ETV Bharat / state

परतीच्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील कांदा पिकांचे नुकसान

author img

By

Published : Oct 28, 2019, 9:49 AM IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. या सततच्या पावसामुळे कांदा पीक मात्र पिवळे पडून करपू लागले आहे. तर काढणीयोग्य कांदा शेतातच नासू लागला आहे.

परतीच्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील कांदा पिकांचे नुकसान

सोलापूर - जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरीमध्ये पाणी साचून राहिल्याने कांदापीक नासायला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. या सततच्या पावसामुळे कांदा पीक मात्र पिवळे पडून करपू लागले आहे. तर काढणीयोग्य कांदा शेतातच नासू लागला आहे. तसेच कांद्या प्रमाणेच रब्बी हंगामातील माळरानावरील ज्वारी पिकाला या पावसाचा फायदा होणार असला तरी मात्र पावासाचे प्रमाण अति झाल्यास हे देखील पीक वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे पुढील उन्हाळा सोयीचा जाणार असला तरी सध्या मात्र शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.

सोलापूर - जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरीमध्ये पाणी साचून राहिल्याने कांदापीक नासायला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. या सततच्या पावसामुळे कांदा पीक मात्र पिवळे पडून करपू लागले आहे. तर काढणीयोग्य कांदा शेतातच नासू लागला आहे. तसेच कांद्या प्रमाणेच रब्बी हंगामातील माळरानावरील ज्वारी पिकाला या पावसाचा फायदा होणार असला तरी मात्र पावासाचे प्रमाण अति झाल्यास हे देखील पीक वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे पुढील उन्हाळा सोयीचा जाणार असला तरी सध्या मात्र शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.

Intro:Body:करमाळा - पावसामुळे कांदा पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान


Anchor - परिसरात सतत पाच दिवसापासून परतीचा पाऊस पडत आहे यामुळे लागवड योग्य कांदा रोपांचा तसेच कांदा पिकांच्या सरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने या पाणी साचलेल्या पाण्याचा परिणाम कांदा रोपे व काढणीस आलेला कांदा सडू लागला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
Vo - लागवड योग्य कांदा सततच्या पावसामुळे पिवळा पडून जळून चालला आहे तर काढणीयोग्य कांदा शेतातच नासून चालला आहे लागवड योग्य कांदा रोपे जळून चालल्यामुळे आगामी काळात कांदा रोपांचा तुटवडा निर्माण होऊन कांदा लागवडीसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
कांद्या प्रमाणेच रब्बी हंगामातील माळरानावरील ज्वारी पिकाला या पावसाचा फायदा होणार असला तरी सखल भागातील ज्वारी पीक पाणी साचून राहिल्याने ही पिके पिवळी पडू लागल्याने ही पिके वया जाणार आहेत.

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.