ETV Bharat / state

व्हिडीओ : ठाण्यात उघड्या गटारीत नागरिक पडल्याच्या दोन दिवसात दोन घटना

उघड्या गटारीत महिला पडल्याची घटना बुधवारी दिव्याच्या आगासन रोड येथे घडली आहे. तर आज (गुरूवारी) ठाण्यातील जांभळीनाका परिसरात एक वृद्ध उघड्या गटारीत पडल्याची घटना घडली आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 11:27 PM IST

उघड्या गटारीत पडल्याचे छायाचित्र

ठाणे - शहरासह जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे ठाण्यातील रस्ते जलमय झाले आहेत. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या ठाण्यात उघड्या गटारींचे प्रमाण जास्त आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना तेथे रस्ता आहे की गटार याचा अंदाज लावत ठाणेकर चालत असतात. उघड्या गटारीत महिला पडल्याची घटना बुधवारी दिव्याच्या आगासन रोड येथे घडली आहे. तर आज (गुरूवारी) ठाण्यातील जांभळीनाका परिसरात एक वृद्ध उघड्या गटारीत पडल्याची घटना घडली आहे.

ठाण्यात उघड्या गटारीत नागरिक पडल्याच्या दोन दिवसात दोन घटना

दोन दिवसात दोन घटना घडल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या ठाणेकरांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. उघड्या गटारीजवळ कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाही. उघड्या गटारीत पडून लहान मुले वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाही प्रशासन उघड्या गटारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठाणे महापालिका अधिकारी, ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

ठाण्यात प्रत्येक पावसाळ्यात कोट्यवधींचा निधी खर्च करूनही नाले गटारे ही साफसफाई होत नाहीत. साफसफाईसाठी उघडी केलेली गटारेही पुन्हा लवकर बंदिस्त करण्यात येत नाहीत. यामुळेच अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. ठेकेदार गटारे उघडी करतात ती साफ झालेली आहे कि नाही याचा जातीने लेखाजोखा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी घेत नाहीत. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचेही नागरिक म्हणत आहेत.

ठाणे - शहरासह जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे ठाण्यातील रस्ते जलमय झाले आहेत. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या ठाण्यात उघड्या गटारींचे प्रमाण जास्त आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना तेथे रस्ता आहे की गटार याचा अंदाज लावत ठाणेकर चालत असतात. उघड्या गटारीत महिला पडल्याची घटना बुधवारी दिव्याच्या आगासन रोड येथे घडली आहे. तर आज (गुरूवारी) ठाण्यातील जांभळीनाका परिसरात एक वृद्ध उघड्या गटारीत पडल्याची घटना घडली आहे.

ठाण्यात उघड्या गटारीत नागरिक पडल्याच्या दोन दिवसात दोन घटना

दोन दिवसात दोन घटना घडल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या ठाणेकरांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. उघड्या गटारीजवळ कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाही. उघड्या गटारीत पडून लहान मुले वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाही प्रशासन उघड्या गटारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठाणे महापालिका अधिकारी, ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

ठाण्यात प्रत्येक पावसाळ्यात कोट्यवधींचा निधी खर्च करूनही नाले गटारे ही साफसफाई होत नाहीत. साफसफाईसाठी उघडी केलेली गटारेही पुन्हा लवकर बंदिस्त करण्यात येत नाहीत. यामुळेच अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. ठेकेदार गटारे उघडी करतात ती साफ झालेली आहे कि नाही याचा जातीने लेखाजोखा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी घेत नाहीत. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचेही नागरिक म्हणत आहेत.

Intro:
पावसाळ्यात रस्त्यावरून चालणारेही झाले असुरक्षित दोघे पडले उघड्या गटारात प्रशासन ढिम्मBody:



रस्त्यावरील खड्डे,खड्ड्यात ठिकठिकाणी साचलेले पाणी, पाण्याखाली वर्षानुवर्षे येणारे रस्ते अशा समस्या स्मार्टसिटी होऊ पाहणाऱ्या ठाणे शहराला भेडसावत आहेत. ठाणे पालिका अधिकारी, ठेकेदार आणि विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीने ठाणेकर असुरक्षित झाल्याचे समोर आले आहे. उघड्या मोठ्या नाल्यात वृद्ध पडला. सुदैवाने तो बचावला तर दुसरी घटना दिव्याच्या आगासन रोडवर उघड्या गटारात पडलेली महिलाही सुदैवाने बचावली. हि घटना बुधवारी घडली ठार जांभळीनाक्यावरील घटना गुरुवारी घडली. पालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्याचे दुर्लक्ष आणि अपयश या सोबतच सफाईसाठी उघडी केलेली गटारे रामभरोसे ठेवणारे ठेकेदार यांच्या दुलक्षितपणामुळे या दोन घटना घडल्या. याबाबत लोकप्रतिनिधी सह पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचा सूर स्थानिक नागरिकांमधून निघत आहे.

मागील पावसाळ्यात पालिका अधिकारी उघडलेल्या मॅनहॉलमधून वाहून गेला तो आठवड्याने समुद्रात सापडला. त्यानंतर यंदा दीड वर्षाचा मुलगा हा उघड्या नाल्यात पडून बेपत्ता झाल्याच्या घाट ताज्या असतानाही आणि याघटनेची गंभीर दाखल न घेतल्याने ठाण्यात दोन दिवसात दोन दुर्दैवी घटना घडल्या. दोन्ही घटनेत महिला आणि पुरुष हे सुदैवानेच बचावले आहेत. ठाण्यात प्रत्येक पावसाळ्यात कोट्यवधींचा निधी खर्च करूनही नाले गटारे ही साफसफाई होत नाहीत. साफसफाईसाठी उघडी केलेली गटारे हि पुन्हा बंदिस्त करण्यात येत नाहीत. यामुळेच घटनांची पुनरावृत्ती होत आहे. ठेकेदार गटारे उघडी करतात ती साफ झालेली आहे कि नाही याचा जातीने लेखाजोखा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी घेत नाहीत. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.

सलग दोन दिवस घडल्या दोन घटना-बचावले

बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिवा आगासन परिसरातील गटारांची साफसफाई करण्यासाठी त्या उघडल्या नंतर एक महिना त्या रामभरोसे उघड्याच ठेवण्यात आल्या. उघड्या गिटारवर सफाई नंतर आच्छादन टाकण्याकडे लोकप्रतिनिधी ठेकेदार आणि पालिका अधीकारी यांचे दुर्लक्ष झाले. बुधवारी पाऊसाची रिपरिप सुरु असतानाच महिला उघड्या नाल्यात पडली. आणि सुदैवाने बचावल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी ठाणे शहराच्या जांभळी नाका येथील महात्माफुले मंडई मधील मुख्य किराणा मंडईमध्ये असलेल्या आणि साफसफाईसाठी उघडे केलेल्या गटारात वृद्ध पडल्याची घटना घडली. या गटाराजवळ कुठलाच बोर्ड किंवा सुरक्षेच्या दृष्टीने बेरेगेंड लावण्यात आलेले नव्हते. यात नाल्यात वृद्ध पडल्याने त्याला वाचविण्यात यश आले अन्यथा पालिका प्रशासन अधिकारी,ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा बळी गेला असता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.