ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे भिजलेले भातपीक सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

author img

By

Published : Oct 17, 2020, 8:12 PM IST

भिजलेले भात सुकवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क भिवंडी-वाडा रोडवरील महामार्गाच्या दुभाजकावर भातपीक आणून ठेवले आहे.

farmers-struggle-to-dry-their-crop-in-thane
अतिवृष्टीमुळे भिजलेले भातपीक सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ठाणे - जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतातील भातपिके शेतात डौलाने डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळीराजाच्या शेतातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले असून हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच भाताचा एकएक दाना वाचवण्यासाठी भिजलेले भात पीक सुकवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क भिवंडी-वाडा रोडवरील महामार्गाच्या दुभाजकावर भातपीक आणून ठेवले आहे.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

शेतात कुटुंबियांसह काबाडकष्ट करून पिकविलेले पीक परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हिरावल्याने हे पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रस्त्याच्या दुभाजकावर पीक आणून ठेवली आहेत. याचा सर्वाधिक फटका भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबांव, पाये, पायगांव, खार्डी, एकसाल, सागांव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर, वडुनवघर, खारबाव या भागात हजारो एकर भातशेती पिकविली जात असून यंदा भातपिक ही चांगले आल्याने शेतकरी आनंदित होता; मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अतिवृष्टीमुळे तब्बल १६ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झालेला असताना कृषी व महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

दरम्यान, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी शनिवारी अंबाडी खरिवली परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे म्हणत त्यांना दिलासा दिला व कृषी व महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत करण्याचे निर्देश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठाणे - जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतातील भातपिके शेतात डौलाने डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळीराजाच्या शेतातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले असून हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच भाताचा एकएक दाना वाचवण्यासाठी भिजलेले भात पीक सुकवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क भिवंडी-वाडा रोडवरील महामार्गाच्या दुभाजकावर भातपीक आणून ठेवले आहे.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

शेतात कुटुंबियांसह काबाडकष्ट करून पिकविलेले पीक परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हिरावल्याने हे पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रस्त्याच्या दुभाजकावर पीक आणून ठेवली आहेत. याचा सर्वाधिक फटका भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबांव, पाये, पायगांव, खार्डी, एकसाल, सागांव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर, वडुनवघर, खारबाव या भागात हजारो एकर भातशेती पिकविली जात असून यंदा भातपिक ही चांगले आल्याने शेतकरी आनंदित होता; मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अतिवृष्टीमुळे तब्बल १६ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झालेला असताना कृषी व महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

दरम्यान, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी शनिवारी अंबाडी खरिवली परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे म्हणत त्यांना दिलासा दिला व कृषी व महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत करण्याचे निर्देश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.