ETV Bharat / state

धक्कादायक..! 42 वर्षीय महिलेवर रेल्वेच्या बोगद्यात सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

नोकरीच्या शोधात ती महिला मैत्रीणीकडे गेली होती. तिच्या घरी जेवण करून रात्रीच्या सुमारास पायी चालत आपल्या घरी निघाली होती. त्यानंतर चार नराधमांनी तिला पकडून आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

author img

By

Published : Aug 2, 2020, 6:06 PM IST

Updated : Aug 2, 2020, 6:54 PM IST

narpoli police station
narpoli police station

ठाणे - रात्रीच्या सुमारास एकटी घरी जाणाऱ्या एका ४२वर्षीय महिलेवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. आरोपींनी तिला रस्त्यालगत असलेल्या रेल्वे बोगद्यातील गवतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. ही घटना भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे बोगद्याजवळ घडली.

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चार नराधमांना बेड्या कोठल्या आहेत. माँटी कैलास वरटे (वय 25 वर्षे, रा. कैलास नगर, भिवंडी), विशाल कैलास वरटे (वय 23 वर्षे, रा. कैलास नगर), कुमार डाकू राठोड (वय 25 वर्षे, रा. पूर्णागाव, भिवंडी) व अनिल कुमार श्याम बिहारी गुप्ता (वय 28 वर्षे, रा.अनमोल मार्केट, मनी सुरत, भिवंडी), असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित 42 वर्षीय महिला राहणाळ गावमध्ये एकटीच राहते. लॉकडाऊनमध्ये भिवंडीतील बहुतांश गोदाम बंद पडल्याने ती नोकरीच्या शोधात होती. पीडित महिला नोकरीच्या शोधात तिच्या मनी सुरत कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या मैत्रीणकडे काम मिळवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी गेली होती. त्यादिवशी मैत्रिणीच्या घरीच जेवण करुन ती रात्रीच्या सुमाराला तिच्या घरी जाण्यासाठी एकटीच निघाली. रात्री साडेदहाच्या सुमाराला रेल्वे बोगदा पार करून चरणीपाडाकडे एकटी जात असल्याचे पाहून आरोपींनी तिला रस्त्यातच गाठून रेल्वे बोगद्याजवळ असलेल्या गवतात नेऊन अत्याचार केला.

दरम्यान, पीडित महिलेने आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करत नारपोली पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाचे चक्री फिरवत चारही नराधमांना बेड्या ठोकल्या. आज चारही नराधमांना न्यायालयात हजर केले असता 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी विष्णू आव्हाड करत आहेत.

ठाणे - रात्रीच्या सुमारास एकटी घरी जाणाऱ्या एका ४२वर्षीय महिलेवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. आरोपींनी तिला रस्त्यालगत असलेल्या रेल्वे बोगद्यातील गवतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. ही घटना भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे बोगद्याजवळ घडली.

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चार नराधमांना बेड्या कोठल्या आहेत. माँटी कैलास वरटे (वय 25 वर्षे, रा. कैलास नगर, भिवंडी), विशाल कैलास वरटे (वय 23 वर्षे, रा. कैलास नगर), कुमार डाकू राठोड (वय 25 वर्षे, रा. पूर्णागाव, भिवंडी) व अनिल कुमार श्याम बिहारी गुप्ता (वय 28 वर्षे, रा.अनमोल मार्केट, मनी सुरत, भिवंडी), असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित 42 वर्षीय महिला राहणाळ गावमध्ये एकटीच राहते. लॉकडाऊनमध्ये भिवंडीतील बहुतांश गोदाम बंद पडल्याने ती नोकरीच्या शोधात होती. पीडित महिला नोकरीच्या शोधात तिच्या मनी सुरत कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या मैत्रीणकडे काम मिळवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी गेली होती. त्यादिवशी मैत्रिणीच्या घरीच जेवण करुन ती रात्रीच्या सुमाराला तिच्या घरी जाण्यासाठी एकटीच निघाली. रात्री साडेदहाच्या सुमाराला रेल्वे बोगदा पार करून चरणीपाडाकडे एकटी जात असल्याचे पाहून आरोपींनी तिला रस्त्यातच गाठून रेल्वे बोगद्याजवळ असलेल्या गवतात नेऊन अत्याचार केला.

दरम्यान, पीडित महिलेने आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करत नारपोली पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाचे चक्री फिरवत चारही नराधमांना बेड्या ठोकल्या. आज चारही नराधमांना न्यायालयात हजर केले असता 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी विष्णू आव्हाड करत आहेत.

Last Updated : Aug 2, 2020, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.