सोलापूर : क्रांती ज्योती परिषदेचे (Kranti Jyoti Parishad) प्रमुख रमेश बारसकर यांनी माहिती देताना सांगितले की, देशातील फक्त केरळ राज्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र राज्यात हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील देखील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने यासाठी पीसीपीएनडीटी कायदा आणला आहे. पण या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत (non availability of girls for marriage) नाही. मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी विविध मागण्या करत शहरातील होम मैदानावर एकत्र येत, घोड्यावर बसून वरात काढली (march of bridegrooms on the collector office) आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नवरदेवांची मिरवणूक : जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्हाला मुलगी द्या, समाजात मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा अशा विविध मागण्या करत माथ्यावर मांडावळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता शिक्षण झाले, शेती करतो, लग्नाचे वय झाले तरीही मुलगी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली.