ठाणे : प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत ( Rob to passenger by threating with gun )असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना भिवंडी येथील भादवड नाका ते सोनाळे या मार्गावर सापळा रचून शांतीनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या ( accused arrested in bhivandi thane ) आहेत. शुभम मिश्रा (वय, २५), आशिष श्रीवास्तव (वय, ३६) असे बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी बंदूक सारखे दिसणारे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसेसह व एक दुचाकी हस्तगत केली आहे.
अशी आली माहिती समोर - कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. त्यातच आगामी महापालिका निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून भिवंडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनीही शांतीनगर पोलिसांना गुन्हेगाराला आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार उपनिरीक्षक निलेश जाधव हे त्यांच्या पथकासह मंगळवारी भादवड नाका येथे गुन्हेगारांना पकडण्यासाठी गस्ती घालत होते. त्याच वेळी दोन सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुल घेऊन येणार असल्याची, माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.
आरोपींवर कारवाई - पोलीसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळून आले. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा गुन्हेगारांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दोन्ही गुन्हेगार मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील असून यातील आरोपी आशिष विरोधात पुण्यातील शिरुर पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल असून तो पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
आरोपींकडून साहित्य जप्त - या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव करीत आहे. तर या गुन्हेगारांकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल , २ हजार ५०० रुपयांचे ५ काडतूस, आणि गुन्ह्यात वापरत असलेली ३० हजार रुपये किंमती एक दुचाकी असा ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आता हे पिस्तूल व काडतूसे कोणाकडून आणली व ते कोणाला विक्रीसाठी आणेल होते का ? याचा तपास सुरू केला आहे.