ETV Bharat / state

होमगार्डवर येणार संक्रांत, 15 हजारपेक्षा जास्त होमगार्डंना बसणार फटका - गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले

तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी जिल्हानिहाय गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात 400 गृहरक्षकांना कायमस्वरुपी बंदोबस्तातून कार्यमुक्त करण्यात आले. हाच आकडा महाराष्ट्राचा विचार केल्यास 15 ते 20 हजारपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

More than 15,000 homeguards Will remove
15 हजारपेक्षा जास्त होमगार्डंना बसणार फटका
author img

By

Published : Jan 16, 2020, 7:52 PM IST

Updated : Jan 16, 2020, 7:59 PM IST

वर्धा - पोलिसांच्या कामाचा ताण कमी करणारा मदतगार म्हणजे गृहरक्षक. पण नव्याने निघालेल्या आदेशाने गृहरक्षकांना नवीन काम शोधावे लागणार आहे. तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी जिल्हानिहाय गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात 400 गृहरक्षकांना कायमस्वरुपी बंदोबस्तातून कार्यमुक्त करण्यात आले. हाच आकडा महाराष्ट्राचा विचार केल्यास 15 ते 20 हजारपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होमगार्ड यांना खाकी वर्दीत उभे केले जाते. अपुरे पोलीस संख्याबळ पाहता सेवाधारी गृहरक्षक कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्ताला असतात. पण निधी अभावी 50 टक्के गृहरक्षकांना कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे. यामुळे पोलीस ठाण्याला मदतीसाठी दिसणारे गृहरक्षक पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात आले आहे. याचा ताण पोलीस प्रशासनावर वाढणार आहे.

15 हजारपेक्षा जास्त होमगार्डंना बसणार फटका

मागील ३ महिन्यांपासून होमगार्ड यांना दिले जाणारे मानधन मिळालेले नाही. वर्ध्यात 3 कोटी रुपयांच्या घरात विविध बंदोबस्तातील मानधन रक्कम थकीत आहे. यामुळेच महाराष्ट्रभरात हाच आकडा आणखी मोठा असणार आहे. शिवाय हे पैसे न मिळाल्याने गृहरक्षकांसमोर आर्थिक अडचण असणार आहे.

राज्यात सुमारे 52 हजार गृहरक्षक संख्या आहे. यामध्ये 45 हजार गृहरक्षकांना ६ महिने रोटेशन पद्धतीने 180 दिवस काम दिले जाते. पण प्रत्यक्षात 120 दिवसांपेक्षा जास्त काम मिळत नाही. होमगार्डला एका दिवसाचे 670 रुपये मानधन मिळते. दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यात होमगार्डंसना किमान ११ महिने रोजगार दिला जातो. मात्र, महाराष्ट्रात सगळे उलट होताना दिसत आहे.

होमगार्डंना स्थगितीच्या आदेशाने पोलिसांवरील कामाचा ताण वाढणारच आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलीस मदत बंदोबस्त लागला तर त्यासाठी महासमादेशक, अथवा उपमहासमादेशकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे होमगार्डंसना पुन्हा कायमस्वरुपी काम मिळावे, या मागणीला जोरदार झटका या आदेशाच्या निमित्याने बसणार आहे.

गृहरक्षकांना 175 रुपये मानधन मिळायचे. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना हा भत्ता वाढवण्यात आला. 1 एप्रिल 2014 पासून तो लागू झाला. 2019 मध्ये वाढून हे मानधन 570 रुपये करण्यात आले. यासह 10 तासापेक्षा जास्त काम केल्यास 100 रुपये उपहार भत्ता मिळवून 670 रुपये मानधन मिळत आहे. यात दोन महिन्यांच्या रोटेशन पद्धतीने सहा महिने काम करत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र वर्षभरातील सण उत्सव, जयंती पुण्यातिथी हे धरून हा बंदोबस्त 100 ते 120 दिवसांपेक्षा जास्त जात नसल्याचे म्हटले जाते. होमगार्ड विकास समितीच्या वतीने वर्षभर काम देऊन मानधन मिळावे अशी मागणी केली जात आहे. पण प्रत्यक्षात यावर तोडगा निघत नाही.

वर्धा - पोलिसांच्या कामाचा ताण कमी करणारा मदतगार म्हणजे गृहरक्षक. पण नव्याने निघालेल्या आदेशाने गृहरक्षकांना नवीन काम शोधावे लागणार आहे. तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी जिल्हानिहाय गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात 400 गृहरक्षकांना कायमस्वरुपी बंदोबस्तातून कार्यमुक्त करण्यात आले. हाच आकडा महाराष्ट्राचा विचार केल्यास 15 ते 20 हजारपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होमगार्ड यांना खाकी वर्दीत उभे केले जाते. अपुरे पोलीस संख्याबळ पाहता सेवाधारी गृहरक्षक कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्ताला असतात. पण निधी अभावी 50 टक्के गृहरक्षकांना कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे. यामुळे पोलीस ठाण्याला मदतीसाठी दिसणारे गृहरक्षक पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात आले आहे. याचा ताण पोलीस प्रशासनावर वाढणार आहे.

15 हजारपेक्षा जास्त होमगार्डंना बसणार फटका

मागील ३ महिन्यांपासून होमगार्ड यांना दिले जाणारे मानधन मिळालेले नाही. वर्ध्यात 3 कोटी रुपयांच्या घरात विविध बंदोबस्तातील मानधन रक्कम थकीत आहे. यामुळेच महाराष्ट्रभरात हाच आकडा आणखी मोठा असणार आहे. शिवाय हे पैसे न मिळाल्याने गृहरक्षकांसमोर आर्थिक अडचण असणार आहे.

राज्यात सुमारे 52 हजार गृहरक्षक संख्या आहे. यामध्ये 45 हजार गृहरक्षकांना ६ महिने रोटेशन पद्धतीने 180 दिवस काम दिले जाते. पण प्रत्यक्षात 120 दिवसांपेक्षा जास्त काम मिळत नाही. होमगार्डला एका दिवसाचे 670 रुपये मानधन मिळते. दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यात होमगार्डंसना किमान ११ महिने रोजगार दिला जातो. मात्र, महाराष्ट्रात सगळे उलट होताना दिसत आहे.

होमगार्डंना स्थगितीच्या आदेशाने पोलिसांवरील कामाचा ताण वाढणारच आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलीस मदत बंदोबस्त लागला तर त्यासाठी महासमादेशक, अथवा उपमहासमादेशकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे होमगार्डंसना पुन्हा कायमस्वरुपी काम मिळावे, या मागणीला जोरदार झटका या आदेशाच्या निमित्याने बसणार आहे.

गृहरक्षकांना 175 रुपये मानधन मिळायचे. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना हा भत्ता वाढवण्यात आला. 1 एप्रिल 2014 पासून तो लागू झाला. 2019 मध्ये वाढून हे मानधन 570 रुपये करण्यात आले. यासह 10 तासापेक्षा जास्त काम केल्यास 100 रुपये उपहार भत्ता मिळवून 670 रुपये मानधन मिळत आहे. यात दोन महिन्यांच्या रोटेशन पद्धतीने सहा महिने काम करत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र वर्षभरातील सण उत्सव, जयंती पुण्यातिथी हे धरून हा बंदोबस्त 100 ते 120 दिवसांपेक्षा जास्त जात नसल्याचे म्हटले जाते. होमगार्ड विकास समितीच्या वतीने वर्षभर काम देऊन मानधन मिळावे अशी मागणी केली जात आहे. पण प्रत्यक्षात यावर तोडगा निघत नाही.

Intro:वर्धा स्टोरी

mh_war_homeguard_story_pkg_7204321

हे pkg एडिट करून नंतर पाठवतोय, सध्या बुलेटीनसाठी व्हिजवल पाठवत आहे.

होमगार्डवर येणार संक्रात, निधी अभावी मानधन थकले, 15 हजारपेक्षा जास्त होमगार्डना बसणार फटका.

पोलीस दादाच्या कामाचा ताण कमी करणारा मदतगार म्हणजे गृहरक्षक...पण नव्याने निघालेल्या आदेशाने गृहरक्षकांना नवीन काम शोधाव लागणार आहेय. तिजोरीवर पडणार भार कमी करण्यासाठी जिल्हानिहाय गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेय. वर्धा जिल्ह्यात 400 गृहरक्षकांना पोलीस कायमस्वरूपी बंदोबस्तातुन कार्यमुक्त करण्यात आले. हाच आकडा महाराष्ट्राचा विचार केल्यास 15 ते 20 हजारपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहेय.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असो की कायदा सुवस्थेचा प्रश्न होमगार्ड यांना खाकी वर्दीत उभे केलं जातंय. अपुरे पोलीस संख्याबळ पाहता सेवाधारी गृहरक्षक कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताला असतात. पण निधी अभावी 50 टक्के
कायमस्वरूपी बंदोबस्त कमी करण्यात आलाय. यामुळे पोलीस स्टेशनला मदतीसाठी दिसणारे गृहरक्षक पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात आले आहेय. याचा ताण पोलीस प्रशासनावर वाढणार आहे.


मागील तीन महिन्यांपासून होमगार्ड यांना दिले जाणारे मानधन मिळालेलं नाही. वर्ध्यात 3 कोटी रुपयाच्या घरात विविध बंदोबस्तातील मानधन रक्कम थकीत आहेय. यामुळेच महाराष्ट्रभरात हाच आकडा आणखी मोठा असणार आहे. शिवाय हे पैसे न मिळाल्याने गृहरक्षकांनसमोर आर्थिक अडचण असणार आहे. या आदेशाने नवीन काम शोधण्याचा ताण असणार तो वेगळाच...

राज्यात सुमारे 52 हजार गृहरक्षक लक्ष संख्या आहेय. या 45 हजार गृहरक्षक हे पाटावर कार्यरत आहेय. यात त्यांना सहा महिने रोटेशन पध्द्तीन 180 दिवस काम देत असल्याचे सांगितले जातेय. पण प्रत्यक्षात 120 दिवसांपेक्षा जास्त काम मिळत नाही. होमगार्डसना एका दिवसाच 670 रुपये मानधन मिळत. दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यात होमगार्डसना किमान अकरा महिने रोजगार दिला जातो. महाराष्ट्रात सगळं उलट होताना दिसतंय.

होमगार्डना स्थगितीच्या आदेशाने पोलिसांवरील कामाचा ताण वाढणारच. हा ताण कमी करण्यासाठी पोलीस मदत बंदोबस्त लागलाच तर त्यासाठी महासमादेशक, अथवा उपमहासमादेशकांची परवानगी घ्यावी लागणार आहेय. यामुळे होमगार्डसना पुन्हा कायमस्वरूपी काम मिळावे या मागणीला जोरदार झटका या आदेशाच्या निमित्याने बसणार आहे.

गृहरक्षकांना 175 रुपया मानधन मिळायचे. आर आर पाटील गृहमंत्री असतांना हा भत्ता वाढवण्यात आला. 1 एप्रिल 2014 पासून तो लागू झाला. 2019 मध्ये वाढून हे मानधन 570 रुपये करण्यात आले. यासह 10 तासापेक्षा जास्त कामं केल्यास 100 रुपये उपहार भत्ता मिळवून 670 रुपये मानधन मिळत आहे. यात दोन महिन्यांच्या रोटेशन पद्धतीने सहा महिने काम करत असल्याचा सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र वर्षभरातील सण उत्सव, जयंती पुण्यातिथी हे धरून हा बंदोबस्त 100 ते 120 दिवसांपेक्षा जास्त जात नसल्याचे म्हटले जाते.

होमगार्ड विकास समितीच्या वतीने वर्षभर काम देऊन मानधन मिळावे अशी मागणी केली जाते. पण प्रत्यक्षात हा
यावर तोडगा निघत नसतांना महासमदेशका यांच्या देशाने गृहरक्षक दलात चांगलीच खळबळ निर्माण झाकी आहे. यामुळे येत्या काळात याचे काय प्रतिसाद उमटतील हे पाहावे लागणार आहे.


Body:.Conclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.