ETV Bharat / state

यवतमाळमध्ये उमेदवारासाठी लोकांकडून गोळा केला निधी, वैशाली येडेंसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फिरवली झोळी

वैशाली या व्यवसायाने अंगणवाडी कार्यकर्ती आहेत. निवडणून आले तर आपण शेतकरी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर आणि इतर कामगारांच्या प्रश्नांना न्याय देऊ असे येडे म्हणाल्या.

author img

By

Published : Mar 26, 2019, 10:04 AM IST

Updated : Mar 26, 2019, 12:50 PM IST

प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे

यवतमाळ - बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चासाठी प्रहारने निधी संकलन मोहिम राबवली. यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये झोळी घेऊन लोकांकडून पैसे गोळा केले.

निवडून आल्यावर शेतकरी, अंगणवाडी, आशा कार्यकर्ती यांचे प्रश्न मांडणार

प्रहार संघटनेने यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शेतकऱ्याच्या विधवेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटक वैशाली येडे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली या व्यवसायाने अंगणवाडी कार्यकर्ती आहेत. निवडणून आले तर आपण शेतकरी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर आणि इतर कामगारांच्या प्रश्नांना न्याय देऊ असे येडे म्हणाल्या.

सोमवारी दुपारी वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्यानंतर बैलगाडीत जाऊन अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक लढण्यासाठी वैशाली येडे किंवा प्रहार संघटनेकडे पैसे नाहीत. त्यामुळे लोकांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

यवतमाळ - बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चासाठी प्रहारने निधी संकलन मोहिम राबवली. यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये झोळी घेऊन लोकांकडून पैसे गोळा केले.

निवडून आल्यावर शेतकरी, अंगणवाडी, आशा कार्यकर्ती यांचे प्रश्न मांडणार

प्रहार संघटनेने यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शेतकऱ्याच्या विधवेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटक वैशाली येडे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली या व्यवसायाने अंगणवाडी कार्यकर्ती आहेत. निवडणून आले तर आपण शेतकरी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर आणि इतर कामगारांच्या प्रश्नांना न्याय देऊ असे येडे म्हणाल्या.

सोमवारी दुपारी वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्यानंतर बैलगाडीत जाऊन अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक लढण्यासाठी वैशाली येडे किंवा प्रहार संघटनेकडे पैसे नाहीत. त्यामुळे लोकांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Intro:प्रहार पक्षाकडून वैशाली येडे यांची उमेदवारी अर्ज दाखल
निवडणुकीसाठी फिरवकी झोळीBody:यवतमाळ- लोकसभेच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने शेतक-याची विधवा असलेल्या अंगणवाडी सेविकेला उमेदवारी जाहीर केली आहे. या गरीब उमेदवाराचा निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी यवतमाळातील बसस्थानक चौकात लोकवर्गणीसाठी झोळी फिरवून निवडणूक निधी गोळा केला. दुपारी २ वाजताच्या सुुमारास निवडणूक निर्णय आधी
अधिकारी यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यतमाळात ११, १२ व १३ जानेवारीला पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक, शेतकरी विधवा वैशाली येडे (राजुरा ता. कळंब जि. यवतमाळ) यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले आहे. नामांकन दाखल करण्यापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवतीर्थावर रक्तदान केले. त्यानंतर बैलगाडीद्वारे उमेदवाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर नामांकनासाठी नेण्यात आले. त्यानंतर लोकवर्गणीसाठी शहरात झोळी फिरवून निवडणूक निधी गोळा करण्यात आला.
Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.