ETV Bharat / state

राजगृह मोडतोड विकृतीमागे कोण आहे याचा शोध घेऊन, त्याला कठोर शिक्षा द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

author img

By

Published : Jul 9, 2020, 7:42 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर न उतरता सोलापूर संभाजी ब्रिगेडने ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून निषेध नोंदवला. या निवदेनात संभाजी ब्रिगेडने, मुंबई येथील राजगृहावरील हल्ला हा शिव-शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर केलेला हल्ला असून सदर हल्ला करणार्‍यांची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

solapur sambhaji brigade reaction on Premises of Dr BR Ambedkar's house 'Rajgruha' vandalised
राजगृह मोडतोड विकृतीमागे कोण आहे याचा शोध घेऊन, त्याला कठोर शिक्षा द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापूर - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह परिसरात मंगळवारी दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच घरातील कुंड्यांही फोडल्या. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत असून, सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर न उतरता सोलापूर संभाजी ब्रिगेडने ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून निषेध नोंदवला. या निवदेनात संभाजी ब्रिगेडने, मुंबई येथील राजगृहावरील हल्ला हा शिव-शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर केलेला हल्ला असून सदर हल्ला करणार्‍यांची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधलेले घर म्हणून राजगृहाची ओळख संपूर्ण जगाला आहे. हा हल्ला हा केवळ वास्तूवरील हल्ला नसून तो ज्ञान भांडारावरील हल्ला आहे, असे आम्ही मानतो. असा हल्ला विकृत मानसिकतेचे द्योतक आहे. या हल्ल्यातील विकृत हल्लेखोरांचा गांर्भीयाने शोध घेऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी आणि आरोपींच्या या विकृतीमागे कोण आहे याचा शोध घेऊन, त्या संबंधितांनाही कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचे हे निवासस्थान आहे. पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधले होते. बाबासाहेबांचे जगभरातील अनुयायी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. तोडफोड घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत केला आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन इफेक्ट; व्हिडिओ कॉन्फरन्सने ऑनलाईन साक्षीद्वारे घटस्फोट मंजूर, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा - 'राजगृह' तोडफोड प्रकरणाचा सोलापुरात निषेध; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन

सोलापूर - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह परिसरात मंगळवारी दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच घरातील कुंड्यांही फोडल्या. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत असून, सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर न उतरता सोलापूर संभाजी ब्रिगेडने ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून निषेध नोंदवला. या निवदेनात संभाजी ब्रिगेडने, मुंबई येथील राजगृहावरील हल्ला हा शिव-शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर केलेला हल्ला असून सदर हल्ला करणार्‍यांची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधलेले घर म्हणून राजगृहाची ओळख संपूर्ण जगाला आहे. हा हल्ला हा केवळ वास्तूवरील हल्ला नसून तो ज्ञान भांडारावरील हल्ला आहे, असे आम्ही मानतो. असा हल्ला विकृत मानसिकतेचे द्योतक आहे. या हल्ल्यातील विकृत हल्लेखोरांचा गांर्भीयाने शोध घेऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी आणि आरोपींच्या या विकृतीमागे कोण आहे याचा शोध घेऊन, त्या संबंधितांनाही कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचे हे निवासस्थान आहे. पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधले होते. बाबासाहेबांचे जगभरातील अनुयायी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. तोडफोड घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत केला आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन इफेक्ट; व्हिडिओ कॉन्फरन्सने ऑनलाईन साक्षीद्वारे घटस्फोट मंजूर, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा - 'राजगृह' तोडफोड प्रकरणाचा सोलापुरात निषेध; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.