ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाचा 10 वा दिवस : सात जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंदच; शेतकरी दोन दिवसांनी करणार दिल्लीकडं कूच

Farmers Protest 10th Day : आज शेतकरी आंदोलनाचा दहावा दिवस आहे. बुधवारी एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. या आदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील सात जिल्ह्यात इंटरनेट सेवेवरील बंदी आणखी वाढवण्यात आलीय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 9:51 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली Farmers Protest 10th Day : बुधवारी हरियाणातील जिंदजवळील खनौरी सीमेवर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) नं आज हरियाणात दोन तासांच्या चक्का जामची घोषणा केलीय. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी व्हिडिओद्वारे या निर्णयाची माहिती दिलीय. तसंच 23 फेब्रुवारीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

आज हरियाणात चक्का जाम : पंजाब-हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आणि हरियाणा पोलिसांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. शंभू बॉर्डर आणि खनौरी सीमेवरील परिस्थिती अत्यंत बिकट झालीय. बुधवारी पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणाचा खनौरी सीमेवर मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) आज दुपारी 12 ते 2 या वेळेत हरियाणात चक्का जाम आंदोलन करणार आहे.

काय म्हणाले बीकेयूचे अध्यक्ष : बीकेयूचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलंय की, "तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनं सर्वांना धक्का बसलाय. संघटनेनं 22 फेब्रुवारीला हरियाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याची घोषणा केली होती. मात्र आता तो रद्द करुन तरुणाच्या मृत्यूच्या विरोधात संपूर्ण हरियाणात 2 तास रास्ता रोको करणार आहोत. या चक्का जाममध्ये बीकेयूचे लोक आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. तसंच 23 फेब्रुवारीला बीकेयू पुन्हा एकदा आपल्या संघटनेच्या अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करुन शेतकरी आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेणार आहे."

दोन दिवसांनी करणार दिल्लीकडं कूच : बुधवारीही शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या. खनौरी घटनेनंतर हरियाणातही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. हरियाणातील शेतकरी संघटना आणि खाप पंचायतींनी 'किसान दिल्ली मोर्चा'ला आधीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीला पुन्हा दिल्लीकडं कूच करण्याची घोषणा केली होती. शंभू सीमेवरील बॅरिकेड तोडण्यासाठी अवजड मशिनही मागवण्यात आल्या होत्या. मात्र खनौरी हद्दीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं दिल्लीकडं कूच करण्याचा निर्णय 2 दिवस पुढं ढकलण्यात आलाय.

हरियाणातील 7 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंदच : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारनं 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेटवर असलेली बंदी पुन्हा वाढवलीय. आता अंबाला, कुरुक्षेत्र, हिस्सार, फतेहाबाद, सिरसा, कैथल, जिंद या जिल्ह्यांमध्ये 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत मोबाईल इंटरनेटवर बंदी असेल, असं परिपत्रक हरियाणा सरकारनं काढलंय.

हेही वाचा :

  1. शेतकरी आंदोलनाचा आज 9 वा दिवस; आतापर्यंत चौघांचा मृत्यू, आंदोलक दिल्लीकडं कूच करण्यास पुन्हा सज्ज
  2. सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ; शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार
  3. शेतकरी आंदोलकांच्या हल्ल्यात 12 जवान जखमी, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा

नवी दिल्ली Farmers Protest 10th Day : बुधवारी हरियाणातील जिंदजवळील खनौरी सीमेवर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) नं आज हरियाणात दोन तासांच्या चक्का जामची घोषणा केलीय. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी व्हिडिओद्वारे या निर्णयाची माहिती दिलीय. तसंच 23 फेब्रुवारीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

आज हरियाणात चक्का जाम : पंजाब-हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आणि हरियाणा पोलिसांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. शंभू बॉर्डर आणि खनौरी सीमेवरील परिस्थिती अत्यंत बिकट झालीय. बुधवारी पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणाचा खनौरी सीमेवर मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) आज दुपारी 12 ते 2 या वेळेत हरियाणात चक्का जाम आंदोलन करणार आहे.

काय म्हणाले बीकेयूचे अध्यक्ष : बीकेयूचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलंय की, "तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनं सर्वांना धक्का बसलाय. संघटनेनं 22 फेब्रुवारीला हरियाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याची घोषणा केली होती. मात्र आता तो रद्द करुन तरुणाच्या मृत्यूच्या विरोधात संपूर्ण हरियाणात 2 तास रास्ता रोको करणार आहोत. या चक्का जाममध्ये बीकेयूचे लोक आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. तसंच 23 फेब्रुवारीला बीकेयू पुन्हा एकदा आपल्या संघटनेच्या अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करुन शेतकरी आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेणार आहे."

दोन दिवसांनी करणार दिल्लीकडं कूच : बुधवारीही शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या. खनौरी घटनेनंतर हरियाणातही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. हरियाणातील शेतकरी संघटना आणि खाप पंचायतींनी 'किसान दिल्ली मोर्चा'ला आधीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीला पुन्हा दिल्लीकडं कूच करण्याची घोषणा केली होती. शंभू सीमेवरील बॅरिकेड तोडण्यासाठी अवजड मशिनही मागवण्यात आल्या होत्या. मात्र खनौरी हद्दीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं दिल्लीकडं कूच करण्याचा निर्णय 2 दिवस पुढं ढकलण्यात आलाय.

हरियाणातील 7 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंदच : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारनं 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेटवर असलेली बंदी पुन्हा वाढवलीय. आता अंबाला, कुरुक्षेत्र, हिस्सार, फतेहाबाद, सिरसा, कैथल, जिंद या जिल्ह्यांमध्ये 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत मोबाईल इंटरनेटवर बंदी असेल, असं परिपत्रक हरियाणा सरकारनं काढलंय.

हेही वाचा :

  1. शेतकरी आंदोलनाचा आज 9 वा दिवस; आतापर्यंत चौघांचा मृत्यू, आंदोलक दिल्लीकडं कूच करण्यास पुन्हा सज्ज
  2. सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ; शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार
  3. शेतकरी आंदोलकांच्या हल्ल्यात 12 जवान जखमी, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.