ETV Bharat / state

मंदिरे उघडा : सोलापुरात भाजपाचे मल्लिकार्जुन मंदिरासमोर 'टाळ मृदंग आंदोलन'

author img

By

Published : Oct 13, 2020, 3:01 PM IST

आले. गेल्या साडे सहा महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. भाविकांनी अनेकवेळा मागणी करूनही मंदिरे सुरू करण्यात आलेली नाही. असे म्हणत मंगळवारी सकाळी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर मंदिर भक्तांसाठी खुले करा, अशा मागणीसह भाविकांनी घंटानाद आंदोलन केले.

भाजपचे मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग आंदोलन
भाजपचे मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग आंदोलन

सोलापूर - मदिरेचे दार उघडले पण मंदिरांचे नाही, असा भेदभाव सरकारने का केला. भाविकांना व भक्तांना वाळीत का ठेवले. उद्धवा धुंद तुझे सरकार! मंदिरांचे दार कधी उघडणार. दारू नको! दार उघड, अशी मागणी करत भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग वाजवून आंदोलन केले.

भाजपाचे मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग आंदोलन

मंगळवारी सकाळी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर मंदिर भक्तांसाठी खुले करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली पण मंदिरांचे दार नाही. राज्य सरकारने भक्तांसोबत व देवासोबत भेदभाव केला आहे. गेल्या साडे सहा महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. भाविकांनी अनेकवेळा मागणी करूनही मंदिरे सुरू करण्यात आलेली नाही, असे म्हणत भाविकांनी घंटानाद आंदोलन केले. तरीही महाविकास आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार! अशी अवस्था झाली असल्याची टीका देखील या आंदोलनात करण्यात आली.

अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून सोलापूर शहरातील बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर भाविकांनी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विविध संप्रदायाचे साधू संत, धर्माचार्य, पुरोहित उपोषणात सहभागी झाले होते. फुल विक्रेते, प्रसाद विक्रेते, उपजीविकेसाठी मंदिरांवर अवलंबून असलेले सर्व व्यवसायिकसुद्धा या उपोषणात सहभागी झाले होते. भाजपाने देखील या आंदोलनाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला होता. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य, भाजपा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर कांचना यंनम, नगरसेविका वंदना गायकवाड, सोनाली मुटकेरी, रामेश्वरी बिरू आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'कोरोना काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुसंवाद आवश्यक'

सोलापूर - मदिरेचे दार उघडले पण मंदिरांचे नाही, असा भेदभाव सरकारने का केला. भाविकांना व भक्तांना वाळीत का ठेवले. उद्धवा धुंद तुझे सरकार! मंदिरांचे दार कधी उघडणार. दारू नको! दार उघड, अशी मागणी करत भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग वाजवून आंदोलन केले.

भाजपाचे मल्लिकार्जुन मंदिरासमोर टाळ मृदंग आंदोलन

मंगळवारी सकाळी बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर मंदिर भक्तांसाठी खुले करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली पण मंदिरांचे दार नाही. राज्य सरकारने भक्तांसोबत व देवासोबत भेदभाव केला आहे. गेल्या साडे सहा महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. भाविकांनी अनेकवेळा मागणी करूनही मंदिरे सुरू करण्यात आलेली नाही, असे म्हणत भाविकांनी घंटानाद आंदोलन केले. तरीही महाविकास आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार! अशी अवस्था झाली असल्याची टीका देखील या आंदोलनात करण्यात आली.

अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून सोलापूर शहरातील बळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर भाविकांनी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विविध संप्रदायाचे साधू संत, धर्माचार्य, पुरोहित उपोषणात सहभागी झाले होते. फुल विक्रेते, प्रसाद विक्रेते, उपजीविकेसाठी मंदिरांवर अवलंबून असलेले सर्व व्यवसायिकसुद्धा या उपोषणात सहभागी झाले होते. भाजपाने देखील या आंदोलनाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला होता. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य, भाजपा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर कांचना यंनम, नगरसेविका वंदना गायकवाड, सोनाली मुटकेरी, रामेश्वरी बिरू आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'कोरोना काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुसंवाद आवश्यक'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.