ETV Bharat / state

Heatstroke Death in Maharashtra : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

author img

By

Published : Apr 16, 2023, 8:59 PM IST

Updated : Apr 17, 2023, 6:44 AM IST

नवी मुंबईतील खारघरमध्ये आज (रविवारी) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने सात जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण उपचार घेत आहेत. दाखल झालेल्यांवर योग्य उपचार करत असताना मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Heat Problem Maharashtra Bhushan Program
उन्हाचा त्रास

ठाणे : सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या नवी मुंबईतील एका मेगा इव्हेंटमध्ये रविवारी सूर्यप्रकाशामुळे 120 हून अधिक लोकांना उष्णतेमुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या, डिहायड्रेशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागला. यापैकी तेरा जणांना वेगवेगळ्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर या कार्यक्रमादरम्यान उन्हामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे
    यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…

    — Atul Londhe Patil (@atullondhe) April 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रखरखत्या उन्हात कार्यक्रम: खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला हा पुरस्कार धर्माधिकारी यांना प्रदान केला. सकाळी 11.30 च्या सुमारास सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. त्यापैकी अनेकांनी शनिवारीच कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली होती.

  • Maharashtra | At least seven people dead while 24 are under treatment after suffering from heatstroke during Maharashtra Bhushan Award ceremony in Navi Mumbai's Kharghar. Deceasesd's families to be given Rs 5 lakhs while we are ensuring proper treatment for those admitted: CM… pic.twitter.com/xDzFuGsIp3

    — ANI (@ANI) April 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Maharashtra | At least seven people dead while 24 are under treatment after suffering from heatstroke during Maharashtra Bhushan Award ceremony in Navi Mumbai's Kharghar. Deceasesd's families to be given Rs 5 lakhs while we are ensuring proper treatment for those admitted: CM… pic.twitter.com/xDzFuGsIp3

— ANI (@ANI) April 16, 2023

अतुल लोंढेंचा दावा - रविवारी सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम भर दुपारी ठेवला होता. त्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास: हे मैदान लोकांनी खचाखच भरले होते आणि श्री सदस्य (धर्माधिकारी संस्था) च्या अनुयायांसाठी ऑडिओ/व्हिडिओ सुविधांनी सुसज्ज होते. उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था उघड्यावर करण्यात आली होती. तेथे उन्हापासून बचावासाठी शेडही नव्हता. एकूण 123 जणांनी कार्यक्रमादरम्यान उष्णतेमुळे डिहायड्रेशनसारख्या आरोग्याच्या आजारांची तक्रार केली. त्यांना तात्काळ कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. पुढील उपचारांची गरज असलेल्या 13 रुग्णांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लाखोंच्या संख्येने गर्दी: अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मेडिकल बूथवर अतिदक्षता विभाग (ICU) सुविधा असलेल्या वैद्यकीय केंद्रांवर एकूण 30 डॉक्टर तैनात करण्यात आले होते. नवी मुंबईतील वाशी येथील नागरी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्यांमुळे पाच रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शाह म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या सामाजिक सेवेसाठी सन्मानित करण्यासाठी लाखो लोकांची एवढी मोठी उपस्थिती कधीही पाहिली नाही. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

अमित शाहच्या हस्ते पुरस्कार: महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या तयारी पूर्ण झाली होती. आज हा पुरस्कार साडेदहाच्या दरम्यान पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्रीच मुंबईत आले आहेत. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेला. त्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला आहे.

सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनुयायी दाखल: लाखोंच्या संख्येच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविले गेले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा आज पार पडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले. रात्रीपासून सदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून येण्यास सुरुवात झाली होती.

हेही वाचा: NCP Never Join BJP : राष्ट्रवादी भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नाही; शरद पवारांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन, राऊतांचा दावा

ठाणे : सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या नवी मुंबईतील एका मेगा इव्हेंटमध्ये रविवारी सूर्यप्रकाशामुळे 120 हून अधिक लोकांना उष्णतेमुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या, डिहायड्रेशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागला. यापैकी तेरा जणांना वेगवेगळ्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर या कार्यक्रमादरम्यान उन्हामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे
    यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…

    — Atul Londhe Patil (@atullondhe) April 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रखरखत्या उन्हात कार्यक्रम: खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला हा पुरस्कार धर्माधिकारी यांना प्रदान केला. सकाळी 11.30 च्या सुमारास सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. त्यापैकी अनेकांनी शनिवारीच कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली होती.

  • Maharashtra | At least seven people dead while 24 are under treatment after suffering from heatstroke during Maharashtra Bhushan Award ceremony in Navi Mumbai's Kharghar. Deceasesd's families to be given Rs 5 lakhs while we are ensuring proper treatment for those admitted: CM… pic.twitter.com/xDzFuGsIp3

    — ANI (@ANI) April 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अतुल लोंढेंचा दावा - रविवारी सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम भर दुपारी ठेवला होता. त्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास: हे मैदान लोकांनी खचाखच भरले होते आणि श्री सदस्य (धर्माधिकारी संस्था) च्या अनुयायांसाठी ऑडिओ/व्हिडिओ सुविधांनी सुसज्ज होते. उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था उघड्यावर करण्यात आली होती. तेथे उन्हापासून बचावासाठी शेडही नव्हता. एकूण 123 जणांनी कार्यक्रमादरम्यान उष्णतेमुळे डिहायड्रेशनसारख्या आरोग्याच्या आजारांची तक्रार केली. त्यांना तात्काळ कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. पुढील उपचारांची गरज असलेल्या 13 रुग्णांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लाखोंच्या संख्येने गर्दी: अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मेडिकल बूथवर अतिदक्षता विभाग (ICU) सुविधा असलेल्या वैद्यकीय केंद्रांवर एकूण 30 डॉक्टर तैनात करण्यात आले होते. नवी मुंबईतील वाशी येथील नागरी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्यांमुळे पाच रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शाह म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या सामाजिक सेवेसाठी सन्मानित करण्यासाठी लाखो लोकांची एवढी मोठी उपस्थिती कधीही पाहिली नाही. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

अमित शाहच्या हस्ते पुरस्कार: महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या तयारी पूर्ण झाली होती. आज हा पुरस्कार साडेदहाच्या दरम्यान पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्रीच मुंबईत आले आहेत. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेला. त्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला आहे.

सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनुयायी दाखल: लाखोंच्या संख्येच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविले गेले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा आज पार पडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले. रात्रीपासून सदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून येण्यास सुरुवात झाली होती.

हेही वाचा: NCP Never Join BJP : राष्ट्रवादी भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नाही; शरद पवारांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन, राऊतांचा दावा

Last Updated : Apr 17, 2023, 6:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.