळ यांनी सांगितलं.


भागवतांचे वक्तव्य दिशाभूल करणारे - वडेट्टीवार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधल्याचं इतिहास सांगतो. तसे पुरावे देखील आहेत. संघाचे लोक काहीही शोध लावतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात सुरत लुटलीच नाही, तर इतिहासकार म्हणतात सुरत लुटली. त्यामुळं मोहन भागवत यांचं वक्तव्य दिशाभूल करणारं आहे. तर राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याविषयीचं वक्तव्य आपण ऐकलं नसून त्यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचं म्हटलं.

Jitendra Awad Tweet
जितेंद्र आव्हाड ट्विट (X Post)


इतिहासाच्या कुठल्या पानावर लिहिले - आव्हाड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट मोहन भागवत यांनाच प्रश्न विचारला. इतिहासाच्या कुठल्या पानावर लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधून काढली? मात्र, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढल्याबाबत इतिहासकारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यावेळी मनुवाद्यांनी फुले यांना त्रास दिला होता. आपण जे बोलतात त्याला आम्ही इतिहासाचं विकृतीकरण म्हणतो.


खोटा इतिहास सांगू नये - श्रीमंत कोकाटे : इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचे दैवत आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रांतीचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज आहेत. देशातील अनेक महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सामाजिक आणि स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. ज्यात भगतसिंग, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक होते. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी प्रथम महात्मा फुले यांनी 1869 साली शोधून काढली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला. देशात पहिल्यांदा शिवजयंती शिवोत्सवाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली. टिळकांच्या अगोदर महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरू केली. खोटा इतिहास सांगू नये, त्याचा विपर्यास करू नये, अशा प्रकारची विनंती देखील श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.


हेही वाचा -

  1. "ज्यांच्या मनातच 'शिवद्रोह' त्यांना महाराजांचा इतिहास काय कळणार", जयंत पाटील यांनी पुराव्यासह दिलं प्रत्युत्तर - Shivaji Maharaj Statue Collapse
  2. "माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Shivaji Maharaj Statue Collapse
  3. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - shivaji maharaj statue collapse
Last Updated : Sep 11, 2024, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.