ETV Bharat / state

पत्नीचा खून करून फरार आरोपीला ठाणे पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनंतर केली अटक

author img

By

Published : Sep 12, 2019, 6:08 PM IST

१३ वर्षांपूर्वी माजीवाडा येथे हा प्रकार घडला होता. नराधम सुरेश शेट्टी (वय-४२) याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून दिले होते. यात पत्नीचा होरपळून मृत्यू झाला.

आरोपी सुरेश शेट्टीला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली.

ठाणे - दारू पिऊन घरी आल्यावर झालेल्या वादातून पत्नीचा खून करणाऱ्या नराधमाला ठाणे गुन्हे शाखेने तब्बल १३ वर्षांनंतर अटक केली आहे. ही घटना १३ वर्षांपूर्वी माजीवाडा येथे घडली होती. नराधम सुरेश शेट्टी (वय-४२) याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून दिले होते. यात पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली व कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा - नागपुरात कामठी नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याची हत्या

आरोपी सुरेश संजीव शेट्टी याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने २० मार्च २००७ रोजी दारू पिऊन घरी आल्यानंतर दारू पिण्याच्या कारणास्तव पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. आरोपीने राग येऊन पत्नी मीना शेट्टीच्या (वय-३०) अंगावर घरातील रॉकेलने भरलेला कॅन ओतून तीला पेटून दिले. मीनावर सिव्हिल रुग्णालयात उपचार चालू असतानाच तीचा मृत्यू झाला. यावेळी आरोपी पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन येण्याच्या बहाण्याने तो पळून गेला होता. स्थानिक पोलीसांनी आरोपीचा वेळोवेळी शोध घेऊन देखील हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नव्हता.

हेही वाचा - साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले

याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा क्रमांक १ चे पोलीस हवालदार प्रकाश कदम यांना बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपीला कर्नाटक राज्यातील जयनगर येथून अटक केली.

ठाणे - दारू पिऊन घरी आल्यावर झालेल्या वादातून पत्नीचा खून करणाऱ्या नराधमाला ठाणे गुन्हे शाखेने तब्बल १३ वर्षांनंतर अटक केली आहे. ही घटना १३ वर्षांपूर्वी माजीवाडा येथे घडली होती. नराधम सुरेश शेट्टी (वय-४२) याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून दिले होते. यात पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली व कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा - नागपुरात कामठी नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याची हत्या

आरोपी सुरेश संजीव शेट्टी याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने २० मार्च २००७ रोजी दारू पिऊन घरी आल्यानंतर दारू पिण्याच्या कारणास्तव पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. आरोपीने राग येऊन पत्नी मीना शेट्टीच्या (वय-३०) अंगावर घरातील रॉकेलने भरलेला कॅन ओतून तीला पेटून दिले. मीनावर सिव्हिल रुग्णालयात उपचार चालू असतानाच तीचा मृत्यू झाला. यावेळी आरोपी पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन येण्याच्या बहाण्याने तो पळून गेला होता. स्थानिक पोलीसांनी आरोपीचा वेळोवेळी शोध घेऊन देखील हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नव्हता.

हेही वाचा - साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले

याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा क्रमांक १ चे पोलीस हवालदार प्रकाश कदम यांना बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपीला कर्नाटक राज्यातील जयनगर येथून अटक केली.

Intro:

पत्नीचा खून करणाऱ्या फरार पतीला तब्बल  १३ वर्षांनंतर अटकBody:  



ठाण्यात माजीवाडा येथे राहणारा सुरेश संजीव शेट्टी वय ४२ वर्ष  याने दारू पिऊन घरी आल्यावर दारू पिण्याचे कारणावरून आपल्या पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग येवून पत्नी मीना हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या आगीत होरपळून मीना हि मयत झाली.याप्रकरणी फरार आरोपीला ठाणे गुन्हे शाखा घटक १ ने तब्बल तेरा वर्षांनी अटक केली.या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने बंगलोर येथून अटक करून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
अटक आरोपी सुरेश संजीव शेट्टी याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने २० मार्च २००७ रोजी दारू पिऊन घरी आल्यानंतर दारू पिण्याचे कारणास्तव पती पत्नीमध्ये भांडण झाले त्या भांडणाचा राग येऊन आरोपीने त्याची पत्नी मीना सुरेश शेट्टी (३०) हिचे अंगावर घरातील रॉकेलने भरलेला कॅन ओतून तिला माचिसच्या काडीने पेटवून देऊन तीस जीवे ठार मारण्याचा प्रयन्त केला आरोपींची पत्नी मीना हिच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार चालू असताना तिचा मृत्यु झाला.आरोपीने पत्नीच्या  उपचारासाठी पैसे घेऊन येण्याचे बहाण्याने तो पळून गेला होता . स्थानिक पोलीस स्टेशनने आरोपी याचा वेळोवेळी शोध घेऊन देखील हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागला नव्हता. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा घटक १ ठाणे मधील पोलीस हवालदार प्रकाश कदम यांना बातमीदाराकडून मिळालेल्या  गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सुरेश शेट्टी याला कर्नाटक राज्यातून उडपी जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातून हरमंड या गावी असल्याचे समजल्यावर पोलिसांचे पथक याठिकाणी पोहोचले परंतु सदर आरोपी या गावी नसल्याने पोलिसांनी  आरोपीला कर्नाटक राज्यातून बंगलोर येथे जयनगर येथून अटक केली. 

BYTE - दत्तात्रय सरक ( पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा युनिट १ )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.