ETV Bharat / state

सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद; दर पाडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा आरोप

author img

By

Published : Dec 5, 2019, 3:11 PM IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने बुधवारी रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे कारण पुढे करत सकाळी तीन तास लिलाव पुकारले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला.

solapur
सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद

सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कांदा लिलाव बंद पाडले आहेत. बाजार समितीमध्ये 250 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना ऐनवेळी व्यापाऱ्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ घातला.

सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद

हेही वाचा - 'मी आणि माझं कुटुंब कांदा खातच नाही...' कांदा दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं अजब उत्तर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने बुधवारी रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे कारण पुढे करत सकाळी तीन तास लिलाव पुकारले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला. कांद्याचे दर पाडण्यासाठी व्यापारी असे करत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी बाजार समितीकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कांदा लिलाव बंद पाडले आहेत. बाजार समितीमध्ये 250 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना ऐनवेळी व्यापाऱ्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ घातला.

सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद

हेही वाचा - 'मी आणि माझं कुटुंब कांदा खातच नाही...' कांदा दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं अजब उत्तर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने बुधवारी रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे कारण पुढे करत सकाळी तीन तास लिलाव पुकारले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला. कांद्याचे दर पाडण्यासाठी व्यापारी असे करत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी बाजार समितीकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Intro:सोलापुरातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला

सोलापूर-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत शेतकऱ्याचे कांदा लिलाव बंद पडले आहेत शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत असताना व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कांदा लिलाव बंद पडले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीचशे ट्रक कांद्याची आवक झालेली असताना व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयांमध्ये प्रचंड गोंधळ घातला.



Body:सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता मात्र आज सकाळी अचानक व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत कांद्याचे लिलाव पुकारले नाहीत काल रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात कांदा घेऊन येऊन बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी पसरली होती.
व्यापाऱ्यांनी त्यांच्या मागण्याचे कारण पुढे करत तब्बल तीन तास लीला पुकारले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात येऊन प्रचंड गोंधळ घातला यावेळी शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी बाजार समितीकडून कुठलीही प्रयत्न न झाल्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले शेतकरी अडचणीत सापडलेला असताना व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन आलेला शेतकरी हा प्रचंड संतप्त झालेला पाहायला मिळाला


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.