ETV Bharat / state

पांढरकवडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत एकही शिक्षक नाही, अवघ्या १ महिन्यावर बारावीची परीक्षा

author img

By

Published : Dec 27, 2019, 9:28 AM IST

Updated : Dec 27, 2019, 10:02 AM IST

यवतमाळ येथील पांढरकवडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही. अवघ्या १ महिन्यावर बारावीची परीक्षा येऊन ठेपली आहे. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.

pandharkawada ZP high school teachers
पांढरकवडा जिल्हा परिषद शाळेत एकही शिक्षक नाही

यवतमाळ - जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी आणि उर्दू माध्यम शाळेत एकही शिक्षक नाही. त्यामुळे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच बारावीची परीक्षा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत धडक दिली.

पांढरकवडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत एकही शिक्षक नाही

याच उच्च माध्यमिक शाळेमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थीही शिक्षण घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेमध्ये एकही शिक्षक नाही. काही दिवसांपूर्वी तासिकेवर शिक्षक येत होते. त्यावेळी फक्त रसायनशास्त्र आणि गणिताचे तास होत होते. मात्र, आता तासिकेवर शिक्षकही येत नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रार केली. मात्र, त्यांनी सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करावा लागत आहे. त्यातच आता बारावीची परीक्षा १ महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.

जवळपास १०० विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी जिल्हा परिषदेमध्ये धडक दिली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी तासिकेवरील शिक्षकांना आम्ही पैसे देऊ शकत नाही. तुम्ही शासनाकडे मागणी करा, असे सांगितले. तसेच तुमचे निवेदन आम्ही शासनाकडे पोहोचवू असेही ते म्हणाले असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली. तसेच लवकरात लवकर शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

यवतमाळ - जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी आणि उर्दू माध्यम शाळेत एकही शिक्षक नाही. त्यामुळे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच बारावीची परीक्षा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत धडक दिली.

पांढरकवडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत एकही शिक्षक नाही

याच उच्च माध्यमिक शाळेमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थीही शिक्षण घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेमध्ये एकही शिक्षक नाही. काही दिवसांपूर्वी तासिकेवर शिक्षक येत होते. त्यावेळी फक्त रसायनशास्त्र आणि गणिताचे तास होत होते. मात्र, आता तासिकेवर शिक्षकही येत नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रार केली. मात्र, त्यांनी सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करावा लागत आहे. त्यातच आता बारावीची परीक्षा १ महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.

जवळपास १०० विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी जिल्हा परिषदेमध्ये धडक दिली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी तासिकेवरील शिक्षकांना आम्ही पैसे देऊ शकत नाही. तुम्ही शासनाकडे मागणी करा, असे सांगितले. तसेच तुमचे निवेदन आम्ही शासनाकडे पोहोचवू असेही ते म्हणाले असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली. तसेच लवकरात लवकर शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

Intro:Body:यवतमाळ : शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने विध्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. तत्काळ शिक्षक देऊन न्याय द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. तासिकेवर नेमलेले शिक्षक या सत्रात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः बारावीचा अभ्यास करावा लागत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांना आपल्या मागण्याची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनि दिला.

पांढरकवडा येथे जिल्हा परिषद माध्यमिक हायस्कुल आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक देण्याची मागणी केली होती त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
एक महिन्यावर परीक्षा आली असताना शिक्षक देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नाही. जवळपास शंभर विद्यार्थी जिल्हा परिषदेत आले होते. त्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.


बाईट -ऋतुजा खडसे, विद्यार्थिनी
बाईट -आशितोष तारफे, विद्यार्थी
बाईट - सनि खान, पालकConclusion:
Last Updated : Dec 27, 2019, 10:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.