ETV Bharat / state

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक, सासू फरार

भक्ती पाटील या महिलेचा पाच वर्षांपूर्वी वैभववाडी येथील भरत पाटील याच्याशी विवाह झाला होता. भरत हा माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. लग्न झाल्यापासून भरत आणि त्याची आई वनिता हे भक्तीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. या जाचाला कंटाळून ती १ एप्रिलला माहेरी निघून गेली. पण, गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्यावर ती सासरी परतली.

author img

By

Published : Apr 25, 2019, 12:08 PM IST

मृत भक्ती पाटील

सिंधुदुर्ग - वैभववाडी तालुक्यातील भक्ती पाटील या महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तर, तिची सासू अजूनही फरार आहे. आरोपी भरत पाटील याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भक्ती पाटील या महिलेचा पाच वर्षांपूर्वी वैभववाडी येथील भरत पाटील याच्याशी विवाह झाला होता. भरत हा माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. लग्न झाल्यापासून भरत आणि त्याची आई वनिता हे भक्तीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. या जाचाला कंटाळून ती १ एप्रिलला माहेरी निघून गेली. पण, गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्यावर ती सासरी परतली.

१० एप्रीलला भक्तीचा भाऊ सुरज तळेकर यांनी तिला फोन केला. तेव्हा भरत पाटील याने ती स्वयंपाक करताना भाजली गेली आहे, असे सांगितले. तेव्हा भक्तीच्या माहेरच्यांनी पाटील कुटुंबावर भक्तीला पेटवून दिल्याचा आरोप केला. पण, स्वयपाक करत असताना रॉकेलची बाटली अंगावर पडल्याने आग लागली. त्यामुळे भाजले, असा जबाब भक्तीने रुग्णालयात नोंदवला होता.

पंधरा दिवस उपचार केल्यानंतरही तिचा मृत्यू झाला. भक्तीला दोन लहान मुले आहेत. भक्तीने अपघाताने जळाल्याचे सांगितले असले तरी सासरचे लोक जाच देत होते असे जबाबात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी पती, सासू यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. बुधवारी आरोपी भरत पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करत आहेत.

सिंधुदुर्ग - वैभववाडी तालुक्यातील भक्ती पाटील या महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तर, तिची सासू अजूनही फरार आहे. आरोपी भरत पाटील याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भक्ती पाटील या महिलेचा पाच वर्षांपूर्वी वैभववाडी येथील भरत पाटील याच्याशी विवाह झाला होता. भरत हा माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. लग्न झाल्यापासून भरत आणि त्याची आई वनिता हे भक्तीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. या जाचाला कंटाळून ती १ एप्रिलला माहेरी निघून गेली. पण, गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्यावर ती सासरी परतली.

१० एप्रीलला भक्तीचा भाऊ सुरज तळेकर यांनी तिला फोन केला. तेव्हा भरत पाटील याने ती स्वयंपाक करताना भाजली गेली आहे, असे सांगितले. तेव्हा भक्तीच्या माहेरच्यांनी पाटील कुटुंबावर भक्तीला पेटवून दिल्याचा आरोप केला. पण, स्वयपाक करत असताना रॉकेलची बाटली अंगावर पडल्याने आग लागली. त्यामुळे भाजले, असा जबाब भक्तीने रुग्णालयात नोंदवला होता.

पंधरा दिवस उपचार केल्यानंतरही तिचा मृत्यू झाला. भक्तीला दोन लहान मुले आहेत. भक्तीने अपघाताने जळाल्याचे सांगितले असले तरी सासरचे लोक जाच देत होते असे जबाबात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी पती, सासू यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. बुधवारी आरोपी भरत पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करत आहेत.

Intro:वैभववाडी तालुक्यातील कुसूर मधलीवाडी येथील भक्ती पाटील या नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती व सासू विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी भरत पाटील याला अटक करून बुधवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सासू वनिता पाटील फरार असून वैभववाडी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.Body:याबाबत वैभववाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत भक्ती पाटील हीचा गावातीलच भरत वसंत पाटील यांच्याशी पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिचे पती माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लग्न झाल्यापासून तिचे पती भरत पाटील व सासू वनिता पाटील हे दोघे मिळून तिचा वारंवार मानसिक, शारीरिक छळ करत होते. मयत भक्ती ही १ एप्रिल रोजी जाचाला कंटाळून माहेरी आली. त्यानंतर चार दिवसांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्ती केल्यामुळे ती पुन्हा सासरी आली होती. दरम्यान दि. १० एप्रिल रोजी मयत भक्ती पाटीलचा भाऊ सुरज तळेकर यांनी तिच्या माहितीसाठी फोन केला होता. तिच्या पतीने ती सकाळी ५.३० वा. जेवण करताना भाजली असल्याची माहिती दिली. परंतु तिच्या सासरच्या मंडळींवर आमचा विश्वास नाही. तिचे पती व सासू यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिली आहे. किंवा त्यांच्या जाचाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले असल्याचे तिच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे.Conclusion:भक्ती भाजल्यानंतर तिला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी पोलिसांनी घेतलेल्या जबाबात मी पहाटे जेवण करत असताना अंगावर रॉकेलची बाटली कलंडून कपड्याला आग लागून भाजले असे तिने म्हटले आहे. तेथून तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेली पंधरा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. मयत भक्ती हिला दोन लहान मुले आहेत. याच दरम्यान मयत भक्तीचा भाऊ सुरज तळेकर यांनी वैभववाडी पोलिसात सासरच्या मंडळीं विरोधात तक्रार दिली. त्यानुसार वैभववाडी पोलिसांनी कोल्हापूर येथे जावून तिचा जबाब घेतला. यावेळी तिने दिलेल्या जबाबात माझ्या चारित्र्याच्या संशयावरून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यानुसार पोलिसांनी पती व सासूच्या विरोधात भा.द.वी कलम ३०६, ४९८(अ) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी आरोपी भरत पाटील याला कणकवली न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.