पुणे Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर (shivneri Fort) झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj Jayanti) स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा (Shiv jayanti 2024) याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर आणि रयतेवर जीवापाड प्रेम केलं. राज्यातील ऐतिहासिक गड किल्ले हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. तर शिवाजी महाराजांनी एकूण १६० किल्ले जिंकले आहेत. यातील पाच किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत.
![shivneri Fort](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-02-2024/20772085_shivneri.jpg)
- शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळं या किल्ल्याला इतिहासामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाई देवीचं मंदिर आहे. शिवनेरीवर 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
![Murud Janjira Fort](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-02-2024/20772085_murud-janjira-fort.jpg)
- मुरुड जंजिरा किल्ला (Murud Janjira Fort) : मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील अलिबागपासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुड किनाऱ्यावरील बेटावर स्थित एक शक्तिशाली किल्ला आहे. मुरुड जंजिरा किल्ला सुमारे 350 वर्ष जुना असल्याचं मानलं जातं. तो बांधण्यास 22 वर्षे लागली होती.
![Daulatabad Fort](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-02-2024/20772085_daulatabad-fort.jpg)
- दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort) : प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये आणखी एक नाव म्हणजे दौलताबादचा किल्ला. याला देवगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखतात. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात असणारा हा किल्ला इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. शत्रूला गडावर चाल करताच येऊ नये अशी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती. संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या किल्ल्यावर येण्यासाठी 750 पायऱ्या चढाव्या लागतात.
![Vijaydurg Fort](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-02-2024/20772085_vijaydurg-fort.jpeg)
- विजयदुर्ग किल्ला (Vijaydurg Fort) : हा सिंधुदुर्गातील एक सर्वात जुना किल्ला असून, कोकण किनारपट्टीवरील हा एक अद्भूत किल्ला ठरतो. राजा भोज दुसरा यांच्या कालखंडात या किल्ल्याची निर्मिती करण्यात आल्याचा संदर्भ आढळतो.
![Purandar Fort](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-02-2024/20772085_purandar-fort.jpg)
- पुरंदर किल्ला (Purandar Fort): पुण्यातल्या पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाचा म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंचा जन्म झाला होता. या गडाला बालेकिल्ला आणि दिल्ली दरवाजा असे दोन भाग आहेत.
हेही वाचा -