ETV Bharat / state

उकाड्याने वर्धेकर हैराण; तापमानाचा पारा ४५.८ अंशावर

त्याचबरोबर शहर पाणी टंचाईचा सामना करत असताना उकाड्यापासून बचावासाठी कुलरमध्ये पाणी कुठून टाकावे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

author img

By

Published : Apr 29, 2019, 8:13 PM IST

उकाड्याने वर्धेकर गरमागरम

वर्धा - वर्ध्यासह विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. वर्ध्यातील आजचे तापमान ४५.८ अंश नोंदवण्यात आले आहे. रविवारी तापमानात ०.३ अंशाने घट झाली होती. सोमवारी हे तापमान पुन्हा ०.१ अंशाने वाढत ४५.८ अंश नोंदवण्यात आले. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वर्ध्यात तापमानाचा पारा ४५.८ अंशावर

वर्ध्यातील तापमानाचे गणित कायमच कमीजास्त होत आहे. हे तापमान आज ४५.८ अंशावर पोहचले आहे. उष्ण हवा आणि वातावरणातील गरम हवा हे सायंकाळपर्यंत अनुभवायला मिळत आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतरसुद्धा हवा गरमच राहत आहे.

त्याचबरोबर शहर पाणी टंचाईचा सामना करत असताना उकाड्यापासून बचावासाठी कुलरमध्ये पाणी कुठून टाकावे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. अगोदरच ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे घशाला कोरड तशी कुलरलाही कोरड असल्याने उन्हाचा कडाका जास्तच जाणवत आहे.

वर्धा - वर्ध्यासह विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. वर्ध्यातील आजचे तापमान ४५.८ अंश नोंदवण्यात आले आहे. रविवारी तापमानात ०.३ अंशाने घट झाली होती. सोमवारी हे तापमान पुन्हा ०.१ अंशाने वाढत ४५.८ अंश नोंदवण्यात आले. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वर्ध्यात तापमानाचा पारा ४५.८ अंशावर

वर्ध्यातील तापमानाचे गणित कायमच कमीजास्त होत आहे. हे तापमान आज ४५.८ अंशावर पोहचले आहे. उष्ण हवा आणि वातावरणातील गरम हवा हे सायंकाळपर्यंत अनुभवायला मिळत आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतरसुद्धा हवा गरमच राहत आहे.

त्याचबरोबर शहर पाणी टंचाईचा सामना करत असताना उकाड्यापासून बचावासाठी कुलरमध्ये पाणी कुठून टाकावे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. अगोदरच ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे घशाला कोरड तशी कुलरलाही कोरड असल्याने उन्हाचा कडाका जास्तच जाणवत आहे.

Intro:R_MH_29_APR_WARDHA_TAPMAN_VIS_1

वर्ध्याचा तापमानाचा पार 45.8 वर

वर्ध्यातील तपमान हे विदर्भात जवळ जवळ दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असल्याचे आकडे सांगतात. आजचे तापमान हे 45.8 अंशावर यंदा पाहायला मिळाले. रविवारी तापमानात 0.3 अंशाने घट झाली होती. सोमवारी हे तापमान पुन्हा 0.1 अंशाने वाढत 45.8 नोंदवल्या गेले. शनिवारी गेलेल्या 46 अंशाच्या तुलनेत हे तापमान कमीच आहे.

यंदा तापमान हे 45.7 वरून 0.3 अंशाने वाढ घेत 46वर जाऊन पोहचेल होते. त्यामुळे यंदाच्या सिजनला 45.8 हे तापमान आकड्याची गंमत पाहता पहिल्यांदा नोंदवल्या गेले आहे. तापमान हे कमी जास्त सुरू आहे. पण उष्ण हवा आणि वातावरणातील गरम हवा हे उशिरा पर्यंत अनुभवायला मिळत आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतर सुद्धा हवा गरमच राहत असल्याने केवळ सूर्यदेव आहे तोपर्यंतच तापमान गरम नसून हे सायंकाळी उशिरा पर्यंत गरम अनुभयास येत आहे.

शहर पाणी टंचाईला समोर जातांना कुलरमध्ये पाणी कुठून टाकावे असा प्रश्न पडत आहे. अगोदरच पाणी हे 5 ते 6 दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे घशाला कोरड तशी कुलरलाही कोरड असल्याने तपमानाचा फटका अधिकच बसत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.