ETV Bharat / state

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात जेएनयूमधील घटनेचा निषेध - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ मोर्चा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. विद्यापीठात होणारे हल्ले हे जेएनयू प्रशासनाचे अपयश आहे, असा तीव्र निषेध विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

जेएनयूमधील घटनेचा निषेध
जेएनयूमधील घटनेचा निषेध
author img

By

Published : Jan 8, 2020, 11:07 AM IST

Updated : Jan 8, 2020, 3:46 PM IST

वर्धा - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही दिल्लीतील घटनेचा निषेध केला. विद्यापीठातील गांधी हिल्सपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत विद्यार्थ्यांनी हिंसाचाराच्या विरोधात मोर्चा काढला.

जेएनयूमधील घटनेचा निषेध


या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जेएनयूमध्ये हल्ला झाला तेव्हा पोलीस उशीरा दाखल झाले. मारहाण करणाऱ्या गुंडांना आतमध्ये सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारावाई होणार का? असा सवाल वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - ''असहिष्णुतेच्या मुद्द्यावर योग्य होते आमिर आणि शाहरुख''

केंद्र सरकार उच्च शैक्षणिक संस्थानचे खासगीकरण करण्याच्या मागे आहे. डाव्या विचार सरणीला उघडपणे दाबण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यापीठात होणारे हल्ले हे जेएनयू प्रशासनाचे अपयश आहे, असा तीव्र निषेध विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

वर्धा - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही दिल्लीतील घटनेचा निषेध केला. विद्यापीठातील गांधी हिल्सपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत विद्यार्थ्यांनी हिंसाचाराच्या विरोधात मोर्चा काढला.

जेएनयूमधील घटनेचा निषेध


या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जेएनयूमध्ये हल्ला झाला तेव्हा पोलीस उशीरा दाखल झाले. मारहाण करणाऱ्या गुंडांना आतमध्ये सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारावाई होणार का? असा सवाल वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - ''असहिष्णुतेच्या मुद्द्यावर योग्य होते आमिर आणि शाहरुख''

केंद्र सरकार उच्च शैक्षणिक संस्थानचे खासगीकरण करण्याच्या मागे आहे. डाव्या विचार सरणीला उघडपणे दाबण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यापीठात होणारे हल्ले हे जेएनयू प्रशासनाचे अपयश आहे, असा तीव्र निषेध विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

Intro:वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयात जेएनयूमधील घटनेचे निषेध, विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

वर्धा- जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटायला लागले आहे. यात वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठातही दिसले. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या हिंसाचाराच्या विरोधात मोर्चा काढला. हा मोर्चा विद्यापीठातील गांधी हिल्सपासून काढण्यात आला. यावेळी घटनेचा विरोधात आपले मत विद्यार्थ्यांनी मांडले.

गांधी हिल्स ते विद्यापीठाच्या गेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात हातात फ़लक सुद्धा घेतले. या घटनेत फी वाढ रोखण्यासाठी हे आंदोलन सुरू होते. पण अचानक मुखवटे घालुन आलेल्या गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर मारहाण चालू केली. यात 35 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून यात शिक्षकांचाही समावेश आहेत. तसेच उशिरला आलेले पोलीस आणि या गुंड आतमध्ये सोडणारे सुरक्षा रक्षक यांच्यावर सवाल करण्यात आले.

यात केंद्र सरकार उच्च शैक्षणिक संस्थानचे खाजगीकरण करण्यास इच्छुक दिसत आहे. डाव्या विचार सरणीला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हल्याच्या घटनेत वाढ होत चालली आहे. एक मागून एक घटना घडत आहे. यासह सरकारवर टीका केली. मोर्च्यात विद्यापीठाच्या इतर मुलींनीही मोर्चात सहभाग घेतला. प्रशासकीय अपयशासाठी जेएनयू प्रशासनाचा तीव्र निषेध केला. रावीचंद्र राऊत अजय राऊत, इस्तेखार अहमद यांनी केला.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Jan 8, 2020, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.