ETV Bharat / state

प्रशासनाचा तुघलकी कारभार,'सन्मान निधी' न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

पाचशे रुपयाच्या पाणीपट्टीसाठी शेतकऱ्याची जमीन सरकारजमा केली होती. पाणीपट्टीची रक्कम व्याजासह भरून देखील सरकारजमा केलेली स्वमालकीची जमीन परत न मिळाल्यामुळे सरकारी कामकाजाला कंटाळलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

author img

By

Published : Feb 28, 2019, 10:55 AM IST

Updated : Feb 28, 2019, 12:37 PM IST

Solapur

सोलापूर - पंतप्रधानांनी जमा केलेले सन्मान निधीचे पैसे गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, वयोवृद्ध शेतकऱ्याला त्याची शेतजमीन सरकारजमा असल्यामुळे हे पैसे मिळाले नाहीत, या नैराशातून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात घडली असून सिद्धाराम विभुते, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

विभुतेंची मुस्ती गावात त्यांच्या मोठ्या भावाच्या नावावर जमीन होती. मुस्ती गावाच्या वरील बाजूस हरणा तलाव आहे. या तलावातील पाणी शेतीसाठी वापरल्यामुळे पाटबंधारे विभागाने ५०० रुपयांची पाणीपट्टी लावली होती. या शेतकऱ्याला ५०० रुपयांची पाणीपट्टी भरणा न झाल्यामुळे जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाने या शेतकऱ्यांची जमीनच ५०० रुपयाच्या पाणीपट्टीसाठी सरकार जमा करून टाकली.

'सन्मान निधी' न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

या शेतकऱ्याला शेतजमीन सरकारजमा झाल्याचे कळल्यानंतर त्याने सरकारी कार्यालयाच्या वर्षानुवर्षे खेटा मारल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. १९८२ साली पाणीपट्टी न भरल्यामुळे शेतजमीन सरकारजमा केली गेली आणि त्यानंतर शेतकऱ्याने ५०० रुपयाच्या पाणीपट्टीचे व्याजासह पैसेही सरकारी तिजोरीत जमा केले. पाणीपट्टीचे पैसे व्याजासह भरल्यानंतरही स्वमालकीची जमीन स्वतःच्या नावावर होत नसल्यामुळे विभुते कुटुंबीय कंटाळून गेले होते.

जमीन स्वतःच्या मालकीची असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही जमीन सरकारजमा झाली. प्रत्यक्षात विभुते कुटुंबीय शेतजमीन कसत होते. मात्र, सातबाऱ्यावर सरकारचे नाव होते, या सर्व प्रकारामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने जेवढ्या काही योजना दिल्या. त्या सवलती दिल्या त्याचा काहीही फायदा झाला नाही. मागील अनेक वर्षापासून विभुते कुटुंबीय सरकारचे नाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या नावावर थेट पैसे जमा केले. पंतप्रधानांनी जमा केलेले हे पैसे सिद्धाराम विभुते यांना मिळाले नाहीत. कारण, स्वमालकीची असलेली जमीन सरकारजमा झाली होती. गावातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली. मात्र, आपण शेतात काबाडकष्ट करूनही आपल्या नावावर जमीन नाही यामुळे खचून गेलेल्या सिद्धाराम विभूते बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

undefined

विभुते शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सरकारी यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विभुते यांचा मुलगा व मुस्ती गावातील नागरिकांनी केली आहे.

सोलापूर - पंतप्रधानांनी जमा केलेले सन्मान निधीचे पैसे गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, वयोवृद्ध शेतकऱ्याला त्याची शेतजमीन सरकारजमा असल्यामुळे हे पैसे मिळाले नाहीत, या नैराशातून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात घडली असून सिद्धाराम विभुते, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

विभुतेंची मुस्ती गावात त्यांच्या मोठ्या भावाच्या नावावर जमीन होती. मुस्ती गावाच्या वरील बाजूस हरणा तलाव आहे. या तलावातील पाणी शेतीसाठी वापरल्यामुळे पाटबंधारे विभागाने ५०० रुपयांची पाणीपट्टी लावली होती. या शेतकऱ्याला ५०० रुपयांची पाणीपट्टी भरणा न झाल्यामुळे जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाने या शेतकऱ्यांची जमीनच ५०० रुपयाच्या पाणीपट्टीसाठी सरकार जमा करून टाकली.

'सन्मान निधी' न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

या शेतकऱ्याला शेतजमीन सरकारजमा झाल्याचे कळल्यानंतर त्याने सरकारी कार्यालयाच्या वर्षानुवर्षे खेटा मारल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. १९८२ साली पाणीपट्टी न भरल्यामुळे शेतजमीन सरकारजमा केली गेली आणि त्यानंतर शेतकऱ्याने ५०० रुपयाच्या पाणीपट्टीचे व्याजासह पैसेही सरकारी तिजोरीत जमा केले. पाणीपट्टीचे पैसे व्याजासह भरल्यानंतरही स्वमालकीची जमीन स्वतःच्या नावावर होत नसल्यामुळे विभुते कुटुंबीय कंटाळून गेले होते.

जमीन स्वतःच्या मालकीची असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही जमीन सरकारजमा झाली. प्रत्यक्षात विभुते कुटुंबीय शेतजमीन कसत होते. मात्र, सातबाऱ्यावर सरकारचे नाव होते, या सर्व प्रकारामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने जेवढ्या काही योजना दिल्या. त्या सवलती दिल्या त्याचा काहीही फायदा झाला नाही. मागील अनेक वर्षापासून विभुते कुटुंबीय सरकारचे नाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या नावावर थेट पैसे जमा केले. पंतप्रधानांनी जमा केलेले हे पैसे सिद्धाराम विभुते यांना मिळाले नाहीत. कारण, स्वमालकीची असलेली जमीन सरकारजमा झाली होती. गावातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली. मात्र, आपण शेतात काबाडकष्ट करूनही आपल्या नावावर जमीन नाही यामुळे खचून गेलेल्या सिद्धाराम विभूते बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

undefined

विभुते शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सरकारी यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विभुते यांचा मुलगा व मुस्ती गावातील नागरिकांनी केली आहे.

Intro:R_MH_SOL_01_27_FARMER_SUSIDE_S_PAWAR_VIS

500 रुपयांच्या पाणी पट्टी साठी शेतजमीन सरकार जमा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर-
पाचशे रुपयाच्या पाणीपट्टी साठी शेतकऱ्याची जमीन सरकारजमा केली पाणीपट्टीची रक्कम व्याजासह भरून देखील सरकार जमा केलेली स्वमालकीची जमीन परत न मिळाल्यामुळे सरकारी कामकाजाला कंटाळलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांना गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील या गावात घडला आहे सिद्धाराम विभुते या शेतकऱ्यांना सरकारी लालफितीच्या कामकाजाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे


Body:सिद्धाराम विभुते हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावातील गरीब शेतकरी एकत्र कुटुंबात राहणारी विभुते यांच्या थोरल्या भावाच्या नावावर जमीन होती गावाच्या वरील बाजूस हरणा तलाव आहे या तलावातील पाणी शेतीसाठी वापरल्या मुळे पाटबंधारे विभागाने पाचशे रुपयांची पाणीपट्टी लावली होती या गरीब शेतकऱ्याला पाचशे रुपयांची पाणीपट्टी भरणा न झाल्यामुळे जलसंपदा विभाग असून महसूल विभागाने या शेतकऱ्यांची जमीनच पाचशे रुपयाच्या पाणीपट्टी साठी सरकार जमा करून टाकली या शेतकऱ्याला शेतजमीन सरकार जमा झाल्याचे कळल्यानंतर सरकारी कार्यालयाच्या वर्षानुवर्षे खेटा मारल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही 1982 स*** पाणीपट्टी न भरल्यामुळे शेत जमीन सरकारजमा केली गेली आणि त्यानंतर या शेतकऱ्यांनी पाचशे रुपयाच्या पाणीपट्टीचे व्याजासह पैसे ही सरकारी तिजोरीत जमा केले पाणीपट्टी चे पैसे व्याजासह भरल्यानंतरही सो मालकीची जमीन स्वतःच्या नावावर होत नसल्यामुळे विभुते कुटुंबीय कंटाळून गेले होते जमीन स्वतःच्या मालकीची असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही जमीन सरकारी जमा झाली प्रत्यक्षात विभुते कुटुंबीयच शेत जमीन कसत होते मात्र सातबाराला नाव सरकारचे होते या सर्व प्रकारामुळे आतापर्यंत शेतकऱ्याला सरकारने जेवढ्या काही योजना दिल्या सवलती दिल्या त्याची एक दमडीही मिळाला मिळाली नाही मागील अनेक वर्षापासून विभुते कुटुंबीय हे सरकारचे नाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
1982 चाली सरकार जमा झालेली जमीन तब्बल 37 वर्षानंतरही त्या शेतकऱ्याच्या नावावर न होता त्या शेतकऱ्याचा जाच सुरूच होता दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या नावावर थेट पैसे जमा केले पंतप्रधानांनी जमा केलेले पैसे हे सिद्धाराम विभुते ना मिळाले नाहीत याचे कारण म्हणजे सौर मालकीची असलेली जमीन सरकारजमा होती आणि सातबाऱ्यावर सरकारचे नाव असल्यामुळे त्यांनाही पैसे मिळाले नाहीत गावातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली आणि मी शेतात काबाडकष्ट करूनही माझ्या नावावर जमीन नाही याने खचून गेलेल्या सिद्धाराम विभूते यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली.
विभुते या शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या आणि मागील 32 वर्षांपासून फक्त पाचशे रुपये साठी शेत जमीन सरकार जमा करणाऱ्या व व्याजासह पैसे भरूनही रकारचे नाव कमी न करता या शेतकर्‍यांना त्रास देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विभुते यांचा मुलगा वस्ती येथील गावकऱ्यांनी केली आहे


Conclusion:बाईट महादेव सिद्धाराम विभुते मयताचा मुलगा

बाईट भीमाशंकर जमादार मुस्ती ग्रामस्थ

नोट मयत शेतकरी सिद्धाराम बिराजदार यांचे फोटो आणि काही कागदपत्र हे मेल वर पाठवीत आहे
Last Updated : Feb 28, 2019, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.