ETV Bharat / state

वर पित्याची अशीही संकल्पना; 'वही'लाच बनवली लग्नपत्रिका

आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून अंबरनाथमधील गिरीश त्रिवेदी आणि मनीषा त्रिवेदी यांनी आपला मुलगा चिंतन याच्या लग्नासाठी खास १ हजार निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. यात विशेष म्हणजे, २०० पानी वहीच्या मुख्यपृष्ठावर या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Jan 29, 2020, 7:28 PM IST

book from invitation card
वर पित्याने वहीलाच केली लग्नपत्रिका

ठाणे- लग्न सोहळा म्हटले की निमंत्रण पत्रिका छापावी लागते. मात्र, लग्न सोहळा आटोपला की महागातल्या महाग लग्न निमंत्रण पत्रिका रद्दीमध्ये फेकल्या जातात. त्यामुळे, आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची रद्दी होऊ नये, ती किमान काही दिवस तरी वापरली जावी यासाठी विवाह बंधनात अडकणाऱ्या मुलाच्या पित्याने वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी वहीलाच लग्नपत्रिका केली आहे.

वर पित्याने वहीलाच केली लग्नपत्रिका

या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून अंबरनाथमधील गिरीश त्रिवेदी आणि मनीषा त्रिवेदी यांनी आपला मुलगा चिंतन याच्या लग्नासाठी खास १ हजार निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. यात विशेष म्हणजे, २०० पानी वहीच्या मुख्यपृष्ठावर या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. १ फेब्रुवारीला गिरीश त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी त्रिवेदी परिवाराने नातेवाईक आणि मित्र मंडळींना निमंत्रण देखील द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या निमंत्रण पत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आई-वडिलांचेही नाव छापले आहे. वहीच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलाच्या लग्नाचा निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. अंबरनाथमधील त्रिवेदी कुटुंबाने मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या रूपात आगळावेगळा प्रयोग केला असल्याने ही निमंत्रण पत्रिका पाहून प्रत्येकजण या परिवाराचे कौतुक करताना दिसत आहे.

हेही वाचा- पंतप्रधान आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा आरोप

ठाणे- लग्न सोहळा म्हटले की निमंत्रण पत्रिका छापावी लागते. मात्र, लग्न सोहळा आटोपला की महागातल्या महाग लग्न निमंत्रण पत्रिका रद्दीमध्ये फेकल्या जातात. त्यामुळे, आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची रद्दी होऊ नये, ती किमान काही दिवस तरी वापरली जावी यासाठी विवाह बंधनात अडकणाऱ्या मुलाच्या पित्याने वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी वहीलाच लग्नपत्रिका केली आहे.

वर पित्याने वहीलाच केली लग्नपत्रिका

या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून अंबरनाथमधील गिरीश त्रिवेदी आणि मनीषा त्रिवेदी यांनी आपला मुलगा चिंतन याच्या लग्नासाठी खास १ हजार निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. यात विशेष म्हणजे, २०० पानी वहीच्या मुख्यपृष्ठावर या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. १ फेब्रुवारीला गिरीश त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी त्रिवेदी परिवाराने नातेवाईक आणि मित्र मंडळींना निमंत्रण देखील द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या निमंत्रण पत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आई-वडिलांचेही नाव छापले आहे. वहीच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलाच्या लग्नाचा निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. अंबरनाथमधील त्रिवेदी कुटुंबाने मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या रूपात आगळावेगळा प्रयोग केला असल्याने ही निमंत्रण पत्रिका पाहून प्रत्येकजण या परिवाराचे कौतुक करताना दिसत आहे.

हेही वाचा- पंतप्रधान आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा आरोप

Intro:kit 319Body:
मुलाच्या लग्न सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वापरात याव्या , यासाठी पित्याची अशीही संकल्पना

ठाणे : लग्न सोहळा म्हटलं कि निमंत्रण पत्रिका छापावी लागते. मात्र लग्न सोहळा आटोपला कि, महागातल्या महाग लग्नाच्या निमंत्रण पत्रिका रद्दीमध्ये फेकल्या जात आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकेची ही रद्दी होणार नाही. ती किमान काही दिवस तरी ती वापरली जावी.
या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतुन अंबरनाथमधील गिरीश त्रिवेदी आणि मनीषा त्रिवेदी यांनी आपल्या मुलगा चिंतन याच्या लग्नासाठी खास एक हजार निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. विशेष म्हणजे २०० पाणी वहीच्या मुख्यपृष्ठावर या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत.
१ फेब्रुवारी रोजी गिरीश त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी सध्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना त्यांनी निमंत्रण देखील द्यायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आईवडिलांचेही नाव छापले आहे. वहीच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलाच्या लग्नाच निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. तर निमंत्रण पत्रिकेचा उपयोग व्हावा आणि ती लक्षात राहावी यासाठी वहीच्या मुखपृष्ठावर लग्न पत्रिका छापण्यात आली आहे.
दरम्यान, अंबरनाथमधील त्रिवेदी कुटुंबातील मुलाच्या लग्न सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे. त्यामुळे त्रिवेदी यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या रूपात आगळेवेगळे निमंत्रण पत्रिका पाहून प्रत्येकजण कौतुक करताना दिसत आहे.

Conclusion:ambrnath
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.