ETV Bharat / state

सिंधुदुर्गातील माणगावमध्ये दोन माणसांनी अडवला 300 लोकांचा रस्ता - road blocked news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव गावातीला धरण वाढीमधल्या तब्बल २० घरांचा गावातील २ माणसांनी रस्ता बंद केला आहे.

Mangaon
Mangaon
author img

By

Published : Dec 17, 2020, 2:00 PM IST

Updated : Dec 17, 2020, 2:53 PM IST

सिंधुदुर्ग - "गाव करी ते राव काय करी" अशी तळकोकणात म्हण आहे. मात्र कोकणी माणसानेच या म्हणीला फाटा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव गावातीला धरण वाढीमधल्या तब्बल २० घरांचा गावातील २ माणसांनी रस्ता बंद केला आहे. याबाबत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. धरणवाडीत ३०० लोकवस्ती आहे. येथील मंदिरात एकत्र येत आता या लोकांनी थेट संघर्षाचा निश्चय केला आहे.

ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव हे जिल्ह्यातल्या सहकाराच्या क्रांतीतील एक महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील कृषी प्रधान गाव म्हणूनही माणगावची ओळख आहे. मात्र याच गावात एकीतून उभ्या राहिलेल्या सहकाराच्या क्रांतीला फाटा देणारी घटना घडली आहे. गावातील धरण वाढीत जाणारा रस्ता येथीलच दोन ग्रामस्थांनी अडवला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहे. त्यावर ग्रामपंचायतीने मार्ग बांधणीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र १२ फूट रुंदीचा हा मार्ग वाढीत पोचण्याच्या आतच येथील २ ग्रामस्थांनी दोन्ही बाजूला या मार्गावर अतिक्रमण केले आहे. एका बाजूने मार्ग खोदला आहे तर दुसऱ्या बाजूने घराच्या अंगणाला मार्गावरच पायऱ्या बांधल्या आहेत. अंगणाचे छप्पर थेट मार्गावरच आले असल्याने मोठे वाहनही पुढे जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. या ठिकाणी १२ फुटाच्या रुंदीच्या जागी केवळ ५ फुटांहून कमी मार्ग उरला आहे. दोन व्यक्तीची ही दहशत गावलाच नाही तर ग्रामपंचायत सत्ताधारी आणि प्रशासनालाही भारी पडत आहे.

राजकीय दबावामुळे कुठचीही कारवाई नाही

यावेळी बोलताना पांडुरंग वारंग म्हणाले, की या मार्गाच्या बाबतीत राजकीय दबाव असल्याने मार्गाची स्थिती वाईट आहे. हा मार्ग १९५८ साली ग्रामपंचायतीत नोंद झालेला रस्ता आहे. येथील २ नागरिकांनी एवढे अतिक्रमण केलेले आहे, कि त्या ठिकाणी रस्ता ५ फुटाचा झालेला आहे. त्यांनी सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे आमच्या वाडीपर्यंत साधे वाहनही येऊ शकत नाही. माझे वडील आता आजारी असतात. त्यांना कधीही डॉक्टराकडे जावे लागते. अशावेळी स्थानिकांची मदत नसती, तर माझे वडील आज नसते, हे सत्य आहे, असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा

राघो धोंडी धुरी म्हणाले, की याबाबत आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. ग्रामपंचायतीने आमच्या मागण्यांना होकार दिला. त्यानंतर आम्ही धरणवाडीत जाणार हा मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले, मात्र त्यामुळे कोणताही बदल झालेला दिसला नाही, असेही ते म्हणाले.

पोलीस बंदोबस्थात केले होते मार्गाचे काम

अनिल विठ्ठल वारंग म्हणाले, की वादग्रस्त जागेच्या ठिकाणी रस्त्याची बांधणी मी स्वतः केली आहे. ग्रामपंचायतीकडून हे काम कोणी घेत नव्हते म्हणून मी घेतले. माझ्याकडे आजही त्याची वर्कऑर्डर आहे. हा मार्ग ९८४ फूट लांब आणि १२ फूट रुंदीचा होता. या मार्गाचे काम कोणीही करत नव्हते. मात्र ग्रामपंचायतीने घटनास्थळी पोलीस कुमक पाठवली. त्यांच्या उपस्थितीत काम पूर्ण केले. आता त्यानंतर मार्गाचे लाखो रुपये खर्च केलेले हे काम तोडण्यात आले. गावातील दोनच मानणे अशाप्रकारे गावाला वेठीस धरत असल्याचे ते म्हणाले.

रस्ता असून जावे लागते चालत

मोहिनी मोहन धुरी म्हणाल्या, की सर्वच समस्येला सामोरे जावे लागते. रस्ता असून चालत जावे लागते. गरोदर बाई असेल तर तिला चालतच मुख्य मार्गापर्यंत जावे लागते. माझे पती आजारी आहेत. त्यांना डॉक्टर उपचारासाठी न्यायचे असेल तर चालतच जावे लागते. गावातील दोघांनी मार्ग अडवल्याने आम्हाला पायपीट करावी लागते. दरम्यान, माणगाव धरण वाडीतील दोन माणसांनी येथील लोकांचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे शासन दरबारी सातत्याने विनंती करणारे हे लोक आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना हवाय त्यांच्या हक्काचा मार्ग. मात्र सध्या तो अडवला आहे.

सिंधुदुर्ग - "गाव करी ते राव काय करी" अशी तळकोकणात म्हण आहे. मात्र कोकणी माणसानेच या म्हणीला फाटा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव गावातीला धरण वाढीमधल्या तब्बल २० घरांचा गावातील २ माणसांनी रस्ता बंद केला आहे. याबाबत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. धरणवाडीत ३०० लोकवस्ती आहे. येथील मंदिरात एकत्र येत आता या लोकांनी थेट संघर्षाचा निश्चय केला आहे.

ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव हे जिल्ह्यातल्या सहकाराच्या क्रांतीतील एक महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील कृषी प्रधान गाव म्हणूनही माणगावची ओळख आहे. मात्र याच गावात एकीतून उभ्या राहिलेल्या सहकाराच्या क्रांतीला फाटा देणारी घटना घडली आहे. गावातील धरण वाढीत जाणारा रस्ता येथीलच दोन ग्रामस्थांनी अडवला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहे. त्यावर ग्रामपंचायतीने मार्ग बांधणीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र १२ फूट रुंदीचा हा मार्ग वाढीत पोचण्याच्या आतच येथील २ ग्रामस्थांनी दोन्ही बाजूला या मार्गावर अतिक्रमण केले आहे. एका बाजूने मार्ग खोदला आहे तर दुसऱ्या बाजूने घराच्या अंगणाला मार्गावरच पायऱ्या बांधल्या आहेत. अंगणाचे छप्पर थेट मार्गावरच आले असल्याने मोठे वाहनही पुढे जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. या ठिकाणी १२ फुटाच्या रुंदीच्या जागी केवळ ५ फुटांहून कमी मार्ग उरला आहे. दोन व्यक्तीची ही दहशत गावलाच नाही तर ग्रामपंचायत सत्ताधारी आणि प्रशासनालाही भारी पडत आहे.

राजकीय दबावामुळे कुठचीही कारवाई नाही

यावेळी बोलताना पांडुरंग वारंग म्हणाले, की या मार्गाच्या बाबतीत राजकीय दबाव असल्याने मार्गाची स्थिती वाईट आहे. हा मार्ग १९५८ साली ग्रामपंचायतीत नोंद झालेला रस्ता आहे. येथील २ नागरिकांनी एवढे अतिक्रमण केलेले आहे, कि त्या ठिकाणी रस्ता ५ फुटाचा झालेला आहे. त्यांनी सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे आमच्या वाडीपर्यंत साधे वाहनही येऊ शकत नाही. माझे वडील आता आजारी असतात. त्यांना कधीही डॉक्टराकडे जावे लागते. अशावेळी स्थानिकांची मदत नसती, तर माझे वडील आज नसते, हे सत्य आहे, असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा

राघो धोंडी धुरी म्हणाले, की याबाबत आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. ग्रामपंचायतीने आमच्या मागण्यांना होकार दिला. त्यानंतर आम्ही धरणवाडीत जाणार हा मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले, मात्र त्यामुळे कोणताही बदल झालेला दिसला नाही, असेही ते म्हणाले.

पोलीस बंदोबस्थात केले होते मार्गाचे काम

अनिल विठ्ठल वारंग म्हणाले, की वादग्रस्त जागेच्या ठिकाणी रस्त्याची बांधणी मी स्वतः केली आहे. ग्रामपंचायतीकडून हे काम कोणी घेत नव्हते म्हणून मी घेतले. माझ्याकडे आजही त्याची वर्कऑर्डर आहे. हा मार्ग ९८४ फूट लांब आणि १२ फूट रुंदीचा होता. या मार्गाचे काम कोणीही करत नव्हते. मात्र ग्रामपंचायतीने घटनास्थळी पोलीस कुमक पाठवली. त्यांच्या उपस्थितीत काम पूर्ण केले. आता त्यानंतर मार्गाचे लाखो रुपये खर्च केलेले हे काम तोडण्यात आले. गावातील दोनच मानणे अशाप्रकारे गावाला वेठीस धरत असल्याचे ते म्हणाले.

रस्ता असून जावे लागते चालत

मोहिनी मोहन धुरी म्हणाल्या, की सर्वच समस्येला सामोरे जावे लागते. रस्ता असून चालत जावे लागते. गरोदर बाई असेल तर तिला चालतच मुख्य मार्गापर्यंत जावे लागते. माझे पती आजारी आहेत. त्यांना डॉक्टर उपचारासाठी न्यायचे असेल तर चालतच जावे लागते. गावातील दोघांनी मार्ग अडवल्याने आम्हाला पायपीट करावी लागते. दरम्यान, माणगाव धरण वाडीतील दोन माणसांनी येथील लोकांचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे शासन दरबारी सातत्याने विनंती करणारे हे लोक आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना हवाय त्यांच्या हक्काचा मार्ग. मात्र सध्या तो अडवला आहे.

Last Updated : Dec 17, 2020, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.