ETV Bharat / state

..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Sep 18, 2019, 6:38 PM IST

नारायण राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारले असता, आम्ही आमच्या राजकीय करिअर बद्दल बोललो तर लोक आम्हाला वेडे समजतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे

ठाणे - नारायण राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारले असता, सध्या राज्यात आणि देशात महापूर, बेरोजगारी असे असंख्य प्रश्न आहेत, अशा वेळी आम्ही आमच्या बद्दल बोललो तर लोक आम्हाला वेडे समजतील, अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य हे आज (बुधवारी) जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अंबरनाथमध्ये त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

आरे वृक्षतोड प्रकरणात एमएमआरसीएचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावत असल्याची खंत वाटते, असा गंभीर आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. या आरोपावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात की, अधिकाऱ्यांची बाजू घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - देशात पहिल्यांदाच ठाण्यातील 'या' हॉटेलात रोबोट देतोय सेवा.. ४ ते ५ हजार लोकांना वाढतो जेवण

ठाणे - नारायण राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारले असता, सध्या राज्यात आणि देशात महापूर, बेरोजगारी असे असंख्य प्रश्न आहेत, अशा वेळी आम्ही आमच्या बद्दल बोललो तर लोक आम्हाला वेडे समजतील, अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य हे आज (बुधवारी) जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अंबरनाथमध्ये त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

आरे वृक्षतोड प्रकरणात एमएमआरसीएचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावत असल्याची खंत वाटते, असा गंभीर आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. या आरोपावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात की, अधिकाऱ्यांची बाजू घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - देशात पहिल्यांदाच ठाण्यातील 'या' हॉटेलात रोबोट देतोय सेवा.. ४ ते ५ हजार लोकांना वाढतो जेवण

Intro:kit 319Body:... तर लोक आम्हाला वेडे समजतील . आदित्य ठाकरे

ठाणे :- सध्या राज्यात बहुतांश जिल्ह्यात महापुरामुळे तर काही जिल्हे दुष्काळ ग्रस्त आहेत. त्यामुळे एका व्यक्ती बद्दल ,पक्षाबद्दल बोलणार नाही, शिवाय आम्ही आमच्या राजकीय करिअर बद्दल बोललो तर लोक आम्हाला वेडे समजतील असे नारायण राणे यांच्या भाजप पक्ष प्रवेशबद्दल आदित्य ठाकरेंनी भाष्य केले. तर नारायण राणेंचे नाव पुन्हा पत्रकारांनी काढताच त्यांनी राणेंच्या पक्ष प्रवेशा बद्दल अधिक बोलणे टाळले.
आदित्य ठाकरे हे आज जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली ,कल्याण शहरात दौऱयावर आहेत. त्यावेळी अंबरनाथमध्ये त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

आरे प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांनी थेट एमएमआरसीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत म्हणाले कि, आरे वृक्षतोड प्रकरणात एमएमआरसीए चे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलयला लावत असल्याची खंत वाटते, असा गंभीर आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या गंभीर आरोपावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात कि, अधिकाऱ्यांची बाजू घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Byte-आदित्य ठाकरे

Conclusion:ambrnath
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.