ETV Bharat / state

युती-आघाडीचे नेते एकमेकांचे नातेवाईक - सुजात आंबेडकर

author img

By

Published : Apr 8, 2019, 11:52 PM IST

Updated : Apr 9, 2019, 2:04 AM IST

सामान्यांच्या हक्कासाठी वंचित आघाडीची लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्म आणि वंचितांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी ४८ जागा लढवित आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर महाराज हे मनुवादी विचाराचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना मैदानात उतरविले असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

सुजात आंबेडकर

सोलापूर - भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना सामान्य आणि वंचितांच्या समस्यांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना त्यांची घराणेशाही कायम ठेवायची आहे. संविधानाने सामान्यांना दिलेले हक्क संपवण्याचे काम सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर म्हणाले. आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

सामान्यांच्या हक्कासाठी वंचित आघाडीची लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्म आणि वंचितांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी ४८ जागा लढवत आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर महाराज मनुवादी विचाराचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना मैदानात उतरविले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना स्थानिक नसल्याचा आरोप करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे सोलापुरात किती दिवस राहतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बहुजन वंचित आघाडीवर एआयएमआयएम पक्षाशी युती केल्याचा आणि बहुजन वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. राजधानी दिल्लीत संविधानाला विरोध करणाऱ्यांनी संविधान जाळले तेव्हा केवळ खासदार असादोद्दीन ओवेसी यांनीच संसदेत तो मुद्दा लावून धरला होता. संविधान धोक्यात असताना भाजप-काँग्रेसने तोंड उघडले नाही. त्यातून उभयतांची छुपी मैत्री असल्याचे दिसून येते, असा घणाघाती आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

संसदेतील सत्ताधारी पक्षाचे सदस्य सर्वसामान्यांचे अधिकार काढून घ्यायची भाषा करीत आहेत,त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे.ही लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीकोनातून लोकसभेची ही निवडणूक महत्वाची आहे.या स्थितीला आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याकरिता आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन बहूजन वंचित आघाडीचे प्रशांत गायकवाड यांनी केले.

सुजात आंबेडकर


सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ दक्षिण सोलापूर ताालुक्यातील कासेगांव येथील शिवाजी चौक येथे कॉर्नर सभा झाली. या सभेला सत्यशोधक परिवार आणि ओबीसी संघटनेचे शंकरराव लिंगे,बौध्द महासभेचे भिकाजी कांबळे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी.एन.गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, अमित गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


समतेच्या पुरस्कर्त्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशी मागणी करणारे थोर विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या अमानुष हत्या झाल्या आहेत. समतेचा विचार मांडणाऱ्यांच्या हत्यानंतर कर्नाटक भाजप कार्यालयासमोर फटाके फोडले गेले हे दुर्दैवी आहे. आपले हक्क आणि अधिकार मागणाऱ्यांचे गळे घोटण्याचे काम सुरू आहे, हे चिंताजनक असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.


आजच्या बेकारीला शिंदे साहेब कारणीभूत -
गेली ४० वर्षे राजकीय सत्तास्थानी असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक उच्च पदे उपभोगली. राज्याचा ९ वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्या शून्याधारित अर्थसंकल्पातून त्यांनी बेरोजगारीची फलटण तयार केली.आजच्या बेकारीला शिंदे कारणीभूत असल्याचे गायकवाड म्हणाले.तसेच मोदी-फडणवीसांनी केलेल्या कोणत्याही घोषणांची पुर्तता त्यांनी केली नाही,असे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. विकासाच्या सर्व वाटा सत्तेतून जातात, आता वंचितांना सत्तास्थानी बसविण्याची आपली जबाबदारी आहे, असे मत यावेळी शंकर लिंगे यांनी व्यक्त केले.

सोलापूर - भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना सामान्य आणि वंचितांच्या समस्यांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना त्यांची घराणेशाही कायम ठेवायची आहे. संविधानाने सामान्यांना दिलेले हक्क संपवण्याचे काम सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर म्हणाले. आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

सामान्यांच्या हक्कासाठी वंचित आघाडीची लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्म आणि वंचितांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी ४८ जागा लढवत आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर महाराज मनुवादी विचाराचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना मैदानात उतरविले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना स्थानिक नसल्याचा आरोप करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे सोलापुरात किती दिवस राहतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बहुजन वंचित आघाडीवर एआयएमआयएम पक्षाशी युती केल्याचा आणि बहुजन वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. राजधानी दिल्लीत संविधानाला विरोध करणाऱ्यांनी संविधान जाळले तेव्हा केवळ खासदार असादोद्दीन ओवेसी यांनीच संसदेत तो मुद्दा लावून धरला होता. संविधान धोक्यात असताना भाजप-काँग्रेसने तोंड उघडले नाही. त्यातून उभयतांची छुपी मैत्री असल्याचे दिसून येते, असा घणाघाती आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

संसदेतील सत्ताधारी पक्षाचे सदस्य सर्वसामान्यांचे अधिकार काढून घ्यायची भाषा करीत आहेत,त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे.ही लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीकोनातून लोकसभेची ही निवडणूक महत्वाची आहे.या स्थितीला आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याकरिता आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन बहूजन वंचित आघाडीचे प्रशांत गायकवाड यांनी केले.

सुजात आंबेडकर


सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ दक्षिण सोलापूर ताालुक्यातील कासेगांव येथील शिवाजी चौक येथे कॉर्नर सभा झाली. या सभेला सत्यशोधक परिवार आणि ओबीसी संघटनेचे शंकरराव लिंगे,बौध्द महासभेचे भिकाजी कांबळे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी.एन.गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, अमित गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


समतेच्या पुरस्कर्त्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशी मागणी करणारे थोर विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या अमानुष हत्या झाल्या आहेत. समतेचा विचार मांडणाऱ्यांच्या हत्यानंतर कर्नाटक भाजप कार्यालयासमोर फटाके फोडले गेले हे दुर्दैवी आहे. आपले हक्क आणि अधिकार मागणाऱ्यांचे गळे घोटण्याचे काम सुरू आहे, हे चिंताजनक असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.


आजच्या बेकारीला शिंदे साहेब कारणीभूत -
गेली ४० वर्षे राजकीय सत्तास्थानी असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक उच्च पदे उपभोगली. राज्याचा ९ वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्या शून्याधारित अर्थसंकल्पातून त्यांनी बेरोजगारीची फलटण तयार केली.आजच्या बेकारीला शिंदे कारणीभूत असल्याचे गायकवाड म्हणाले.तसेच मोदी-फडणवीसांनी केलेल्या कोणत्याही घोषणांची पुर्तता त्यांनी केली नाही,असे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. विकासाच्या सर्व वाटा सत्तेतून जातात, आता वंचितांना सत्तास्थानी बसविण्याची आपली जबाबदारी आहे, असे मत यावेळी शंकर लिंगे यांनी व्यक्त केले.

Intro:R_MH_SOL_03_08_VANCHIT_AGHADI_SABHA_S_PAWAR

हक्क-अधिकार सुरक्षित ठेवण्याकरिता वंचित आघाडीच्या पाठिशी राहा :
प्रशांत गायकवाड यांचे आवाहन

सोलापूर-
संसदेतील सत्ताधारी पक्षाचे सदस्य सर्वसामान्यांचे अधिकार काढून घ्यायची भाषा करीत आहेत,त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे.ही लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीकोनातून लोकसभेची ही निवडणूक महत्वाची आहे.या स्थितीला आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याकरिता आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा,असे आवाहन बहूजन वंचित आघाडीचे प्रशांत गायकवाड यांनी केले आहे. Body:सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ दक्षिण सोलापूर ताालुक्यातील कासेगांव येथील शिवाजी चौक येेथ कॉर्नर सभा झाली. या सभेेला
सत्यशोधक परिवार आणि ओबीसी संघटनेचे शंकरराव लिंगे,बौध्द महासभेचे भिकाजी कांबळे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी.एन.गायकवाड,बाळासाहेब बनसोडे,प्रशांत गायडवाड,अमित गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
समतेच्या पुरस्कर्त्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या,लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशी मागणी करणारे थोर विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या अमानुष हत्या झाल्या.समतेचा विचार मांडणाऱ्यांच्या हत्यानंतर कर्नाटक भाजप कार्यालयासमोर फटाके फोडले गेले हे दुर्दैवी आहे.आपले हक्क आणि अधिकार मागणाऱ्यांचे गळे घोटण्याचे काम सुरू आहे, हे चिंताजनक असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना,काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांचे नातेवाईक आहेत.त्यांना सामान्य आणि वंचितांच्या समस्यांशी काही देणे-घेणे नाही.त्यांना त्यांची घराणेशाही कायम ठेवायची आहे.संविधानाने सामान्यांना दिलेले हक्क संपविण्याचे काम सुरू आहे.याउलट सामान्यांच्या हक्कासाठी आपली लढाई सुरू आहे.त्यामुळे सर्व जाती-धर्म आणि वंचितांना घेऊन सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी ४८ जागा लढवित आहेत.तुम्हा-आम्हाला सत्ता स्थानी बसविण्यासाठीचा प्रयोग असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुुजात आंबेडकर यांनी म्हटले.
भाजपचे उमेदवार संत डॉ.जय सिध्देश्वर महाराज मनुवादी विचाराचे पुरस्कर्ते आहेत.त्यामुळे भाजपाने त्यांना मैदानात उतरविले आहे. अॅड.प्रकाश आंबेडकर यांना स्थानिक नसल्याचा आरोप करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे,सोलापुरात किती दिवस राहतात आणि
त्यांनी सोलापूरसाठी काय केले असा खडा सवालही सुजात आंबेडकर यांनी यावेळी केला.
बहुजन वंचित आघाडीवर एआयएमआयएम पक्षाशी युती केल्याचा व बहुजन वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो.राजधानी दिल्लीत संविधानाला विरोध करणाऱ्यांनी संविधान जाळले तेव्हा केवळ खा. बॅ.असादोद्दीन ओवेसी यांनीच संसदेत तो मुद्दा लाऊन धरला होता.संविधान धोक्यात भाजप- काँग्रेसने तोंड उघडले नाही.त्यातून उभयतांची छुपी मैत्री असल्याचे दिसून येते,असा घणाघाती आरोप करताना वंचितांचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी विजयी करा,असे आवाहन शेवटी सुजात आंबेडकर यांनी केले.
यावेळी प्रा.रणजीत जाधव,माजी सरपंच प्रभाकर गायकवाड दावल शेख,भिकाजी कांबळे,अमित गायकवाड,प्रशांत गायकवाड आणि सत्यशोधक परिवाराचे शंकरराव लिंगे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार आणि जातीयवादी धोरणांवर सडकून टीका केली.


आजच्या बेकारीला शिंदे साहेब
कारणीभूत -
गेली ४० वर्षे राजकीय सत्तास्थानी असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक उच्च पदे उपभोगली. राज्याचा ९ वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्या शून्य धारित अर्थसंकल्पातून त्यांनी बेरोजगारीची फलटण तयार केली.आजच्या
बेकारीला शिंदे साहेब कारणीभूत आहेत.तसेच मोदी-फडणवीसांनी केलेल्या कोणत्याही घोषणांची पुर्तता त्यांनी केली नाही,असे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
--

आता वंचितांना सत्तास्थानी बसविण्याची जबाबदारी आपली : शंकरराव लिंगे
युरेशियन आर्यानी बहुजनांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले,पेशवाईने तर गाडगे बांधले. त्यांनीच मराठा समाजाला फसवं आरक्षण दिलं तर पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन धनगर समाजाची फसवणूक केली.महात्मा फुले यांनी वंचितांना त्यांचे हक्क देण्याचा पाय घातला.विकासाच्या सर्व वाटा सत्तेतून जातात,आता वंचितांना सत्तास्थानी बसविण्याची आपली जबाबदारी असून अॅड.आंबेडकर यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य द्या,असे आवाहन शंकरराव लिंगे यांनी यावेळी केले.
या देशात जनावरांची गिणती होते,पण ओबीसींची गणना केली जात नाही.त्यामुळे आता डॉ. बाबासाहेबांच्या देणगीची उतराई करण्याची वेळ आली आहे. हे जातीयवादी सरकार बदललेच पाहिजे अन् आपले अधिकार आपण मिळविले पाहिजेत,असेही शेवटी लिंगे यांनी म्हटले.Conclusion:
Last Updated : Apr 9, 2019, 2:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.