ETV Bharat / state

उल्हासनगरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी

author img

By

Published : Jul 9, 2021, 6:52 PM IST

उल्हासनगर कॅम्प नंबर २ मधील खेमानी बसस्थानकलगत लासी इमारतीच्या समोरच असलेल्या रस्त्यावर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोर्नाक कंपनीची जलवाहिनी आज दुपारच्या सुमारास अचानक फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

पाण्याची नासाडी
पाण्याची नासाडी

ठाणे - उल्हासनगर कॅम्प नंबर २ मधील खेमानी बसस्थानकलगत लासी इमारतीच्या समोरच असलेल्या रस्त्यावर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोर्नाक कंपनीची जलवाहिनी आज दुपारच्या सुमारास अचानक फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. ही जलवाहिनी गेल्या तासाभरापासून फुटल्याने त्यामधून पाण्याचे २० ते ३० फूट उंच कारंजे उडत होते. आधीच शहरात पाणीटंचाई असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी

२ तासानंतर दुरुस्तीचे काम सुरु

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कोर्नाक कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. पाईपलाईन फुटल्याने आधीच शहरात पाणीटंचाई असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. सुमारे दोन तासापासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. आता जेसीबीच्या साहाय्याने पाईपलाईन खोदून दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र पाईपलाईन फुटल्यानंतर महानगरपालिकेचा एकही आधिकारी अथवा पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी ठेकेदारांचे कर्मचारी सुमारे २ तास या ठिकाणी फिरकले नाही. अशा प्रकारचे पाणी गळती म्हणजे पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

ठाणे - उल्हासनगर कॅम्प नंबर २ मधील खेमानी बसस्थानकलगत लासी इमारतीच्या समोरच असलेल्या रस्त्यावर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोर्नाक कंपनीची जलवाहिनी आज दुपारच्या सुमारास अचानक फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. ही जलवाहिनी गेल्या तासाभरापासून फुटल्याने त्यामधून पाण्याचे २० ते ३० फूट उंच कारंजे उडत होते. आधीच शहरात पाणीटंचाई असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी

२ तासानंतर दुरुस्तीचे काम सुरु

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कोर्नाक कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. पाईपलाईन फुटल्याने आधीच शहरात पाणीटंचाई असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. सुमारे दोन तासापासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. आता जेसीबीच्या साहाय्याने पाईपलाईन खोदून दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र पाईपलाईन फुटल्यानंतर महानगरपालिकेचा एकही आधिकारी अथवा पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी ठेकेदारांचे कर्मचारी सुमारे २ तास या ठिकाणी फिरकले नाही. अशा प्रकारचे पाणी गळती म्हणजे पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.