ETV Bharat / state

भिवंडीत मोहरम निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल - optional way to go out from bhiwandi in moharam

भिवंडीत मोहरम सणाच्या निमीत्ताने भव्य मिरवणुक निघणार असल्याने शहरात येणाऱ्या मुख्य मार्ग राजनोली बायपास नाका येथून येण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जड, अवजड, मध्यम व हलक्‍या कार, रिक्षा, दुचाकींसह सर्व वाहनांना साईबाबा जकात नाका येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी वाहतुक व्यवस्थेची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

शहरातील वाहतुक मार्गात बदल
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:39 PM IST

ठाणे- मुस्लीम बांधवांचा 10 सप्टेंबर रोजी पवित्र मोहरम सण (ताजिया) असल्याने त्यानिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीच्या वेळी वाहतुक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी भिवंडी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली आहे.

भिवंडी शहरातील वाहतूक मार्गात बदल
भिवंडी शहरात येणारा मुख्य मार्ग राजनोली बायपास नाका येथून शहरात येण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जड, अवजड, मध्यम व हलक्‍या वाहनांसह, रिक्षा, दुचाकी वाहनांना साईबाबा जकात नाका येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांना ठाणे-भिवंडी बायपास रस्त्यावरील ओवळी खिंड येथून ताडाली ग्रामपंचायत हद्दीतील रस्तामार्गे कळाली कामतघर मार्गे भिवंडी शहरात जाऊ शकतात. तर सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या टीएमटी, केडीएमटी व एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा साईबाबा जकात नाका पर्यंत जाऊन तिथूनच प्रवासी घेऊन माघारी जातील.

हेही वाचा- आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी भर पावसात आदिवासी नागरिकांची निदर्शने

वाडा मार्गे भिवंडीच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक अंबाडी नाका येथून प्रवेश बंदी करून अंबाडी राजमार्ग क्रमांक आठ मार्ग बृहन्मुंबई महापालिका पाइपलाइन मार्ग रवाना होतील. तर पडघामार्गे येणारी वाहतूक चाविंद्रा जकात नाका येथे प्रवेश बंदी केली असून या मार्गे येणारी वाहतूक धामणगाव पाइपलाइन मार्ग इच्छित स्थळी जाऊ शकतील. ठाणे मार्गे भिवंडी शहरात येणारी वाहतूक नारपोली पोलीस ठाण्यापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एसटी बस व टीएमटी या बस नारपोली पोलीस ठाण्याजवळूनच माघारी वळतील. त्यासोबत भिवंडीत नवीन एसटी स्टँड कॉटरगेट जकात नाका पर्यंत रस्त्यावर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी या सूचनेचे पालन करून आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा- राज्याला मातीत घालण्याचा सरकारचा निश्चय, उद्योजकांच्या मागण्यांवरुन धनंजय मुंडे आक्रमक

ठाणे- मुस्लीम बांधवांचा 10 सप्टेंबर रोजी पवित्र मोहरम सण (ताजिया) असल्याने त्यानिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीच्या वेळी वाहतुक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी भिवंडी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली आहे.

भिवंडी शहरातील वाहतूक मार्गात बदल
भिवंडी शहरात येणारा मुख्य मार्ग राजनोली बायपास नाका येथून शहरात येण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जड, अवजड, मध्यम व हलक्‍या वाहनांसह, रिक्षा, दुचाकी वाहनांना साईबाबा जकात नाका येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांना ठाणे-भिवंडी बायपास रस्त्यावरील ओवळी खिंड येथून ताडाली ग्रामपंचायत हद्दीतील रस्तामार्गे कळाली कामतघर मार्गे भिवंडी शहरात जाऊ शकतात. तर सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या टीएमटी, केडीएमटी व एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा साईबाबा जकात नाका पर्यंत जाऊन तिथूनच प्रवासी घेऊन माघारी जातील.

हेही वाचा- आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी भर पावसात आदिवासी नागरिकांची निदर्शने

वाडा मार्गे भिवंडीच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक अंबाडी नाका येथून प्रवेश बंदी करून अंबाडी राजमार्ग क्रमांक आठ मार्ग बृहन्मुंबई महापालिका पाइपलाइन मार्ग रवाना होतील. तर पडघामार्गे येणारी वाहतूक चाविंद्रा जकात नाका येथे प्रवेश बंदी केली असून या मार्गे येणारी वाहतूक धामणगाव पाइपलाइन मार्ग इच्छित स्थळी जाऊ शकतील. ठाणे मार्गे भिवंडी शहरात येणारी वाहतूक नारपोली पोलीस ठाण्यापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एसटी बस व टीएमटी या बस नारपोली पोलीस ठाण्याजवळूनच माघारी वळतील. त्यासोबत भिवंडीत नवीन एसटी स्टँड कॉटरगेट जकात नाका पर्यंत रस्त्यावर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी या सूचनेचे पालन करून आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा- राज्याला मातीत घालण्याचा सरकारचा निश्चय, उद्योजकांच्या मागण्यांवरुन धनंजय मुंडे आक्रमक

Intro:किट नंबर 319


Body:भिवंडीत मोहरम निमित्त शहरातील वाहतुक मार्गात बदल

ठाणे : मुस्लिम बांधवांचा 10 सप्टेंबर रोजी पवित्र मोहरम सण (ताजिया) असल्याने त्या निमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे . त्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीच्या वेळी वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी भिवंडी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली आहे.
भिवंडी शहरात येणाऱ्या मुख्य मार्ग राजनोली बायपास नाका येथून शहरात येण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जड, अवजड मध्यम व हलक्‍या कार रिक्षा दुचाक्यासह सर्व वाहनांना साईबाबा जकात नाका येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांना ठाणे - भिवंडी बायपास रस्त्यावरील ओवळी खिंड येथून ताडाली ग्रामपंचायत हद्दीतील रस्तामार्गे कळाली कामतघर मार्गे भिवंडी शहरात जाऊ शकतात, तर सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या टीएमटी, केडीएमटी व एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा साईबाबा जकात नाका तिथपर्यंत घेऊन तिथूनच प्रवासी घेऊन माघारी जातील.

वाडा मार्गे भिवंडी च्या दिशेने येणारी अवजड वाहतूक अंबाडी नाका येथून प्रवेश बंदी करून अंबाडी राजमार्ग क्रमांक आठ मार्ग बृहन्मुंबई महापालिका पाइपलाइन मार्ग रवाना होतील , तर पडघा मार्ग येणारी वाहतूक चाविंद्रा जकात नाका येथे प्रवेश बंदी केली असून या मार्गे येणारी वाहतूक धामणगाव पाइपलाइन मार्ग इच्छित स्थळी जाऊ शकतील, तर ठाणे मार्गे भिवंडी शहरात येणारी वाहतूक नारपोली पोलिस ठाण्यापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे, एसटी बस व टीएमटी या बसेस नारपोली पोलिस ठाण्यात जवळूनच माघारी वळतील, त्यासोबत भिवंडीत नवीन एसटी स्टँड कॉटरगेट जकात नाका पर्यंत रस्त्यावर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे . नागरिकांनी व वाहन चालकांनी या सूचनेचे पालन करून आपली गैरसोय टाळावी असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.