ETV Bharat / state

वर्ध्यातून लोकसभेसाठी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना उमेदवारी

वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्वातंत्रपूर्व काळात सेवाग्राम इथून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या जागेला काँग्रेससाठी वेगळं महत्व आहे.

author img

By

Published : Mar 20, 2019, 3:42 AM IST

चारुलता टोकस

वर्धा - मागील अनेक दिवसांपासून रखडलेला वर्ध्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. अखिल भारतीय काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीत चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली. मागील काही दिवसांपासून स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने या जागेची मागणी केली जात होती. शरद पवार यांनीही स्वाभिमानीसाठी आग्रह धरला होता. अखेर आज तिढा सुटला आणि काँग्रेसने ही जागा स्वतःकडे ठेवली.


वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्वातंत्रपूर्व काळात सेवाग्राम इथून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या जागेला काँग्रेससाठी वेगळं महत्व आहे.


चारुलता टोकस


चारुलात टोकस या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. काँग्रेसच्या काळात प्रभा राव या वजनदार नेत्या होत्या. चारुलता टोकस सध्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे गांधी कुटुंबियांशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच देवळी मतदारसंघात प्रभा राव यांचे मानसपुत्र रणजित कांबळे हे आमदार आहेत. हीदेखील टोकस यांच्यासाठी जमेची बाजू आहे.


सुबोध मोहितेंची सदिच्छा भेट


शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुबोध मोहिते पाटील यांनी चारुलता टोकस यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. या भेटीनंतर घोषणा झाली नसली तरी चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळणार हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते. आज अधिकृत घोषणेनंतर टोकस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


काँग्रेस वर्ध्यात ११ वेळा विजयी


१९५१ मध्ये श्रीमन्नारायण अग्रवाल हे पहिले खासदार वर्ध्यातून विजयी झाले. त्यांनतर तब्बल ९ लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसला विजय मिळाला. यामध्ये कमलनयन बजाज हे १९५७ ते १९६७ दरम्यान तीन वेळा विजयी झाले. त्यांनतर जगजीवन कदम, संतोषराव गोडे, वसंतराव साठे हे सुद्धा तीनदा निवडून आले. त्यांनतर सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे काँग्रेसमध्ये असताना १९९८ आणि २००९ मध्ये निवडून आले आहेत. असा एकूण ११ वेळा काँग्रेसचा इथून विजय झाला.


भाजप वर्ध्यातून ३ वेळा विजयी, एकदा माकपचाही खासदार


भाजपचे पहिले खासदार म्हणून विजय मुडे हे १९९६ मध्ये विजयी झाले. त्यानंतर २००४ मध्ये सुरेश वाघमारे आणि २०१४ मध्ये रामदास तडस विजयी झालेत. माकपचे रामचंद्र घंगारे हे १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडणून आले होते.


यंदाची लढत भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात होणार आहे. यामुळे वर्ध्यातील राजकारण आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापायला लागले आहे. विद्यमान खासदार तडस हे शुक्रवारी २२ तारखेला नामांकन अर्ज भरणार आहेत.

वर्धा - मागील अनेक दिवसांपासून रखडलेला वर्ध्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. अखिल भारतीय काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीत चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली. मागील काही दिवसांपासून स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने या जागेची मागणी केली जात होती. शरद पवार यांनीही स्वाभिमानीसाठी आग्रह धरला होता. अखेर आज तिढा सुटला आणि काँग्रेसने ही जागा स्वतःकडे ठेवली.


वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्वातंत्रपूर्व काळात सेवाग्राम इथून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या जागेला काँग्रेससाठी वेगळं महत्व आहे.


चारुलता टोकस


चारुलात टोकस या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. काँग्रेसच्या काळात प्रभा राव या वजनदार नेत्या होत्या. चारुलता टोकस सध्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे गांधी कुटुंबियांशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच देवळी मतदारसंघात प्रभा राव यांचे मानसपुत्र रणजित कांबळे हे आमदार आहेत. हीदेखील टोकस यांच्यासाठी जमेची बाजू आहे.


सुबोध मोहितेंची सदिच्छा भेट


शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुबोध मोहिते पाटील यांनी चारुलता टोकस यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. या भेटीनंतर घोषणा झाली नसली तरी चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळणार हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते. आज अधिकृत घोषणेनंतर टोकस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


काँग्रेस वर्ध्यात ११ वेळा विजयी


१९५१ मध्ये श्रीमन्नारायण अग्रवाल हे पहिले खासदार वर्ध्यातून विजयी झाले. त्यांनतर तब्बल ९ लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसला विजय मिळाला. यामध्ये कमलनयन बजाज हे १९५७ ते १९६७ दरम्यान तीन वेळा विजयी झाले. त्यांनतर जगजीवन कदम, संतोषराव गोडे, वसंतराव साठे हे सुद्धा तीनदा निवडून आले. त्यांनतर सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे काँग्रेसमध्ये असताना १९९८ आणि २००९ मध्ये निवडून आले आहेत. असा एकूण ११ वेळा काँग्रेसचा इथून विजय झाला.


भाजप वर्ध्यातून ३ वेळा विजयी, एकदा माकपचाही खासदार


भाजपचे पहिले खासदार म्हणून विजय मुडे हे १९९६ मध्ये विजयी झाले. त्यानंतर २००४ मध्ये सुरेश वाघमारे आणि २०१४ मध्ये रामदास तडस विजयी झालेत. माकपचे रामचंद्र घंगारे हे १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडणून आले होते.


यंदाची लढत भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात होणार आहे. यामुळे वर्ध्यातील राजकारण आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापायला लागले आहे. विद्यमान खासदार तडस हे शुक्रवारी २२ तारखेला नामांकन अर्ज भरणार आहेत.

Intro:R_MH_19_MARCH_WARDHA_CHARULATA_TOKAS_VIS_1
फाईल FTP केली आहे.


वर्धा लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या चारुलात टोकासला उमेदवारी जाहीर

वर्ध्यातील मागील अनेक दिवसांपासून रखडलेला काँग्रेसचा उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. अखिल भारतीय काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीत काँग्रेसचा जेष्ठ नेत्या राहिलेल्या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या चारुलता याना उमेदवारी जाहीर झाली. मागील काही दिवसांपासून स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने या जागेची मागणी केली जात होती. शरद पवार यांनीही स्वाभिमानाला मिळावी यासाठी आग्रह धरला होता.अखेर आज तिढा सुटला आणि जागा काँग्रेसने ही जागा अखेर स्वतःकडे ठेवली.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हूणून वर्धा जिल्ह्याला ओळख आहे. सेवाग्राम इथूनच स्वातंत्रपूर्व काळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे या जागेला काँग्रेससाठी वेगळं महत्व आहे. काँग्रेसचा गढ मनाला जातो याला कारण आहे.

चारुलता टोकस####
चारुलात टोकस या दिवंगत प्रभा राव यांची कन्या आहे. काँग्रेसच्या काळात प्रभा राव या वजनदार नेत्या होत्या. चारुलता टोकस या सध्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहे. त्याचे गांधी कुटुंबियांशी घनिष्ट आहे. तसेच देवळी मतदार संघात प्रभा राव यांचे मानसपुत्र रणजित कांबळे हे आमदार आहे. ही सुद्धा चारुलता टोकस यांची जमेची बाजू आहे.

####16 मार्चला घेतली सदिच्छा भेट###
शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुबोध मोहिते पाटील यानी चारुलता टोकस यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर राजकिय चर्चा रंगू लागल्या होत्या. या भेटी नंतर घोषणा झाली नसली तरी चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळणार हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते. आज अधिकृत जाहीर झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


####काँग्रेस वर्ध्यात 11 वेळा विजयी,####

1951मध्ये श्रीमंन्नारायण अग्रवाल हे पहिले खासदार वर्ध्यातून विजयी झाले. त्यांनतर तब्बल 9 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस इथून विजयी झाली आहे. यामध्ये कमलनयन बजाज हे तीन वेळा 1957 ते 67 या तीन निवडणुकीत विजयी झाले. त्यांनतर जगजीवन कदम, संतोषराव गोडे, त्यांनतर वसंतराव साठे हे सुद्धा तीनदा निवडून गेले. त्यांनतर दत्ता मेघे जे सध्या भाजपमध्ये आहे. ते यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना 1998 आणि 2009मध्ये काँग्रेसचे पंजावर निवडणून आले आहे. असे एकूण 11 वेळा काँग्रेस येथून विजयी झाली.

####भाजप वर्ध्यातून 3 वेळा विजयी, एकदा माकपचाही खासदार#####
भाजपचे पहिले खासदार म्हणून विजय मुडे हे 1996मध्ये विजयी झाले. त्यानंतर 200 4मध्ये सुरेश वाघमारे आणि 2014 मध्ये रामदास तडस हे विजयी झाले. येते एकदा माकपचे रामचंद्र घंगारे हे 1991मध्ये खासदार म्हणून निवडणून आले.

आता यंदा ही लढत भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात होणार आहे. यामुळे वर्ध्यातील राजकारण आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलेचा तापायला लागणार आहे. विद्यमान खासदार रामदास हे शुक्रवारी 22 तारखेला नामांकन अर्ज भरणार आहे.


Body:पराग ढोबळे,वर्धा


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.