ETV Bharat / bharat

आयएएस होण्याच्या स्वप्नावर फिरलं पाणी, स्टडी सेंटरमधील पावसाच्या पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू - RAJENDRA NAGAR WATERLOGGING

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 7:46 AM IST

Updated : Jul 28, 2024, 8:44 AM IST

Delhi Coaching Incident : दिल्लीत मुसधळार मुसळधार पावसानंतर एका स्टडी सेंटरच्या तळघरात पाणी भरलं. या पण्यात बुडून दोन विद्यार्थिनीसह एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी या दुर्घटनेची चौकशी सुरू करून 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Rajendra Nagar Waterlogging
Rajendra Nagar Waterlogging (Source - ETV Bharat)

नवी दिल्ली Rajendra Nagar Waterlogging : दिल्लीत पावसाने धुमाकूळ केला आहे. आयएएसच्या कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्या राजेंद्र नगर येथील 'राऊस आयएएस स्टडी सेंटर'च्या तळघरात पाणी भरले. या पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. दिल्ली सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्ली पोलिसचे सेंट्रल डिस्ट्रिक्ट डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, "आम्हाला संध्याकाळी 7 वाजता एका स्टडी सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची माहिती मिळाली. फोन करणाऱ्यानं सांगितलं की, तिथे काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण तळघर पाण्यानं कसं भरलं? याचा तपास करत आहोत."

शिक्षण मंत्री आतिशी यांची प्रतिक्रिया : स्टडी सेंटरमध्ये पाणी भरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेवर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, "अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित आहेत. मुख्य सचिव नरेश कुमार यांना या घटनेची चौकशी सुरू करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. माझंही घटनास्थळावर लक्ष आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्यांना माफ केलं जाणार नाही."

तळघरात 30 विद्यार्थी होते : दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "आम्हाला संध्याकाळी 7.15 वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आम्ही पंप लावून पाणी बाहेर काढलं. आम्ही तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. एकूण तीन जण पाण्यात अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते."

दिल्ली सरकारचा निष्काळजीपणा : भारतीय जनता पार्टी दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी घटनास्थळी भेट दिली. "या घटनेला आम आदमी पक्षाचे सरकार जबाबदार आहे. स्थानिक लोकांनी नाले साफ करण्याचं वारंवार आवाहन करूनही येथल्या आमदारानं त्याकडं दुर्लक्ष केलं. या अपघाताला दिल्ली सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. जलमंत्री आतिशी आणि स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा." अशी त्यांनी मागणी केली.

हेही वाचा

  1. गंभीर जखमी चीनच्या नाविकाला दिलं जीवदान; नौदल जवानांनी जीवाची बाजी लावून रुग्णाला काढलं सुरक्षित बाहेर - Indian Navy Airlifts

नवी दिल्ली Rajendra Nagar Waterlogging : दिल्लीत पावसाने धुमाकूळ केला आहे. आयएएसच्या कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्या राजेंद्र नगर येथील 'राऊस आयएएस स्टडी सेंटर'च्या तळघरात पाणी भरले. या पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. दिल्ली सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्ली पोलिसचे सेंट्रल डिस्ट्रिक्ट डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, "आम्हाला संध्याकाळी 7 वाजता एका स्टडी सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची माहिती मिळाली. फोन करणाऱ्यानं सांगितलं की, तिथे काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण तळघर पाण्यानं कसं भरलं? याचा तपास करत आहोत."

शिक्षण मंत्री आतिशी यांची प्रतिक्रिया : स्टडी सेंटरमध्ये पाणी भरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेवर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, "अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित आहेत. मुख्य सचिव नरेश कुमार यांना या घटनेची चौकशी सुरू करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. माझंही घटनास्थळावर लक्ष आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्यांना माफ केलं जाणार नाही."

तळघरात 30 विद्यार्थी होते : दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "आम्हाला संध्याकाळी 7.15 वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आम्ही पंप लावून पाणी बाहेर काढलं. आम्ही तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. एकूण तीन जण पाण्यात अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते."

दिल्ली सरकारचा निष्काळजीपणा : भारतीय जनता पार्टी दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी घटनास्थळी भेट दिली. "या घटनेला आम आदमी पक्षाचे सरकार जबाबदार आहे. स्थानिक लोकांनी नाले साफ करण्याचं वारंवार आवाहन करूनही येथल्या आमदारानं त्याकडं दुर्लक्ष केलं. या अपघाताला दिल्ली सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. जलमंत्री आतिशी आणि स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा." अशी त्यांनी मागणी केली.

हेही वाचा

  1. गंभीर जखमी चीनच्या नाविकाला दिलं जीवदान; नौदल जवानांनी जीवाची बाजी लावून रुग्णाला काढलं सुरक्षित बाहेर - Indian Navy Airlifts
Last Updated : Jul 28, 2024, 8:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.