ETV Bharat / state

टीव्ही, वर्तमानपत्रातील जाहिरातीसाठी जनतेचा पैसा उडवतात मोदी - राहुल गांधी

author img

By

Published : Oct 15, 2019, 8:27 PM IST

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेस आणि आघाडीच्या प्रचारासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजप सरकारवर नोटबंदी, बेरोजगारी, आणि जीएसटी या मुद्यावर सरकारवर चांगलच तोंडसुख घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी

यवतमाळ - काँग्रेसची प्रचार यंत्रणा थंडावल्याचे म्हणले जात होते. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रिय नेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे काँग्रेसमध्ये उर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गांधी म्हणाले, एक एक करून सर्व उद्योग या देशातील मूठभर १५-२० लोकांच्या स्वाधीन करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. टेलीव्हीजन आणि वर्तमानपत्रातील दररोज दिसणारे नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फुकटात दिसत नाहीत. त्यासाठी मोदी जनतेचा पैसा खर्च करतात, असा घणाघात खासदार गांधी यांनी केला. ते जिल्ह्यातील वणी येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

राहुल गांधी वणी येथील प्रचारसभेत बोलताना

हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज

मोदी हे अदानी आणि अंबानीचे लाऊडस्पीकर असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. ज्या पध्दतीने हे सरकार काम करत आहे, त्यामुळे येत्या सहा महिन्यात बेरोजगारी दुप्पट होईल, असा दावा राहुल यांनी केला. जे जनतेचे मुद्दे आहेत, त्यावर मोदी बोलतच नाहीत तर ३७० आणि इतर मुद्यावर बोलतात. या ३७० चा महाराष्ट्रात काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.

भलतेच मुद्दे उपस्थित करून ते जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करत असल्याचे गांधी म्हणाले. उद्योगपतींचे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज या सरकारने माफ केले. सव्वा कोटी रुपयांचा टॅक्सही या सरकारने उद्योगपतींना माफ केल्याचे ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था सध्या अदानी आणि अंबानी चालवत आहेत. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा - शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर

यवतमाळ - काँग्रेसची प्रचार यंत्रणा थंडावल्याचे म्हणले जात होते. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रिय नेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे काँग्रेसमध्ये उर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गांधी म्हणाले, एक एक करून सर्व उद्योग या देशातील मूठभर १५-२० लोकांच्या स्वाधीन करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. टेलीव्हीजन आणि वर्तमानपत्रातील दररोज दिसणारे नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फुकटात दिसत नाहीत. त्यासाठी मोदी जनतेचा पैसा खर्च करतात, असा घणाघात खासदार गांधी यांनी केला. ते जिल्ह्यातील वणी येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

राहुल गांधी वणी येथील प्रचारसभेत बोलताना

हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज

मोदी हे अदानी आणि अंबानीचे लाऊडस्पीकर असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. ज्या पध्दतीने हे सरकार काम करत आहे, त्यामुळे येत्या सहा महिन्यात बेरोजगारी दुप्पट होईल, असा दावा राहुल यांनी केला. जे जनतेचे मुद्दे आहेत, त्यावर मोदी बोलतच नाहीत तर ३७० आणि इतर मुद्यावर बोलतात. या ३७० चा महाराष्ट्रात काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.

भलतेच मुद्दे उपस्थित करून ते जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करत असल्याचे गांधी म्हणाले. उद्योगपतींचे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज या सरकारने माफ केले. सव्वा कोटी रुपयांचा टॅक्सही या सरकारने उद्योगपतींना माफ केल्याचे ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था सध्या अदानी आणि अंबानी चालवत आहेत. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा - शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर

Intro:Body:यवतमाळ : एक एक करून सर्व उद्योग या देशातील मूठभर 15-20 लोकांच्या स्वाधीन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. खरे पाहता ते अदानी आणि अंबानीचे लाऊडस्पीकर आहेत, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला.

यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. टीव्ही आणि पेपरमध्ये दररोज त्यांचे फोटो फुकटात नाही येत तर त्यासाठीही मोदी जनतेचा पैसा खर्च करतात. ज्या पध्दतीने हे सरकार काम करत आहे, त्यामुळे येत्या सहा महिन्यात बेरोजगारी दुप्पट होईल, असा दावा राहुल यांनी केला. जे जनतेचे मुद्दे आहेत, त्यावर मोदी बोलतच नाहीत. तर 370 आणि इतर मुद्यावर बोलतात. या 370 चा महाराष्ट्रात काय संबंध, असा सवालही त्यांनी केला. भलतेच मुद्दे उपस्थित करून ते जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करतात. मोजक्या 15-20 उद्योगपती चे 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज या सरकारने माफ केले. सव्वा कोटी रुपयांचा टॅक्सही या सरकारने उद्योगपतींना माफ केल्याचे ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था सध्या अदानी आणि अंबाणी चालवीत आहे, त्यामुळे या सरकार कडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.