ETV Bharat / state

राष्ट्रवादी पक्षाला व साताऱ्याच्या जनतेला विजय अर्पण - खासदार श्रीनिवास पाटील - सातारा लोकसभा निवडणूक २०१९

विजयानंतर श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले, 'जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. प्रत्येक मतदाराला वाटले की, आपणच उमेदवार म्हणून उभे आहोत आणि मतदान केले पाहिजे. यामुळे प्रचंड मते देऊन जनतेने माझ्यावर विश्वास प्रकट केला.'

राष्ट्रवादी पक्षाला व साताऱ्याच्या जनतेला विजय अर्पण - खासदार श्रीनिवास पाटील
author img

By

Published : Oct 26, 2019, 12:06 PM IST

सातारा - दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानणारा सातारा जिल्हा असून या जिल्ह्याला सुसंस्कृत लोकशाहीची परंपरा लाभली आहे. यामुळेच लोकांनी मला प्रचंड बहुमतांनी विजयी केले. हा विजय राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठा विजय असून, तो मी पक्षाला व साताराच्या जनतेला अर्पण करतो, अशी भावना राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

विजयानंतर श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले, 'जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. प्रत्येक मतदाराला वाटले की, आपणच उमेदवार म्हणून उभे आहोत आणि मतदान केले पाहिजे. यामुळे प्रचंड मते देऊन जनतेने माझ्यावर विश्वास प्रकट केला.'

ऐंशी वर्षाची व्यक्ती भरपावसात कुठलीही छत्री न घेता मनापासून कष्ट घेते. मागे केलेली चूक सुधारण्याकरता मी आज आपल्या दारी मत मागण्यासाठी आलो आहे, आपले मत राष्ट्रवादी व काँग्रेस मित्र पक्षांच्या उमेदवारांना आणि श्रीनिवास पाटील यांना द्यावे, असे शरद पवार यांनी केलेले आवाहन लोकांना योग्य वाटले. म्हणून लोकांनी राष्ट्रवादीला भरभरुन मतदान केले. मी लोकशाही मार्गाला धरून लोकहिताची कामे करेन, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने, साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्यात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील तर भाजपकडून उदयनराजे यांनी पोटनिवडणूक लढवली. यात पाटील यांनी भोसले यांचा दारुण पराभव केला. शरद पवार यांनी पाटील यांच्यासाठी भरपावसात साताऱ्यात घेतलेली सभा देशभरात चर्चिले गेली.

सातारा - दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानणारा सातारा जिल्हा असून या जिल्ह्याला सुसंस्कृत लोकशाहीची परंपरा लाभली आहे. यामुळेच लोकांनी मला प्रचंड बहुमतांनी विजयी केले. हा विजय राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठा विजय असून, तो मी पक्षाला व साताराच्या जनतेला अर्पण करतो, अशी भावना राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

विजयानंतर श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले, 'जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. प्रत्येक मतदाराला वाटले की, आपणच उमेदवार म्हणून उभे आहोत आणि मतदान केले पाहिजे. यामुळे प्रचंड मते देऊन जनतेने माझ्यावर विश्वास प्रकट केला.'

ऐंशी वर्षाची व्यक्ती भरपावसात कुठलीही छत्री न घेता मनापासून कष्ट घेते. मागे केलेली चूक सुधारण्याकरता मी आज आपल्या दारी मत मागण्यासाठी आलो आहे, आपले मत राष्ट्रवादी व काँग्रेस मित्र पक्षांच्या उमेदवारांना आणि श्रीनिवास पाटील यांना द्यावे, असे शरद पवार यांनी केलेले आवाहन लोकांना योग्य वाटले. म्हणून लोकांनी राष्ट्रवादीला भरभरुन मतदान केले. मी लोकशाही मार्गाला धरून लोकहिताची कामे करेन, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने, साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्यात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील तर भाजपकडून उदयनराजे यांनी पोटनिवडणूक लढवली. यात पाटील यांनी भोसले यांचा दारुण पराभव केला. शरद पवार यांनी पाटील यांच्यासाठी भरपावसात साताऱ्यात घेतलेली सभा देशभरात चर्चिले गेली.

Intro:सातारा
महाराष्ट्राने प्रगतशिल मार्गाने चालावे अशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची सुसंस्कृत लोकशाहीची परंपरा सातारा जिल्ह्याला लाभली आहे. याबद्दल माझ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. प्रत्येक मतदाराला वाटले होते की, आपणच उमेदवार म्हणून उभे आहोत आणि मतदान केले पाहिजे. प्रचंड मते देऊन जनतेने माझ्यावर विश्वास प्रकट केला. हा विजय राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठा विजय असून, तो मी पक्षाला व जनतेला अर्पण करतो. अशी भावना राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

Body:यावेळी बोलताना ते म्हणाले, जनतेने ही उमेदवारी उचलली आणि निवडणूक आपल्या हातात घेतली. त्यातून व्यक्त होणारे प्रेम असू द्या, एखाद्यावर राग असू द्या किंवा लोभ असू द्या. पण मनापासून जनतेने ठरवले होते की, शरद पवार साहेबांना साथ द्यायची.

ऐंशी वर्षाची व्यक्ती ही भर पावसात कुठलीही छत्री न घेता मनापासून कष्ट घेते. मागे कदाचित केलेली चूक सुधारण्याकरिता मी आज आपल्या दारी मत मागण्यासाठी आलो आहे, आपले मत राष्ट्रवादी व कॉंग्रेस मित्र पक्षांच्या उमेदवारांना आणि श्रीनिवास पाटील यांना द्यावे असे केलेले आवाहन लोकांना योग्य वाटले. याचे परिवर्तन मतांमध्ये झाले. त्यातून जनतेने हा प्रचंड मताने दिलेला कौल आहे. सर्व प्रकारच्या लोकशाही मार्गाला धरून लोकहिताची कामे मी मन लावून करेन. कराड लोकसभा मतदार संघाचा तसा जुना अनुभव आहे. अशा अशावाद त्यांनी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.