ETV Bharat / state

'माणमधील बिजवडी भागातील १६ गावांच्या पाणी प्रश्नाचे राजकीय भांडवल करू नका '

बिजवडी परिसरातील १६ गावे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याच योजनेत नाहीत. या गावांबरोबरच एकूण ३२ गावांचा पाणी प्रश्न कायम सुटण्यासाठी आजही केंद्र आणि राज्य शासनाच्या परवानग्या घेणे बाकी आहेत. मात्र, तरीही काही राजकीय मंडळी निवडणुका डोळ्यासमोर बैठकांचे आणि निधींचे कागदी घोडे नाचवत पाणी प्रश्नाचे भांडवल करत आहेत. त्यामुळे त्यांनी आता लोकांना फसवणे बंद करावे, असे भोसले म्हणाले.

author img

By

Published : Aug 22, 2019, 8:13 PM IST

सातारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले

सातारा - बिजवडी भागातील १६ गावांच्या पाणी प्रश्नाचे कोणीही राजकीय भांडवल करू नका, असे भावनिक आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केले. तेल गुरुवारी बिजवडीतील शिवसैनिकांच्या बैठकीत बोलत होते.

बिजवडी परिसरातील १६ गावे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याच योजनेत नाहीत. या गावांबरोबरच एकूण ३२ गावांचा पाणी प्रश्न कायम सुटण्यासाठी आजही केंद्र आणि राज्य शासनाच्या परवानग्या घेणे बाकी आहेत. मात्र, तरीही काही राजकीय मंडळी निवडणुका डोळ्यासमोर बैठकांचे आणि निधींचे कागदी घोडे नाचवत पाणी प्रश्नाचे भांडवल करत आहेत. त्यामुळे त्यांनी आता लोकांना फसवणे बंद करावे, असे भोसले म्हणाले.

बिजवडी आणि माण-खटावच्या पाणी प्रश्नासाठी आम्ही जेलभरो आंदोलन करत कळंबा जेलमध्ये गेलो. तसेच मुंबईतील आझाद मैदानात मंत्रालयासमोर धरणे आंदोलने केली. ११ दिवस उपोषण करुन पाणी प्रश्न कायम जागृत ठेवला. यावेळी सरकार व मुख्यमंत्री याबरोबरच आमदारही कोण होते आणि कोणाचे होते आणि मग याला इतकी वर्षे का लागली? हा प्रश्नदेखील का विचारू नये, असे म्हणत भोसले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आमच्याकडे देखील मंत्रालय स्तरावरील बैठकांचे अनेक वर्षांपासूनचे कागदी पुरावे आहेत. पण यामुळे तालुक्यात पाणी आले का? याचे खरे उत्तर नाही. भाबड्या आणि आशावादी जनतेला अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी पाण्याचे आमिष दाखवत निवडणूक काळात कायमच फसवत असतात, हे या दुष्काळी तालुक्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. बिजवडी भागातील गावांसाठी उपसा सिंचन योजना मंजूर केल्याच्या आरोळ्या ठोकणारे आणि कागदे फडकविणाऱ्यांना माझे आव्हान आहे, की जलआयोगाच्या लवादाची ५९९ टीमसी पाणी वाटपानंतरची आणि या योजनेसाठी लागणार्‍या वाढीव पाण्याची मंजुरी देखील दाखवावी. जनतेच्या भावनेचा या पुढे तरी खेळ खंडोबा करणे सर्व राजकीय मंडळींनी थांबवावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

सातारा - बिजवडी भागातील १६ गावांच्या पाणी प्रश्नाचे कोणीही राजकीय भांडवल करू नका, असे भावनिक आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केले. तेल गुरुवारी बिजवडीतील शिवसैनिकांच्या बैठकीत बोलत होते.

बिजवडी परिसरातील १६ गावे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याच योजनेत नाहीत. या गावांबरोबरच एकूण ३२ गावांचा पाणी प्रश्न कायम सुटण्यासाठी आजही केंद्र आणि राज्य शासनाच्या परवानग्या घेणे बाकी आहेत. मात्र, तरीही काही राजकीय मंडळी निवडणुका डोळ्यासमोर बैठकांचे आणि निधींचे कागदी घोडे नाचवत पाणी प्रश्नाचे भांडवल करत आहेत. त्यामुळे त्यांनी आता लोकांना फसवणे बंद करावे, असे भोसले म्हणाले.

बिजवडी आणि माण-खटावच्या पाणी प्रश्नासाठी आम्ही जेलभरो आंदोलन करत कळंबा जेलमध्ये गेलो. तसेच मुंबईतील आझाद मैदानात मंत्रालयासमोर धरणे आंदोलने केली. ११ दिवस उपोषण करुन पाणी प्रश्न कायम जागृत ठेवला. यावेळी सरकार व मुख्यमंत्री याबरोबरच आमदारही कोण होते आणि कोणाचे होते आणि मग याला इतकी वर्षे का लागली? हा प्रश्नदेखील का विचारू नये, असे म्हणत भोसले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आमच्याकडे देखील मंत्रालय स्तरावरील बैठकांचे अनेक वर्षांपासूनचे कागदी पुरावे आहेत. पण यामुळे तालुक्यात पाणी आले का? याचे खरे उत्तर नाही. भाबड्या आणि आशावादी जनतेला अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी पाण्याचे आमिष दाखवत निवडणूक काळात कायमच फसवत असतात, हे या दुष्काळी तालुक्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. बिजवडी भागातील गावांसाठी उपसा सिंचन योजना मंजूर केल्याच्या आरोळ्या ठोकणारे आणि कागदे फडकविणाऱ्यांना माझे आव्हान आहे, की जलआयोगाच्या लवादाची ५९९ टीमसी पाणी वाटपानंतरची आणि या योजनेसाठी लागणार्‍या वाढीव पाण्याची मंजुरी देखील दाखवावी. जनतेच्या भावनेचा या पुढे तरी खेळ खंडोबा करणे सर्व राजकीय मंडळींनी थांबवावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

Intro:बिजवडी परीसरातील सोळा गावे सध्य परीस्थितीमध्ये कोणत्याच योजनेत नसून या गावांबरोबरच एकून बत्तीस गावांचा पाणी प्रश्न कायम सुटणेसाठी आजही केंद्र व राज्य शासनाच्या परवानग्या घेणे बाकी असताना उगाचच बैठकांचे व निधींचे कागदी घोडे नाचविणारोंना निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पाणी प्रश्नाचे भांडवल करू नका असे भावणीक आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी बिजवडी येथील प्रमुख शिवसैनिकांच्या बैठकीत केले.
Body:बिजवडी भागाच्या पाणी प्रश्नासाठीच नव्हे तर माण खटावच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही जेलभरो करत कळंबा जेल मध्ये गेलो. एवढेच नव्हेतर मुंबई आझाद मैदानात मंत्रालयासमोर वेळप्रसंगी धरणे आंदोलने केली. अकरा दिवस उपोषण करून पाणी प्रश्न कायम जागृत ठेवला ,यावेळी सरकार व मुख्यमंत्री याबरोबरच आमदारही कौण होते व कोणाचे होते ,आणी मग याला इतकी वर्षे का लागली हा प्रश्नदेखील का विचारू नये,असे आम्हाला वाटते.
आमचेकडे देखील मंत्रालय स्तरावरील बैठकाचे अनेक वर्षांपासूनचे अनेक कागदी पुरावे आहेत ,म्हणजेच काय पाणी आले का ? याचे खरे उत्तर नाही. भाबड्या आणी आशावादी जनतेला अनेक राजकीय नेते व लोकप्रतिनिधि पाण्याचे गाजर दाखवत निवडणूक काळात कायमच फसविताना या दुष्काळी तालुक्याने उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे.
बिजवडी भागातील गावांसाठी उपसा सिंचन योजना मंजूर केल्याच्या आरोळ्या ठोकणारे व कागदे फडकविणारांना माझे आव्हान आहे की, जलआयोगाची लवादाची ५९९ टीमसी पाणी वाटपानंतरची या योजनेसाठी लागणार्‍या वाढीव पाण्याची मंजूरीदेखील दाखवा. जनतेच्या भावनेचा या पुढेतरी खेळ खंडोबा करणे सर्व राजकीय मंडळींनी थांबवावे असे सरतेशेवटी भोसले म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.