ETV Bharat / state

Advertisement Controversy : तुमच्यातला नारदमुनी कोण ते ओळखा जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाडांचा सेना-भाजपला टोला

author img

By

Published : Jun 16, 2023, 7:52 AM IST

शिंदे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरुन भाजप आणि शिंदे गटात बिनसल्याचे दिसत आहे. याप्रकरणावरुन विरोध दोन्ही पक्षांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड

ठाणे : भाजप आणि शिंदे गटात जाहिरातीवरुन वाद सुरू झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशा घोषणेची जाहिरात देण्यात आली होती. त्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलही करण्यात आले. शिंदे गट आणि भाजपमधील या वादावरुन विरोध त्यांच्यावर टीका करत आहेत. जाहिरातीचा धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

आव्हाडांची टीका : आम्हाला तुमची दोस्ती तुटावी असे वाटत नाही पण तुमच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकणारा नारदमुनी कोण ते शोधा असा सल्ला देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि भाजपला टोला लगावला. जो बुंद से गयी वो हौद से नही आती, अशी टोलेबाजी देखील आव्हाडांनी सल्ला देताना केली. शिवसेनेच्या जाहिरात बॉम्बने सेना भाजपच्या मैत्रीत चांगलाच धमाका केला असून दोन्ही पक्षांकडून सध्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण पानभर दिलेल्या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच कल्लोळ माजला. दुसऱ्या दिवशी सर्वसमावेशक अशी जाहिरात देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु विरोधक मात्र सरकारला घेरण्याचा सोनेरी संधी सोडू इच्छित नाही. हे जितेंद्र आव्हाड यांच्या विधानांमधून स्पष्ट होत आहे.

फडणवीसांची जागा दाखवली : दोन ते चार कोटी रुपये खर्च करून कोणत्या हितचिंतकाने ही जाहिरात दिली, असा स्पष्ट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. एवढी मोठी जाहिरात देण्याचे प्लॅनिंग चार दिवस आधीपासून व्हावे लागते. त्यामुळे ही संकल्पना कोणाची आहे, असा सवाल त्यांनी केला. या जाहिरातीत शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी लोकांनी जास्त पसंती मिळत असल्याचे दाखवण्यात आले. यातून फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची खरमरीत टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. आम्हाला तुमच्या दोस्तीबद्दल काही बोलायचे नाही, परंतु यात टाकलेल्या मिठाच्या खड्यामुळे जे बनलंय ते आपण लिंबू सरबत म्हणून पिऊ शकता. मात्र या प्रकरणाचा सूत्रधार नारदमुनी कोण ते ओळखा असा सल्लाही आव्हाडांनी दिला. जे झाले ते जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून केले गेले असा थेट आरोप देखील आव्हाड यांनी केला.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गटाचे वाढले टेन्शनच; भाजप - शिंदे गट युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता
  2. Maharashtra Politics: शिंदे गट- भाजपमध्ये फिसकटले? श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा, जाणून घ्या काय आहे वाद
  3. Ajit Pawar Criticized CM : सरकारच्या जाहिरातींवरून विरोधी अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका, जाहिरात देणारा हितचिंतक कोण?

ठाणे : भाजप आणि शिंदे गटात जाहिरातीवरुन वाद सुरू झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशा घोषणेची जाहिरात देण्यात आली होती. त्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलही करण्यात आले. शिंदे गट आणि भाजपमधील या वादावरुन विरोध त्यांच्यावर टीका करत आहेत. जाहिरातीचा धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

आव्हाडांची टीका : आम्हाला तुमची दोस्ती तुटावी असे वाटत नाही पण तुमच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकणारा नारदमुनी कोण ते शोधा असा सल्ला देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि भाजपला टोला लगावला. जो बुंद से गयी वो हौद से नही आती, अशी टोलेबाजी देखील आव्हाडांनी सल्ला देताना केली. शिवसेनेच्या जाहिरात बॉम्बने सेना भाजपच्या मैत्रीत चांगलाच धमाका केला असून दोन्ही पक्षांकडून सध्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण पानभर दिलेल्या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच कल्लोळ माजला. दुसऱ्या दिवशी सर्वसमावेशक अशी जाहिरात देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु विरोधक मात्र सरकारला घेरण्याचा सोनेरी संधी सोडू इच्छित नाही. हे जितेंद्र आव्हाड यांच्या विधानांमधून स्पष्ट होत आहे.

फडणवीसांची जागा दाखवली : दोन ते चार कोटी रुपये खर्च करून कोणत्या हितचिंतकाने ही जाहिरात दिली, असा स्पष्ट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. एवढी मोठी जाहिरात देण्याचे प्लॅनिंग चार दिवस आधीपासून व्हावे लागते. त्यामुळे ही संकल्पना कोणाची आहे, असा सवाल त्यांनी केला. या जाहिरातीत शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी लोकांनी जास्त पसंती मिळत असल्याचे दाखवण्यात आले. यातून फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची खरमरीत टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. आम्हाला तुमच्या दोस्तीबद्दल काही बोलायचे नाही, परंतु यात टाकलेल्या मिठाच्या खड्यामुळे जे बनलंय ते आपण लिंबू सरबत म्हणून पिऊ शकता. मात्र या प्रकरणाचा सूत्रधार नारदमुनी कोण ते ओळखा असा सल्लाही आव्हाडांनी दिला. जे झाले ते जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून केले गेले असा थेट आरोप देखील आव्हाड यांनी केला.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गटाचे वाढले टेन्शनच; भाजप - शिंदे गट युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता
  2. Maharashtra Politics: शिंदे गट- भाजपमध्ये फिसकटले? श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा, जाणून घ्या काय आहे वाद
  3. Ajit Pawar Criticized CM : सरकारच्या जाहिरातींवरून विरोधी अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका, जाहिरात देणारा हितचिंतक कोण?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.