ETV Bharat / state

मुरबाडचा शेतकरी ठरला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा पहिला लाभार्थी

या योजनेसाठी महाराष्ट्रातून मुरबाड तालुक्यातील गौतम चिंतामण पवार या शेतकऱ्याची निवड करण्यात आली होती.

author img

By

Published : Feb 24, 2019, 8:00 PM IST

मोदी यांच्या हस्ते पवार सन्मानपत्र स्वीकारताना

ठाणे - पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभांरभ गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेसाठी महाराष्ट्रातून मुरबाड तालुक्यातील गौतम चिंतामण पवार या शेतकऱ्याची निवड करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पवार यांनी आज सन्मानपत्र स्वीकारले. पवार हे मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे रहिवाशी आहेत.


या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने छोट्या शेतकऱ्यांसाठी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजना घोषित केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना महत्वाची समजली जाते. या योजनेवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत.

ठाणे - पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभांरभ गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेसाठी महाराष्ट्रातून मुरबाड तालुक्यातील गौतम चिंतामण पवार या शेतकऱ्याची निवड करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पवार यांनी आज सन्मानपत्र स्वीकारले. पवार हे मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे रहिवाशी आहेत.


या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने छोट्या शेतकऱ्यांसाठी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजना घोषित केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना महत्वाची समजली जाते. या योजनेवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत.

मुरबाडचा शेतकरी ठरला किसान सन्मान निधीचा महाराष्ट्रतून पहिला लाभार्थी  

ठाणे :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभांरभ गोरखपूर येथे झाला. यावेळी योजनाला महाराष्ट्रातून लाभार्थी  म्हणून या कार्यक्रमासाठी मुरबाड तालुक्यातील एकमेव शेतकऱ्याची निवड करण्यात आली आहे.  मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे गौतम चिंतामण पवार असे लाभार्थी शेतकऱ्याचे नाव असून प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते त्यांनी सन्मानपत्र स्वीकारले.

 

राष्ट्रीय पातळीवर शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेश  मधील  गोरखपूर जिल्ह्यातून करण्यात आला असून या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ठाणे जिल्हास्तरीय समारंभ जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे  येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, एम. सावंत, तहसीलदार राज तवटे यांच्या उपस्थितीत झाला.  याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १३ लाभार्थी शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

 


I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.