ETV Bharat / state

उजनी धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे; धरणातून वीज निर्मिती कालवा व सीना-माढा बोगद्यात पाणी सोडले

author img

By

Published : Aug 4, 2019, 8:58 PM IST

Updated : Aug 4, 2019, 11:40 PM IST

भीमा खोर्‍यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरल्याने उजनीच्या वर असलेल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व धरणांमधून एकूण 1 लाख 28 हजार क्युसेक पाणी उजनीत सोडले गेले आहे.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/04-August-2019/4040795_solapur.mp4

सोलापूर - भीमा खोर्‍यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरल्याने उजनीच्या वर असलेल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व धरणांमधून एकूण 1 लाख 28 हजार क्युसेक पाणी उजनीत सोडले गेले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याला आता दिलासा मिळाला आहे.

उजनी धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे

उजनीत येणारा दौंडचा विसर्ग 90 हजार क्युसेकच्या पुढे गेला आहे. तर, जलाशयात खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेक, चासकमान 23 हजार , भामा आसखेडा 12 हजार 500, आंध्रा 2680 ,वडीवळे 6780 , मुळशी 28 हजार, पवना 13790 तर कासारसाईमधून 3500 क्युसेकचा विसर्ग आहे .

उजनी धरण टक्केवारीची पन्नाशी ओलांडून शंभरीकडे वाटचाल करत आहे. उजनी धरणातून वीज निर्मिती कालवा व सीना-माढा बोगद्यात पाणी सोडले जात आहे. धरणातून सोलापूर लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला शासनाने काल मंजुरी दिली. वीज निर्मितीसाठी उजनीतून 1600 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

गेल्या चोवीस तासात मुळशी 190 मिमी, वडीवळ 144 मिमी, पवना 180 मिमी, टेमघर 111 मिमी, वरसगाव 120 मिमी, पानशेत 123 मिमी अशा पावसाची नोंद झाली आहे.

सोलापूर - भीमा खोर्‍यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरल्याने उजनीच्या वर असलेल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व धरणांमधून एकूण 1 लाख 28 हजार क्युसेक पाणी उजनीत सोडले गेले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याला आता दिलासा मिळाला आहे.

उजनी धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे

उजनीत येणारा दौंडचा विसर्ग 90 हजार क्युसेकच्या पुढे गेला आहे. तर, जलाशयात खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेक, चासकमान 23 हजार , भामा आसखेडा 12 हजार 500, आंध्रा 2680 ,वडीवळे 6780 , मुळशी 28 हजार, पवना 13790 तर कासारसाईमधून 3500 क्युसेकचा विसर्ग आहे .

उजनी धरण टक्केवारीची पन्नाशी ओलांडून शंभरीकडे वाटचाल करत आहे. उजनी धरणातून वीज निर्मिती कालवा व सीना-माढा बोगद्यात पाणी सोडले जात आहे. धरणातून सोलापूर लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला शासनाने काल मंजुरी दिली. वीज निर्मितीसाठी उजनीतून 1600 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

गेल्या चोवीस तासात मुळशी 190 मिमी, वडीवळ 144 मिमी, पवना 180 मिमी, टेमघर 111 मिमी, वरसगाव 120 मिमी, पानशेत 123 मिमी अशा पावसाची नोंद झाली आहे.

Intro:सोलापूर : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याला आता दिलासा मिळालाय.भीमा खोर्‍यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प आता भरल्याने उजनीच्यावर असलेल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळं सर्व धरणांमधून 1 लाख 28 हजार क्युसेक पाणी सोडले गेले आहे.उजनीत येऊन मिसळणारा दौंडचा विसर्ग 90 हजार क्युसेकच्या पुढे गेला असून उजनी धरण टक्केवारीची पन्नाशी ओलांडून शंभरीकडे वाटचाल करत आहे.त्यामुळे उजनी धरणातून वीज निर्मिती, कालवा व सीना-माढा बोगद्यात पाणी सोडले जात आहे.Body:उजनी जलाशयात खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेक, चासकमान 23 हजार , भामा आसखेडा 12 हजार 500, आंध्रा 2680 ,वडीवळे 6780 , मुळशी 28 हजार, पवना 13790 तर कासारसाईमधून 3500 क्युसेकचा विसर्ग आहे . यामुळे पुणे बंडगार्डन व दौंडचा विसर्ग वाढत चालला आहे. उजनीत जवळपास एक लाख क्युसेक हून अधिक पाणी येत असल्याने धरणाची पाणी पातळी ही झपाट्याने वाढू लागली आहे.
Conclusion:यामुळे धरणातून सोलापूर लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यास शासनाने कालच मंजुरी दिली होती.दरम्यान वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक पाणी सोडले जात आहे तसेच बोगदा ही सुरू करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.मागील चोवीस तासात मुळशीवर 190 मि.मी.,वडीवळ 144, पवना 180, टेमघर 111, वरसगाव 120, पानशेत 123 मि.मी.अशा पावसाची नोंद आहे. मुळा मुठा उपखोर्‍यातील साखळी धरणे भरल्याने पानशेतमधून पाणी सोडल्याने खडकवासल्याचा विसर्ग हा 35 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
Last Updated : Aug 4, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.