ETV Bharat / state

रिक्षात विसरलेले २ लाखांचे दागिने महिलेला मिळाले परत, उल्हासनगर पोलिसांची कामगिरी

author img

By

Published : May 19, 2019, 4:57 PM IST

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले सोने, चांदी व हिरेजडित असे २ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची बॅग एक महिला रिक्षात विसलली होती. या संदर्भात त्यांनी नेहरु चौक वाहतूक पोलीस चौकीत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २ ते ३ तासात निघून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध वाहन अॅपमार्फत लावून रिक्षा चालकास पोलीस चौकीत बोलाविण्यात आले.

पोलीस ठाणे

ठाणे - मुलीच्या लग्नाकरीता बनविलेले २ लाख रुपये किंमतीचे दागिने एक महिला रिक्षामध्ये विसरली होती. याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल अॅपचा वापर करून शिताफीने त्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन संबंधित महिलेचे दागिने परत मिळवून दिले. मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर हा प्रकार घडला होता. मात्र, पोलिसांनी काही तासांमध्येच दागिने परत मिळवून दिले.

उल्हासनगर कॅम्प ३ येथील कामगार रुग्णालयाजवळ भोलानाथ कॉलनीमध्ये संगिता वेणूगोपाल शेट्टी (५०) ही महिला तिच्या कुटुंबासह राहते. संगीता यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सोने, चांदी व हिरेजडित असे २ लाख रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले होते. सायंकाळी त्यांनी उल्हासनगर कॅम्प ३ येथून १७ सेक्शन ते शिरू चौक असा रिक्षाने प्रवास केला असता, रिक्षात दागिन्यांची बॅग विसलली. त्यामुळे संगीता आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. या संदर्भात त्यांनी नेहरु चौक वाहतूक पोलीस चौकी गाठली आणि उल्हासनगर वाहतूक उपशाखाचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना घडलेला प्रकार सांगितला.

Thane
दागिन्यांची बॅग

चव्हाण यांनी संगीता यांना धिर देऊन रिक्षा चालकाचे वर्णन व इतर चौकशी केली. संगिता यांनी रिक्षाचा नंबर घेतला नसल्याने वाहतूक वॉर्डन अशोक ननावरे व संजय आंधळेची मदत देऊन पोलीस ठाण्यात गहाळ वस्तुबाबत नोंद करण्यास पाठविले. या घटनेबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात प्रापर्टी मिसिंग नं. ४६५/२०१९ प्रमाणे नोंद करण्यात आली. आणि वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शिरु चौकातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. घटनेनंतर २ ते ३ तासात निघून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध वाहन अॅपमार्फत लावून रिक्षा चालकास पोलीस चौकीत बोलाविण्यात आले.

रिक्षा चालक चौकीत आला व रिक्षा साफ करताना ही बॅग मला मिळाली, मी ती पोलिसांकडे जमा करणारच होतो, असे त्याने सांगितले. गहाळ बॅग परत आणल्यानंतर लागलीच संगीता यांना नेहरू चौकीत बोलावून घेण्यात आले. संगिता आपल्या नातलगासह चौकीत येवून रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने असलेल्या बॅगेची तपासणी करुन खात्री केली. आपले दागिने परत मिळाल्याच्या आनंदात त्यांना रडू कोसळले. त्यांनी दागिने परत मिळवून दिल्यामुळे मुलीच्या लग्नात प्रतिष्ठा वाचली म्हणून पोलिसांचे आभार मानले. रिक्षा चालकास धन्यवाद देत रोख बक्षीस दिले. यावेळी रिक्षा चालक, मालक, युनियन पदाधिकारी, कार्यकर्ते, दुकानदार व पोलीस कर्मचारी हजर होते.

ठाणे - मुलीच्या लग्नाकरीता बनविलेले २ लाख रुपये किंमतीचे दागिने एक महिला रिक्षामध्ये विसरली होती. याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल अॅपचा वापर करून शिताफीने त्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन संबंधित महिलेचे दागिने परत मिळवून दिले. मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर हा प्रकार घडला होता. मात्र, पोलिसांनी काही तासांमध्येच दागिने परत मिळवून दिले.

उल्हासनगर कॅम्प ३ येथील कामगार रुग्णालयाजवळ भोलानाथ कॉलनीमध्ये संगिता वेणूगोपाल शेट्टी (५०) ही महिला तिच्या कुटुंबासह राहते. संगीता यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सोने, चांदी व हिरेजडित असे २ लाख रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले होते. सायंकाळी त्यांनी उल्हासनगर कॅम्प ३ येथून १७ सेक्शन ते शिरू चौक असा रिक्षाने प्रवास केला असता, रिक्षात दागिन्यांची बॅग विसलली. त्यामुळे संगीता आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. या संदर्भात त्यांनी नेहरु चौक वाहतूक पोलीस चौकी गाठली आणि उल्हासनगर वाहतूक उपशाखाचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना घडलेला प्रकार सांगितला.

Thane
दागिन्यांची बॅग

चव्हाण यांनी संगीता यांना धिर देऊन रिक्षा चालकाचे वर्णन व इतर चौकशी केली. संगिता यांनी रिक्षाचा नंबर घेतला नसल्याने वाहतूक वॉर्डन अशोक ननावरे व संजय आंधळेची मदत देऊन पोलीस ठाण्यात गहाळ वस्तुबाबत नोंद करण्यास पाठविले. या घटनेबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात प्रापर्टी मिसिंग नं. ४६५/२०१९ प्रमाणे नोंद करण्यात आली. आणि वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शिरु चौकातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. घटनेनंतर २ ते ३ तासात निघून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध वाहन अॅपमार्फत लावून रिक्षा चालकास पोलीस चौकीत बोलाविण्यात आले.

रिक्षा चालक चौकीत आला व रिक्षा साफ करताना ही बॅग मला मिळाली, मी ती पोलिसांकडे जमा करणारच होतो, असे त्याने सांगितले. गहाळ बॅग परत आणल्यानंतर लागलीच संगीता यांना नेहरू चौकीत बोलावून घेण्यात आले. संगिता आपल्या नातलगासह चौकीत येवून रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने असलेल्या बॅगेची तपासणी करुन खात्री केली. आपले दागिने परत मिळाल्याच्या आनंदात त्यांना रडू कोसळले. त्यांनी दागिने परत मिळवून दिल्यामुळे मुलीच्या लग्नात प्रतिष्ठा वाचली म्हणून पोलिसांचे आभार मानले. रिक्षा चालकास धन्यवाद देत रोख बक्षीस दिले. यावेळी रिक्षा चालक, मालक, युनियन पदाधिकारी, कार्यकर्ते, दुकानदार व पोलीस कर्मचारी हजर होते.

मुलीच्या लग्नाचे दोन लाखांचे दागिने रिक्षात विसरलेल्या महिलेला पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत

 

ठाणे :- मुलीच्या लग्नाकरिता बनविलेले दोन लाख रुपये किंमतीचे दागिने एक महिला रिक्षामध्ये विसरली होती. याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल ऍपचा वापर करून शिताफीने रिक्षाचालकाचा शोध घेऊन महिलेचे दागिने परत मिळवून दिले. मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर हा प्रकार घडला होता. मात्र पोलिसांनी काही तासांमध्येच दागिने परत मिळवून दिले.

 

  उल्हासनगर कॅम्प 3 येथील कामगार हॉस्पिटलजवळ भोलानाथ कॉलनी मध्ये संगिता वेणूगोपाल शेट्टी(50)  ही महिला तिच्या कुटुंबासह राहते. संगीताने तिच्या मुलीच्या लग्नासाठी सोने, चांदी व हिरेजडित असे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले होते. सायंकाळी त्यांनी उल्हासनगर कॅम्प 3 येथून 17 सेक्शन ते शिरू चौक असा रिक्षाने प्रवास केला असता रिक्षात ते दागिन्यांची बॅग विसल्या होत्या. त्यामुळे संगीता आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. या संदर्भात त्यांनी नेहरु चौक वाहतूक पोलीस चौकी गाठली.  उल्हासनगर वाहतूक उपशाखाचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना घडलेला प्रकार सांगितला. चव्हाण यांनी संगीता यांना धिर देवून रिक्षा चालकाचे वर्णन विचारुन नंबर घेतला आहे काय इ. चौकशी केली. परंतु त्यांनी  रिक्षाचा नंबर घेतला नसल्याने वाहतूक वॉर्डन अशोक ननावरे व संजय आंधळेची मदत देऊन पोलीस ठाण्यात गहाळ वस्तु बाबत नोंद करणेस पाठविले. सदर घटनेबाबत उल्हासनगर पोलीस ठाणे येथे प्रापर्टि मिसिंग नं. 465/2019  प्रमाणे नोंद केली.  आणि वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रिक्षा व चालकचा शोध शिरु चौकातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे सुरु केला. 2  ते 3 तासात निघून गेलेले रिक्षा चालकाचा शोध वाहन ऍप मार्फत लावून रिक्षा चालकास पोलीस चौकीत बोलाविले. 

 

  रिक्षा चालक चौकित आला व रिक्षा साफ करतांना ही बॅग मला मिळाली, मी ती पोलिसांकडे जमा करणारच होतो असे सांगितले. गहाळ बॅग परत आणले वर लागलीच संगीता यांना नेहरू चौकीत बोलावून घेतले. सदर महिला आपले नातलगासह चौकीत हजर येवून तीने तीचे रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने असलेले बॅगेची तपासणी करुन खात्री केली. आपले दागिने परत मिळाल्याने दुःख व आनंद अशा द्विधा अवस्थेत रडू लागली. रडतच तिने दागिने परत मिळवून दिले मुलीच्या लग्नात इज्जत वाचली म्हणून देवाचे व पोलीसांचे आभार मानले. रिक्षा चालकास धन्यवाद देत रोख बक्षीस दिले. यावेळी रिक्षा चालक, मालक, युनियन पदाधिकारी, कार्यकर्ते, दुकानदार व पोलिस कर्मचारी हजर होते.

 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.