ETV Bharat / bharat

"जनादेश आम्हाला मान्य"; अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, आतिशी म्हणाल्या भाजपाविरोधात युद्ध... - DELHI ELECTION RESULTS 2025

दिल्ली विधानसभा निकालानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपालाही शुभेच्छा दिल्या.

Delhi Election Results 2025
अरविंद केजरीवाल (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2025, 3:47 PM IST

Updated : Feb 8, 2025, 4:29 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात 'आप'ला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. तर या निवडणुकीत भाजपाला मोठं यश आलं असून, आता भाजपा दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. या निकालानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

विरोधात बसून जनतेची कामं करणार : "जनतेनं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. विजयाबद्दल भाजपाला मी शुभेच्छा देतो. लोकांनी ठेवलेल्या अपेक्षा भाजपा पूर्ण करेल असा विश्वास आहे. जनतेनं मागील 10 वर्ष आम्हाला संधी दिली व त्यात आम्ही खूप चांगली कामं केली. शिक्षण, आरोग्य, वीज अशा विविध क्षेत्रात काम करत लोकांना दिलासा दिला. आता विरोधी बाकावर जरी आम्ही बसणार असलो तरी सुद्धा आम्ही जनतेची कामं करत राहणार आहोत. राजकारणात आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत, सत्तेसाठी नाही. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं व त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो," अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर दिली.

भाजपाविरोधात युद्ध सुरू राहणार : निकालानंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला. 'आप' च्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी आतिशी यांचा मात्र विजय झालाय. "माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी कालकाजीच्या जनतेचे आभार मानते. 'बाहुबली' विरुद्ध काम करणाऱ्या माझ्या टीमचे मी अभिनंदन करते. जनतेचा जनादेश आम्हाला मान्य आहे. मी जिंकले पण ही वेळ जल्लोष करायची नाही तर भाजपाविरुद्ध 'युद्ध' सुरू ठेवण्याची आहे," असं म्हणत आतिशी यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

हेही वाचा -

  1. भाजपाची सत्तास्थापनेकडं आगेकूच, केजरीवाल यांच्या पराभवानंतर स्वाती मालीवाल यांची खोचक पोस्ट
  2. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का, मनीष सिसोदिया यांच्यासह अरविंद केजरीवाल यांचा पराभव
  3. "...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात 'आप'ला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. तर या निवडणुकीत भाजपाला मोठं यश आलं असून, आता भाजपा दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. या निकालानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

विरोधात बसून जनतेची कामं करणार : "जनतेनं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. विजयाबद्दल भाजपाला मी शुभेच्छा देतो. लोकांनी ठेवलेल्या अपेक्षा भाजपा पूर्ण करेल असा विश्वास आहे. जनतेनं मागील 10 वर्ष आम्हाला संधी दिली व त्यात आम्ही खूप चांगली कामं केली. शिक्षण, आरोग्य, वीज अशा विविध क्षेत्रात काम करत लोकांना दिलासा दिला. आता विरोधी बाकावर जरी आम्ही बसणार असलो तरी सुद्धा आम्ही जनतेची कामं करत राहणार आहोत. राजकारणात आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत, सत्तेसाठी नाही. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं व त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो," अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर दिली.

भाजपाविरोधात युद्ध सुरू राहणार : निकालानंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला. 'आप' च्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी आतिशी यांचा मात्र विजय झालाय. "माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी कालकाजीच्या जनतेचे आभार मानते. 'बाहुबली' विरुद्ध काम करणाऱ्या माझ्या टीमचे मी अभिनंदन करते. जनतेचा जनादेश आम्हाला मान्य आहे. मी जिंकले पण ही वेळ जल्लोष करायची नाही तर भाजपाविरुद्ध 'युद्ध' सुरू ठेवण्याची आहे," असं म्हणत आतिशी यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

हेही वाचा -

  1. भाजपाची सत्तास्थापनेकडं आगेकूच, केजरीवाल यांच्या पराभवानंतर स्वाती मालीवाल यांची खोचक पोस्ट
  2. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का, मनीष सिसोदिया यांच्यासह अरविंद केजरीवाल यांचा पराभव
  3. "...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला
Last Updated : Feb 8, 2025, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.