ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

author img

By

Published : May 15, 2019, 9:33 PM IST

पाण्यासाठी टँकर आणि जनावरांना चारा छावण्या सुरू करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे.

वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा


वाशिम - जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून सततच्या अवर्षणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यावर अन्याय होत आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे सरसकट संपूर्ण जिल्ह्यातील सहाही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. विदर्भ विभागासाठी या समितीमध्ये विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार , वीरेंद्र जगताप, अतुल लोंढे, आमदार अमित झनक यांनी आज वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता व दुष्काळाचे चटके सहन करणाऱया नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाण्यासाठी टँकर आणि जनावरांना चारा छावण्या सुरू करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे. दुष्काळी उपाय योजना करण्यासंदर्भात शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.


वाशिम - जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून सततच्या अवर्षणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यावर अन्याय होत आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे सरसकट संपूर्ण जिल्ह्यातील सहाही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. विदर्भ विभागासाठी या समितीमध्ये विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार , वीरेंद्र जगताप, अतुल लोंढे, आमदार अमित झनक यांनी आज वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता व दुष्काळाचे चटके सहन करणाऱया नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाण्यासाठी टँकर आणि जनावरांना चारा छावण्या सुरू करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे. दुष्काळी उपाय योजना करण्यासंदर्भात शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Intro:अँकर:- वाशिम जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत अवर्षणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील इतर तालुक्यावर अन्याय झाला असून ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळं सरसकट जिल्ह्यातील सहाही तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर करून पाण्यासाठी टँकर आणि जनावरांना चारा छावण्या सुरू कराव्या अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले....
Body:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. विदर्भ विभागासाठी या समितीमध्ये विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार , वीरेंद्र जगताप, अतुल लोंढे,आमदार अमित झनक यांनी आज वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता व दुष्काळाचे चटके सहन करणा-या नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.दुष्काळी उपाय योजना करण्यासंदर्भात शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी बोलतानी सांगितलंय...Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.