ETV Bharat / state

Nilesh Rane criticizes Vinayak Raut : विनायक राऊत दहावी दोनदा नापास; त्यांनी कायदा शिकवला तर, महाराष्ट्र संकटात

author img

By

Published : Aug 5, 2022, 4:57 PM IST

निलेश राणे ( Nilesh Rane  ) यांनी शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यावर ( Nilesh Rane criticizes Vinayak Raut ) निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट ( Nilesh Rane Tweet ) करत शिवसेना नेते विनायक राऊत तसेच खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ), ( Vinayak Raut ) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विनायक राऊत दहावी दोनदा नापास आहे. ते कायदे तज्ञ कधीपासून झाले?, असा खोचक सवला त्यांनी केला आहे.

Nilesh Rane criticizes Vinayak Raut
निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका

सिंधुदुर्ग - मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक बदल पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गट, शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. यावरून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. आता निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी सेना नेते विनायक राऊत यांच्यावर ( Nilesh Rane criticizes Vinayak Raut ) निशाणा साधला आहे.

निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका

दहावीमध्ये दोनदा नापास - निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट ( Nilesh Rane Tweet ) करत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ), विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विनायक राऊत दहावी दोनदा नापास आहे. खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?, असा खोचक सवला त्यांनी केला आहे. राणे ट्वीटमध्ये म्हणतात, सामंत यांच्यावरील हल्लासंदर्भात विनायक राऊत, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली. या प्रकरणात विनायक राऊत यांच्यासारखे दोन वेळा दहावी नापास झालेले नेते कायदा शिकवू लागले तर, महाराष्ट्र संकटात येईल. दहावीमध्ये दोनदा नापास झालेल्या व्यक्तीचा कायद्याशी काही संबंध आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Nilesh Rane criticizes Vinayak Raut
निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका

हेही वाचा - Gram Panchayat Election Results : सोलापुरात भाजपला जबर धक्का; चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला तर, मनगोळीमध्ये राष्ट्रवादी

कायदा शिकवत 307 कलमाबद्दल राऊत बोलत आहेत. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री असताना किती भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांवर तुम्ही 307 ची केस टाकली आहे. हे विसरलात का? सायबर क्राईम अंतर्गत किती मुलांना अटक केली. कित्येकांच्या आई-वडिलांना त्रास दिला हे सर्व विसरलात का?, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये फोन करून अधिकाऱ्यांना अनेकांवर 307 नुसार करावाई करण्याचे आदेश दिले होते, असाही खुलासा राणेंनी केला आहे.


हेही वाचा - Saamana Editor in Chief : उद्धव ठाकरे पुन्हा दैनिक सामनाचे मुख्य संपादक

सिंधुदुर्ग - मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक बदल पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गट, शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. यावरून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. आता निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी सेना नेते विनायक राऊत यांच्यावर ( Nilesh Rane criticizes Vinayak Raut ) निशाणा साधला आहे.

निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका

दहावीमध्ये दोनदा नापास - निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट ( Nilesh Rane Tweet ) करत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ), विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विनायक राऊत दहावी दोनदा नापास आहे. खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?, असा खोचक सवला त्यांनी केला आहे. राणे ट्वीटमध्ये म्हणतात, सामंत यांच्यावरील हल्लासंदर्भात विनायक राऊत, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली. या प्रकरणात विनायक राऊत यांच्यासारखे दोन वेळा दहावी नापास झालेले नेते कायदा शिकवू लागले तर, महाराष्ट्र संकटात येईल. दहावीमध्ये दोनदा नापास झालेल्या व्यक्तीचा कायद्याशी काही संबंध आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Nilesh Rane criticizes Vinayak Raut
निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका

हेही वाचा - Gram Panchayat Election Results : सोलापुरात भाजपला जबर धक्का; चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला तर, मनगोळीमध्ये राष्ट्रवादी

कायदा शिकवत 307 कलमाबद्दल राऊत बोलत आहेत. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री असताना किती भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांवर तुम्ही 307 ची केस टाकली आहे. हे विसरलात का? सायबर क्राईम अंतर्गत किती मुलांना अटक केली. कित्येकांच्या आई-वडिलांना त्रास दिला हे सर्व विसरलात का?, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये फोन करून अधिकाऱ्यांना अनेकांवर 307 नुसार करावाई करण्याचे आदेश दिले होते, असाही खुलासा राणेंनी केला आहे.


हेही वाचा - Saamana Editor in Chief : उद्धव ठाकरे पुन्हा दैनिक सामनाचे मुख्य संपादक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.