ETV Bharat / state

'मोदी पर्यटन करतात अन् अमित शाह कोणाला तुरुंगात टाकायचे ते ठरवतात'

उमेदवारांच्या क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करून कोण विकास करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे जनताच योग्य निर्णय घेईल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

author img

By

Published : Oct 13, 2019, 7:57 PM IST

पृथ्वीराज चव्हाण

सातारा - मोदींना परदेश पर्यटन आवडते, तर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून कोणाला तुरुंगात टाकायचे ते अमित शाह ठरवतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी-शाहांवर केली. कराड दक्षिणमधील वडगाव हवेली गावात झालेल्या प्रचार सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले, की आम्हा दोघांनाही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मी मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील यांनी राज्यपालपदावर काम केले आहे. उमेदवारांच्या क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करून कोण विकास करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे जनताच योग्य निर्णय घेईल. उदयनराजेंनी खासदार असताना 10 वर्षात जनतेची कोणती कामे केली? त्यांना निवडून दिल्यामुळे 10 वर्षे वाया गेली. म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महाआघाडीचे विकासाभिमुख उमेदवार श्रीनिवास पाटील यांना सर्वानी साथ देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

हेही वाचा - स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हाच सत्ताधाऱ्यांचा धंदा - अजित पवार

शरद पवार यांना वडिलांप्रमाणे मानतो, असे म्हणणार्‍या उदयनराजेंनी पवार साहेबांना ईडीने नोटीस काढल्यानंतर राजीनामा देण्याचे धाडस का केले नाही? तुम्ही पक्ष का सोडला? हे येत्या 2-4 दिवसात जाहीर करा, असे आव्हान श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना दिले. तसेच तुमचे पक्ष सोडण्याचे कारण जनतेला पटले, तर मी जनता जे सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

जयवंतराव जगताप यांनी आमदार आनंदराव पाटील यांचा जीव पेन्शनमध्ये अकडला असल्याचा टोला मारला. आमदारकीचा राजीनामा दिला, तर पेन्शन बंद होईल, याची त्यांना भीती आहे. दिवंगत प्रेमलाकाकींमुळे तुम्ही पुढारी झालात. अन्यथा, कोयनानगरमध्ये शेतात कमा करत बसला असता, अशी टीकाही जगताप यांनी केली.

हेही वाचा - मी तर छत्रपती उदयनराजेंचा फॅन - आदित्य ठाकरे

सातारा - मोदींना परदेश पर्यटन आवडते, तर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून कोणाला तुरुंगात टाकायचे ते अमित शाह ठरवतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी-शाहांवर केली. कराड दक्षिणमधील वडगाव हवेली गावात झालेल्या प्रचार सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले, की आम्हा दोघांनाही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मी मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील यांनी राज्यपालपदावर काम केले आहे. उमेदवारांच्या क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करून कोण विकास करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे जनताच योग्य निर्णय घेईल. उदयनराजेंनी खासदार असताना 10 वर्षात जनतेची कोणती कामे केली? त्यांना निवडून दिल्यामुळे 10 वर्षे वाया गेली. म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महाआघाडीचे विकासाभिमुख उमेदवार श्रीनिवास पाटील यांना सर्वानी साथ देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

हेही वाचा - स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हाच सत्ताधाऱ्यांचा धंदा - अजित पवार

शरद पवार यांना वडिलांप्रमाणे मानतो, असे म्हणणार्‍या उदयनराजेंनी पवार साहेबांना ईडीने नोटीस काढल्यानंतर राजीनामा देण्याचे धाडस का केले नाही? तुम्ही पक्ष का सोडला? हे येत्या 2-4 दिवसात जाहीर करा, असे आव्हान श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना दिले. तसेच तुमचे पक्ष सोडण्याचे कारण जनतेला पटले, तर मी जनता जे सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

जयवंतराव जगताप यांनी आमदार आनंदराव पाटील यांचा जीव पेन्शनमध्ये अकडला असल्याचा टोला मारला. आमदारकीचा राजीनामा दिला, तर पेन्शन बंद होईल, याची त्यांना भीती आहे. दिवंगत प्रेमलाकाकींमुळे तुम्ही पुढारी झालात. अन्यथा, कोयनानगरमध्ये शेतात कमा करत बसला असता, अशी टीकाही जगताप यांनी केली.

हेही वाचा - मी तर छत्रपती उदयनराजेंचा फॅन - आदित्य ठाकरे

Intro:मोदींना परदेश पर्यटन आवडते, तर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून कोणाला तुरुंगात टाकायचे ते अमित शहा ठरवितात, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी-शहांवर प्रहार केला. Body:कराड (सातारा) : मोदींना परदेश पर्यटन आवडते, तर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून कोणाला तुरुंगात टाकायचे ते अमित शहा ठरवितात, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी-शहांवर प्रहार केला. 
 कराड दक्षिणमधील वडगाव हवेली गावात झालेल्या प्रचार सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. 
आम्हा दोघांनाही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मी मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील यांनी राज्यपालपदावर काम केले आहे. उमेदवारांच्या क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करून कोण विकास करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे जनताच योग्य निर्णय घेईल, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयनराजेंनी खासदार असताना दहा वर्षात जनतेची कोणती कामे केली? त्यांना निवडून दिल्यामुळे दहा वर्षे वाया गेली. म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महाआघाडीचे विकासाभिमुख उमेदवार श्रीनिवास पाटील यांना सर्वानी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. 
  शरद पवार यांना वडिलांप्रमाणे मानतो, असे म्हणणार्‍या उदयनराजेंनी पवार साहेबांना ईडीने नोटीस काढल्यानंतर राजीनामा देण्याचे धाडस का केले नाही? तुम्ही पक्ष का सोडला? हे येत्या दोन-चार दिवसात जाहीर करा, असे आव्हान श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना दिले. तसेच तुमचे पक्ष सोडण्याचे कारण जनतेला पटले, तर मी जनता जे सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
  जयवंतराव जगताप यांनी आ. आनंदराव पाटील यांचा जीव पेन्शनमध्ये अकडला असल्याचा टोला मारला. आमदारकीचा राजीनामा दिला, तर पेन्शन बंद होईल, याची त्यांना भीती आहे. स्व. प्रेमलाकाकींमुळे तुम्ही पुढारी झाला. अन्यथा कोयनानगरमध्ये शेतात कमा करत बसला असता, अशी टीका जगताप यांनी केलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.