ETV Bharat / state

सोलापूर शहराला विमानसेवेपेक्षा नियमित पाणी पुरवठा गरजेचा - The city of Solapur needs regular water supply

सोलापूर शहराला नियमित विमानसेवे पेक्षा नियमित पाणी पुरवठ्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता.

सोलापूर शहराला विमानसेवेपेक्षा नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे
सोलापूर शहराला विमानसेवेपेक्षा नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे
author img

By

Published : Feb 7, 2021, 6:15 PM IST

सोलापूर - निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून दररोज पाणी पुरवठा करू, असे सांगितले जाते. मात्र सोलापुरातील जलसंकट थांबवण्यासाठी आत्ताच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सोलापूर शहराला नियमित विमानसेवेपेक्षा नियमित पाणीपुरवठ्याची गरज असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अतिशय गोंधळात अर्थसंकल्प मंजूर झाला आणि पाणी पुरवठ्याचा विषय बाजूला राहिला. या विषयाचे गांभीर्य सर्वांना माहित असावे म्हणून अभ्यास करून महेश कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना महत्वाच्या विषयांबाबत गांभीर्य नसून गाफीलपणा केला जात आहे, असे आरोप करत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.

विमानसेवेपेक्षा नियमित पाणी पुरवठा गरजेचा
कर्नाटकला 100 एमएलडी पाणी..
सोलापूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी भीमा नदीत उजनी येथून पाणी सोडले जाते. सर्व पाण्याचे बिल महापालिकेकडून वसूल होते. हे पाणी टाकळी येथील औज व चिंचपूर बंधाऱ्यात साठवले जाते. मात्र नदीकाठच्या गावांमध्ये या पाण्याची चोरी केली जाते. पुढे 100 एमएलडी पाणी कर्नाटक राज्याकडे वाहून जाते. यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणजे वडापूर बंधारा आहे. वडापूर येथे बॅरेजेस मंजूर झाले आहेत. मग येथून का दुहेरी पाईप लाईन आणली जात नाही, असा सवाल देखील महेश कोठे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न..
उजनीपासून सोलापूर शहरापर्यंत दुहेरी किंवा समांतर जलवाहिनी किंवा पाईपलाईन करण्याची योजना आहे. पण ही योजना पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी पाहिले असता, सोलापूर शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच मंजुर झालेल्या अर्थसंकल्पाच्या सभेत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र नियमित पाणी पुरवठ्यावर चर्चा झाली नाही.
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे-
1. सोलापूर शहराला भविष्यात भयंकर आणि मोठ्या जलसंकटाला तोंड द्यावे लागणार.
2. कर्नाटकात दररोज 100 एमएलडी पाणी वाहून जाते. वसूल मात्र सोलापूर महानगरपालिकेकडून होते.
3. सोलापूर शहराला तिसरी जलवाहिनी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दररोज पाणी पुरवठा होऊ शकत नाही.
4. सर्व पक्षांनी पाण्याच्या प्रश्नासंबंधी राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा करून जलसंकट दूर करणे गरजेचे.

सोलापूर - निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून दररोज पाणी पुरवठा करू, असे सांगितले जाते. मात्र सोलापुरातील जलसंकट थांबवण्यासाठी आत्ताच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सोलापूर शहराला नियमित विमानसेवेपेक्षा नियमित पाणीपुरवठ्याची गरज असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अतिशय गोंधळात अर्थसंकल्प मंजूर झाला आणि पाणी पुरवठ्याचा विषय बाजूला राहिला. या विषयाचे गांभीर्य सर्वांना माहित असावे म्हणून अभ्यास करून महेश कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना महत्वाच्या विषयांबाबत गांभीर्य नसून गाफीलपणा केला जात आहे, असे आरोप करत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.

विमानसेवेपेक्षा नियमित पाणी पुरवठा गरजेचा
कर्नाटकला 100 एमएलडी पाणी..
सोलापूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी भीमा नदीत उजनी येथून पाणी सोडले जाते. सर्व पाण्याचे बिल महापालिकेकडून वसूल होते. हे पाणी टाकळी येथील औज व चिंचपूर बंधाऱ्यात साठवले जाते. मात्र नदीकाठच्या गावांमध्ये या पाण्याची चोरी केली जाते. पुढे 100 एमएलडी पाणी कर्नाटक राज्याकडे वाहून जाते. यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणजे वडापूर बंधारा आहे. वडापूर येथे बॅरेजेस मंजूर झाले आहेत. मग येथून का दुहेरी पाईप लाईन आणली जात नाही, असा सवाल देखील महेश कोठे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न..
उजनीपासून सोलापूर शहरापर्यंत दुहेरी किंवा समांतर जलवाहिनी किंवा पाईपलाईन करण्याची योजना आहे. पण ही योजना पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी पाहिले असता, सोलापूर शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच मंजुर झालेल्या अर्थसंकल्पाच्या सभेत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र नियमित पाणी पुरवठ्यावर चर्चा झाली नाही.
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे-
1. सोलापूर शहराला भविष्यात भयंकर आणि मोठ्या जलसंकटाला तोंड द्यावे लागणार.
2. कर्नाटकात दररोज 100 एमएलडी पाणी वाहून जाते. वसूल मात्र सोलापूर महानगरपालिकेकडून होते.
3. सोलापूर शहराला तिसरी जलवाहिनी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दररोज पाणी पुरवठा होऊ शकत नाही.
4. सर्व पक्षांनी पाण्याच्या प्रश्नासंबंधी राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा करून जलसंकट दूर करणे गरजेचे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.